AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pakistan Claim On India : पाकिस्तान होणार ‘इंडिया’! कोणी केला दावा

Pakistan Claim On India : मथळावाचून तुम्हाला यावर विश्वास बसणार नाही. पण दक्षिण आशियातील एका विश्वसनीय संस्थेने हे वृत्त दिल्यापासून खळबळ माजली आहे. केंद्र सरकारने भारत नाव अधिकृत केले तर केवळ भारतातच नाही तर जगभर त्याचे परिणाम दिसून येतील. काय केलाय या वृत्तात दावा?

Pakistan Claim On India : पाकिस्तान होणार 'इंडिया'! कोणी केला दावा
| Updated on: Sep 07, 2023 | 8:38 AM
Share

नवी दिल्ली | 7 सप्टेंबर 2023 : G-20 परिषदेच्या निमंत्रण पत्रिकेवर भारताच्या राष्ट्रपतींचा उल्लेख President of India ऐवजी President of Bharat असा करण्यात आला. तेव्हापासून देशाचे अधिकृत नाव भारत करण्याच्या सरकार दरबारी हालचाली सुरु असल्याच्या चर्चांना जोर आला. अर्थात यावर विरोधकांपासून सर्वांनीच हल्लाबोल केला. या मुद्दावरुन राजकारण तापले आहे. डिबेट शोमध्ये दोन्ही गटातील नेते एकमेकांवर तुटून पडले आहेत. दरम्यान भारताच्या राज्यघटनेतच इंडिया दॅट इज भारत असा उल्लेख असल्याने त्यासाठी केंद्र सरकारला (Central Government) विशेष काही वेगळं करण्याची गरज पडणार नाही, असा काही घटना तज्ज्ञांचा व्होरा आहे. भारत (Bharat) नावावरुन देशातच नाही तर आंतरराष्ट्रीय मंचावर पण पडसाद उमटत आहेत. आता दक्षिण आशियातील एका संस्थेच्या दाव्याने खळबळ उडाली आहे. पाकिस्तान (Pakistan) इंडिया (India) या शब्दावर दावा सांगू शकतो, असा दावा या संस्थेने केला आहे, नेमकं काय आहे हे प्रकरण?

काय आहे दावा

पाकिस्तानच्या स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार, जर इंडिया नावाऐवजी भारत या नावाला अधिकृत दर्जा मिळाला तर अनेक गोष्टी घडू शकतात. त्यानुसार, संयुक्त राष्ट्रात इंडिया नाव रद्दबातल ठरेल. त्याऐवजी भारत हे अधिकृत नाव समोर येईल. अशावेळी पाकिस्तान इंडिया नावावर दावा सांगू शकतो. पाकिस्तानचा इंडिया या शब्दासाठी अनेक दिवसांपासून खटाटोप सुरु आहे, हे अनेकांना माहिती नाही. त्यामागे एक ठोस कारण आहे. इंडिया हे नाव सिंधू संस्कृतीचे प्रतिक आहे. सध्याचा पाकिस्तानमध्येच हे क्षेत्र असल्याने सांस्कृतिक आधारावर ओळख दाखविण्यासाठी पाकिस्तान इंडिया नावावर दावा सांगणार असल्याचा दावा करण्यात येत आहे.

या अग्रगण्य संस्थेचा पण दावा

South Asia Index Report ही दक्षिण आशियातील अग्रगण्य संस्था आहे. त्यांनी ट्विटर-एक्स हँडलवर हा दावा केला आहे. त्यानुसार, संयुक्त राष्ट्रात इंडिया या शब्द रद्दबातल झाला आणि अधिकृतपणे भारत या नावावर शिक्कामोर्तब झाले तर पाकिस्तान इंडिया या शब्दावर दावा सांगू शकतो.

मोहम्मद अली जिना इंडिया नावावर आक्षेप

साऊथ आशिया इंडेक्सच्या दाव्यानुसार, भारताने इंडिया नावावर दावा सांगितल्यावर त्याला विरोध झाला होता. पाकिस्तानचे संस्थापक आणि तत्कालीन पंतप्रधान, कायदे आझम मोहम्मद अली जिना यांनी इंडिया नावाला विरोध केला होता. त्यांना इंडियावर हक्क सांगायचा होता. पण भारताने इंडिया नाव स्वीकारले होते. भारताने इंडिया ऐवजी हिंदुस्थान अथवा भारत हे नाव घ्यावे, असे त्यांनी सुचवले होते.

आमंत्रण पण नाकारले

1947 मध्ये भारत स्वतंत्र झाल्यानंतर एका प्रदर्शनीसाठी मोहम्मद अली जिना यांना आमंत्रण देण्यात आले होते. या निमंत्रण पत्रिकेवर इंडिया हा शब्द होता. त्यानाराजीने जिना यांनी प्रदर्शनीला भेट देण्यास नकार दिला. रागा रागात जिना यांनी भारताचे शेवटचे गव्हर्नर लॉर्ड माऊंटबॅटन यांना पत्र लिहिले. त्यात इंडिया शब्दावरील भारताच्या दाव्यावर नाराजी व्यक्त केली होती.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.