AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WITT: ‘पीएम नरेंद्र मोदी हे जगातील सर्वात प्रभावशाली नेतृत्व’; TV9 चे CEO&MD बरुण दास काय म्हणाले?

टिव्ही 9 नेटवर्कचा मेगा ईव्हेट असलेल्या व्हाट इंडिया थिंक्स टुडे (What India Thinks Today) या कार्यक्रमाला आज दिल्लीमध्ये सुरुवात झाली. हा दोन दिवसांचा कार्यक्रम असणार आहे.

WITT: 'पीएम नरेंद्र मोदी हे जगातील सर्वात प्रभावशाली नेतृत्व'; TV9 चे CEO&MD बरुण दास काय म्हणाले?
| Updated on: Mar 28, 2025 | 5:52 PM
Share

टिव्ही 9 नेटवर्कचा मेगा ईव्हेट असलेल्या व्हाट इंडिया थिंक्स टुडे (What India Thinks Today) या कार्यक्रमाला आज दिल्लीमध्ये सुरुवात झाली. हा दोन दिवसांचा कार्यक्रम असणार आहे. भारत मंडपममध्ये हा कार्यक्रम सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भव्य असं स्वागत करण्यात आलं . त्यानंतर टिव्ही 9 नेटवर्कचे सीईओ आणि एमडी बरुण दास यांनी आपले विचार व्यक्त केले.

यावेळी बोलताना बरुण दास यांनी म्हटलं की, माझ्यासाठी ही सन्मानाची बाब आहे की,टिव्ही 9 नेटवर्कचा मेगा ईव्हेट असलेल्या व्हाट इंडिया थिंक्स टुडेमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे, ‘इंडिया फर्स्ट’ हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुलमंत्र आहे. 2047 पर्यंत भारताला एक विकसीत देश बनवण्याचं लक्ष ठेवण्यात आलं आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रामुख्याने तीन प्रमुख वर्गावर आपलं लक्ष्य केंद्रीत केलं आहे. ज्यामध्ये भारताचे तरुण, भारतातील नारी शक्ती आणि प्रवासी भारतीय यांचा समावेश आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, मला नेहमी असं वाटतं की महिलांचं सक्षमीकरण आणि नेतृत्व हे समाजाला प्रगतीपथावर घेऊन जाऊ शकतात. आज आपण तरुण आणि प्रवासी भारतीय अशा दोन प्रमुख वर्गावर लक्ष केंद्रीत केलं आहे.प्रवासी भारतीयांबाबत बोलायचं झाल्यास टीव्ही 9 नेटवर्कने गेल्या वर्षी जर्मनीच्या स्टटगार्टमध्ये न्यूज़9 ग्लोबल समिट’चं आयोजन केलं होतं. आता सुरू असलेल्या कार्यक्रमाचं देखील भव्य असं आयोजन करण्यात आलं आहे.

आज संपूर्ण जग भारताकडे ‘विश्व बंधु ‘अर्थात ग्लोबल फ्रेन्ड म्हणून पाहात आहे. यामध्ये कोणताही संशय नाही की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्वात प्रभावशाली आणि सन्माननीय नेते आहेत.नेपोलियन बोनापार्ट ने म्हटलं होतं की, एका नेत्याचं हृदय हे त्याच्या डोक्यामध्ये असायला हवं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे सिद्ध केलं आहे. आपल्या नेतृत्वाकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे. आम्ही आपले आभारी आहोत तुम्ही आज या ठिकाणी उपस्थित राहिलात असं बरुण दास यांनी म्हटलं आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.