AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nitin Gadkari : आता स्पर्धा हवेशी, दिल्ली करा 12 तासात सर, काय आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा मेगा प्लॅन..

Nitin Gadkari : 'दिल्ली अब दूर नही', हे वाक्य लवकरच सत्यात येणार आहे.

Nitin Gadkari : आता स्पर्धा हवेशी, दिल्ली करा 12 तासात सर, काय आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा मेगा प्लॅन..
12 तासात दिल्लीImage Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Dec 10, 2022 | 10:59 PM
Share

नवी दिल्ली : दिल्ली (Delhi) आता नक्कीच दूर राहणार नाही. कारण वाऱ्याच्या वेगाशी स्पर्धा करत तुम्हाला दिल्ली गाठता येणार आहे. देशाची राजधानी मुंबईवरुन (Mumbai) अवघ्या 12 तासात सर करता येईल. यासाठी तुम्हाला पुढील 4-5 वर्षे वाट पाहण्याची गरज नाही. दिल्ली से मुंबईपर्यंतच्या एक्सप्रेसवे (Express Way) बांधून तयार होत आहे. या डिसेंबर महिन्यातच हे काम पूर्ण होईल. त्यामुळे आर्थिक राजधानीतून दिल्लीत येण्यासाठी आता दोन दिवसांची वाट पाहण्याची गरज नाही.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी शनिवारी या व इतर प्रकल्पांची माहिती दिली. त्यानुसार, त्यांचे मंत्रालय येत्या काही दिवसात पाच ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे तयार करणार आहे. त्याचा सर्वाधिक फायदा मध्यप्रदेशला होणार आहे.

गडकरी यांनी रीवा जिल्ह्यात 2443.89 कोटी रुपये खर्च करुन एकूण 204.81 किलोमीटर लांबीच्या सात रस्त्याच्या योजनांचे उद्धघाटन केले. या राष्ट्रीय महामार्गातंर्गत मोहनिया डोंगररांगेत 1004 कोटी रुपये खर्च करुन 2.82 किलोमीटर लांबीचा बोगदा तयार करण्यात आला आहे.

त्यांनी शेतीच्या विकासासोबत औद्योगिक विकासावर भर दिला. त्यासाठी पाणी, ऊर्जा, परिवहन योजनांवर भर देण्यात येणार आहे. त्यासाठीच केंद्र सरकार पाच ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवेची निर्मिती करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचा फायदा मध्यप्रदेशला होणार आहे.

गडकरी यांनी सांगितले की, मुंबई आता केवळ 12 तासात गाठता येईल. हा हायवे या डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. या हायवेसाठी एक लाख कोटी रुपये खर्च आला आहे. हा हायवे 1,382 किलोमीटर लांबीचा असेल.

यासोबतच अटल प्रोगेस हायवेचे कामही लवकरच सुरु करण्यात येणार आहे. या हायवेला पूर्वी चंबल एक्सप्रेस हायवे नावाने ओळखल्या जात होते. या हायवेसाठी 15,000 कोटी रुपये लागणार आहे. अटल प्रोग्रेस-वे 415 किलोमीटर लांब असेल. हा हायवे उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थानमधून जाईल.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.