AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या ‘घरात घुसून मारु’ या वक्तव्याने पाकिस्तानात खळबळ

भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी दहशतवादावर बोलताना म्हटले होते की, जर आमच्या देशातील शांती भंग करण्याचा कोणी प्रयत्न केला तर आम्ही त्यांना त्यांच्या घरात घुसून मारु. राजनाथ सिंग यांच्या या वक्तव्यानंतर पाकिस्तानला पुन्हा एकदा मिर्ची लागली आहे. पाहा यावर काय म्हणाला पाकिस्तान.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या 'घरात घुसून मारु' या वक्तव्याने पाकिस्तानात खळबळ
india vs pakistan (1)
Follow us
| Updated on: Apr 06, 2024 | 6:36 PM

India vs pakistan : भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या वक्तव्यावर आता पाकिस्तानकडून प्रतिक्रिया आली आहे. ‘घरात घुसून मारु’ या वक्तव्यावर पाकिस्तानचा तिळपापड झाला आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने राजनाथ सिंह यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. भारताला 2019 च्या घटनेची आठवण करून दिलीये.

शुक्रवारी एका मुलाखतीदरम्यान राजनाथ सिंह यांनी दहशतवादावर बोलताना एक वक्तव्य केले होते. भारताची शांतता बिघडवणारे किंवा हानी करणारे दहशतवादीही पाकिस्तानात पळून गेले तर भारत शेजारील देशात घुसून त्यांना ठार करेल, असे ते म्हणाले होते. 2020 पासून आतापर्यंत भारताने पाकिस्तानमध्ये 20 दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे. पुलवामा हल्ल्यानंतर भारत चांगलाच आक्रमक झाला होता.

काय म्हणाला पाकिस्तान?

राजनाथ सिंह यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, ‘पाकिस्तानात मनमानीपणे दहशतवादी असल्याचे घोषित केलेल्या नागरिकांना मारण्याची भारताची तयारी ही अपराधीपणाची स्पष्ट कबुली आहे.

पाकिस्तान कोणत्याही आक्रमणापासून आपल्या देशाचे रक्षण करण्यास तयार आहे. 2019 मध्ये आम्ही भारताच्या घुसखोरीला चोख प्रत्युत्तर दिले. यातून भारताचे पोकळ दावे उघड होतात. पाकिस्तानने या वर्षाच्या सुरुवातीला सांगितले होते की, त्यांच्या दोन नागरिकांच्या हत्येमध्ये भारतीय दलालांचा सहभाग असल्याचे विश्वसनीय पुरावे आहेत. मात्र, भारताने पाकिस्तानचा आरोप खोटा आणि द्वेषपूर्ण प्रचार असल्याचे म्हटले होते.

2019 पासून भारत-पाकिस्तान संबंधात तणाव

2019 पासून भारत आणि पाकिस्तानमधील संबंध बिघडत चालले आहेत. काश्मीरमध्ये भारतीय लष्करी ताफ्यावर झालेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटात पाकिस्तानस्थित दहशतवादी सापडले होते. या दहशतवादी हल्ल्यात 40 भारतीय जवान शहीद झाले होते. या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने घेतली होती.

भारताने या पुलवामा हल्ल्यानंतर पीओकेमध्ये जाऊन सर्जिकल स्ट्राईक आणि एअरस्ट्राईक केला होता. भारताने बदला घेण्यासाठी अनेक दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्थ केले होते. भारताच्या स्ट्राईकनंतर पाकिस्तान चांगलाच भडकला होता. पण तो काही करु शकत नव्हता. कारण हे दशतवादी पाकिस्तानातून आले होते हे तो सांगू शकत नव्हता. पाकिस्तानने कधीही त्यांच्या देशातून दहशतवादी हल्लाला स्वीकरलेले नाही.

बिथरलेलं पाकडे गप्प बसेना, भारतीयांना केलं टार्गेट, कुठं सापडली मिसाईल
बिथरलेलं पाकडे गप्प बसेना, भारतीयांना केलं टार्गेट, कुठं सापडली मिसाईल.
पाकला दणका अन् चीनची तंतरली, आधी पाकला मदत आता म्हणताय, जरा संयमानं...
पाकला दणका अन् चीनची तंतरली, आधी पाकला मदत आता म्हणताय, जरा संयमानं....
हम अल्लाह के, कसम खाते है की... अल कायदाकडून भारताला टोकाची धमकी
हम अल्लाह के, कसम खाते है की... अल कायदाकडून भारताला टोकाची धमकी.
Rain Update आजही मुंबईकरांची तारांबळ उडणार? हवामान खात्याचा अंदाज काय?
Rain Update आजही मुंबईकरांची तारांबळ उडणार? हवामान खात्याचा अंदाज काय?.
ऑपरेशन सिंदूरनंतर पाक पुन्हा हादरला, लाहोरमध्ये स्फोटाचे आवाज; घडल काय
ऑपरेशन सिंदूरनंतर पाक पुन्हा हादरला, लाहोरमध्ये स्फोटाचे आवाज; घडल काय.
अब पाकिस्तान का जवाब... घुसून मारल्यानंतर बिलावल भुट्टोचा तिळपापड
अब पाकिस्तान का जवाब... घुसून मारल्यानंतर बिलावल भुट्टोचा तिळपापड.
हा होता पहलगाम हल्ल्याचा सूत्रधार, नाव-फोटो समोर, बघा कोणाशी कनेक्शन?
हा होता पहलगाम हल्ल्याचा सूत्रधार, नाव-फोटो समोर, बघा कोणाशी कनेक्शन?.
भारताने मोठी चूक केली, प्रत्येक रक्ताच्या थेंबाचा बदला... पाककडून धमकी
भारताने मोठी चूक केली, प्रत्येक रक्ताच्या थेंबाचा बदला... पाककडून धमकी.
सदावर्ते राज ठाकरेंवर भडकले, पाकिस्तानी खाज, मुझे ये नही बोलना की...
सदावर्ते राज ठाकरेंवर भडकले, पाकिस्तानी खाज, मुझे ये नही बोलना की....
OperationSindoor:एअर स्ट्राईकची कहाणी जगाला सांगणाऱ्या त्या दोघी कोण?
OperationSindoor:एअर स्ट्राईकची कहाणी जगाला सांगणाऱ्या त्या दोघी कोण?.