AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मध्यान्ह भोजनाचे पैसे मिळाले नाही; विद्यार्थ्यांनी कर्मचाऱ्यांनाच दिली अशी शिक्षा

विद्यार्थ्यांच्या या करामतीमुळं गोंधळ उडाला. शाळेच्या बाहेर गर्दी जमा झाली. शिक्षण विभागाचे प्रमुख घटनास्थळी पोहचले. त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.

मध्यान्ह भोजनाचे पैसे मिळाले नाही; विद्यार्थ्यांनी कर्मचाऱ्यांनाच दिली अशी शिक्षा
| Updated on: Jan 21, 2023 | 4:26 PM
Share

नवी दिल्ली : कोरोना काळात युपी (Uttar Pradesh) सरकारने सरकारी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना (students) मध्यान्ह भोजनाचे पैसे दिले. पण, बलिया भागातील सरकारी शाळेच्या विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनाचे (mid-day meal) पैसे मिळाले नाही. मध्यान्ह भोजनाचे पैसे मागितल्यानंतर शाळा प्रशासन त्याकडं दुर्लक्ष करत होते. संतापलेल्या विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापकासह पूर्ण कर्मचाऱ्यांना शाळेच्या खोलीत बंद केले. ही घटना बलिया विभागातील दुर्जनपूर कम्पोझिट विद्यालयात घडली. विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांना बंधक बनविले. वर्ग आठवीच्या धीरजने सांगितले की, कोविड काळात मिळणे अपेक्षित असलेले मध्यान्ह भोजनाचे पैसे अजूनपर्यंत कोणत्याही विद्यार्थ्यांना मिळालेले नाहीत.

आम्ही शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांना पैसे देण्यासंबंधात विचारणा केली. दोन-तीन महिन्यानंतर मिळतील, असं शाळा प्रशासनाकडून सांगण्यात आलं. पण, वाट पाहूनही मध्यान्ह भोजनाचे पेसे मिळाले नाही. त्यामुळं मुख्याध्यापकासह शिक्षकांना शाळेतील खोलीत बंद करण्यात आले. जोपर्यंत उच्च अधिकारी येणार नाही तोपर्यंत बंदिस्त करून ठेवणार होतो.

त्यानंतर विद्यार्थी शांत झाले

विद्यार्थ्यांच्या या करामतीमुळं गोंधळ उडाला. शाळेच्या बाहेर गर्दी जमा झाली. शिक्षण विभागाचे प्रमुख घटनास्थळी पोहचले. त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. त्यानंतर विद्यार्थ्यांना कर्मचाऱ्यांना खोलीच्या बाहेर येऊ दिले.

मुख्याध्यापक म्हणाले,…

दुर्जनपूर कम्पोझिट विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक जयप्रकाश यादव म्हणाले, चौथ्या टप्प्यातील विद्यार्थ्यांचे पैसे आलेले नाहीत. यासंदर्भात उच्च अधिकाऱ्यांना कळविले आहे. लवकरच विद्यार्थ्यांना त्यांच्या मध्यान्ह भोजनाचे पैसे मिळतील.

या घटनेमुळं शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली. सरकारी योजना चांगल्या आहेत. पण, या योजनांची योग्य अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. ही अंमलबजावणी होत नसेल, तर अशा घटना घडतात. त्यामुळं अंमलबजावणीतील त्रृटी दूर करणे आवश्यक आहे.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.