AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राहुल गांधींना देशातील बदनामी कमी पडते म्हणून आता परदेशातही स्वत:ची बदनामी करुन घेतायत: गिरीराज सिंह

राहुल गांधी यांच्या बुद्धिमतेविषयी चर्चा करण्यासारखे आता फारसे काही उरलेले नाही. | Giriraj Singh

राहुल गांधींना देशातील बदनामी कमी पडते म्हणून आता परदेशातही स्वत:ची बदनामी करुन घेतायत: गिरीराज सिंह
| Updated on: Nov 13, 2020 | 2:10 PM
Share

नवी दिल्ली: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी केलेल्या टिप्पणीनंतर आता काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना भाजप नेत्यांनी ट्रोल करण्यासा सुरुवात केली आहे. राहुल गांधी यांना देशातील बदनामी कमी पडत होती की काय म्हणून आता ते परदेशातही स्वत:ची बदनामी करून घेत असल्याची खोचक टीका भाजप खासदार गिरीराज सिंह (Giriraj Singh) यांनी केली. (BJP MP Giriraj Singh take a dig at congress leader Rahul Gandhi)

राहुल गांधी यांच्या बुद्धिमतेविषयी चर्चा करण्यासारखे आता फारसे काही उरलेले नाही. बराक ओबामा यांच्यासारख्या बड्या नेत्याने सर्वकाही सांगितले आहे. त्यामुळे राहुल गांधी यांना आजपर्यंत देशात जो आदर मिळत होता तो आता जागतिक पातळीवरही मिळेल, अशी खोचक टिप्पणीही गिरीराज सिंह यांनी केली.

बराक ओबामा यांच्या व्हाईट हाऊसमधील अनुभवांवर आधारित ‘अ प्रॉमिस लँड’ (A Promised Land) हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. त्यानंतर ‘न्यूयॉर्क टाईम्स’मध्ये या पुस्तकाचे परीक्षण छापून आले होते. या परीक्षणात ओबामा यांच्या पुस्तकातील अनेक रंजक गोष्टींचा उल्लेख आहे. ओबामा यांनी त्यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या कार्यकाळात भेट घेतलेल्या जागतिक नेत्यांविषयीचे अनुभव कथन केले आहेत.

यामध्ये भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा समावेश आहे. राहुल गांधी हे कसल्या तरी अदृश्य दडपणाखाली असतात. राहुल गांधी म्हणजे असा विद्यार्थी आहेत की, ज्याला शिक्षकांसमोर चांगली कामगिरी करुन दाखवायची असते. पण कुठेतरी त्या विद्यार्थ्याची गुणवत्ता किंवा संबंधित विषयात प्रावीण्य मिळवण्याची पॅशन कमी पडते, असे मत बराक ओबामा यांनी पुस्तकात म्हटले आहे.

संबंधित बातम्या:

राहुल गांधींना काहीतरी करून दाखवायचेय पण त्यांची गुणवत्ता आणि पॅशन अपुरी पडते: बराक ओबामा

(Giriraj Singh) यांनी केली. (BJP MP Giriraj Singh take a dig at congress leader Rahul Gandhi)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.