Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जेवढा चिखल तुम्ही टाकाल तेवढे कमळ फुलेल…राज्यसभेतील गोंधळात नरेंद्र मोदी यांची टोलेबाजी, रोख कुणावर ?

नरेंद्र मोदी म्हणाले त्यांच्याकडे माती आहे पण माझ्याकडे गुलाल आहे. त्यामुळे मी गुलाल उधळला आहे. विरोधकांच्या गोंधळावर आणि घोषणाबाजीवर नरेंद्र मोदी यांनी खिल्ली उडवली आहे.

जेवढा चिखल तुम्ही टाकाल तेवढे कमळ फुलेल...राज्यसभेतील गोंधळात नरेंद्र मोदी यांची टोलेबाजी, रोख कुणावर ?
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Feb 09, 2023 | 3:17 PM

नवी दिल्ली : जेवढा चिखल तुम्ही टाकाल तेवढे कमळ फुलणार हे खरं आहे. काही लोकांनी कमळ उमलवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण सुरू होत असतांना विरोधकांनी गदारोळ सुरू केला होता. नरेंद्र मोदी यांचं भाषण सुरू होत असतांना विरोधकांनी मोदी-अडाणी भाई-भाई अशा घोषणा देत अडाणीच्या मुद्द्यावरून विचारलेल्या प्रश्नावर नरेंद्र मोदी यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी घोषणाबाजी केल्याचे पाहायला मिळाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत राष्ट्रपती यांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देतांना त्यांनी मोठं भाषण केलं यामध्ये राहुल गांधी यांचे नाव न घेता टीका केली आहे. राहुल यांच्या भाषणातील निवडक बाबींवरच भाष्य केले होते.

त्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अडाणी यांच्याबद्दल विचारलेल्या प्रश्नावर कुठेलेही भाष्य न केल्यानं आजच्या राज्यसभेत विरोधकांनी मोदींना घेरण्याचा प्रयत्न केला आहे.

हे सुद्धा वाचा

राज्यसभेत भाषण करत असतांना विरोधी बाकावर असलेल्या सदस्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण सुरू होताच गदारोळ सुरू केला. यावेळी मोदी-अदानी भाई भाईच्या घोषणा देत मोदींना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

मात्र, नरेंद्र मोदी यांनी गदारोळ सुरू असतांनाही आपले भाषण सुरूच ठेवत टोलेबाजी केली आहे. नरेंद्र मोदी यांनी एवढ्या मोठ्या सभागृहातील भाषणावर देशातील प्रत्येकाचे लक्ष असते. त्यामुळे निराशा होत आहे हे दुर्दैवी असल्याचं मोदी म्हणाले आहे.

याशिवाय विरोधकांच्या गोंधळावर आणि घोषणाबाजीवर नरेंद्र मोदी यांनी खिल्ली उडवली आहे. नरेंद्र मोदी म्हणाले त्यांच्याकडे माती आहे पण माझ्याकडे गुलाल आहे. त्यामुळे मी गुलाल उधळला आहे.

जितका चिखल तुम्ही टाकत जाल तितके कमळ उमलत जाईल. आणि तेच कमळ उमलविण्यात तुमची महत्वाची भूमिका आहे. त्यामुळे तुमचे सर्वांचे आभार मानतो असे म्हणत नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना चिमटा काढला आहे.

यावेळी भाषणात नरेंद्र मोदी यांनी म्हंटलं की आम्ही संकटापासून पळून जाणारे लोक नाही. कधीकाळी ज्यांची ग्रामपंचायत पासून संसदेपर्यन्त सत्ता होती त्यांनी देशासाठी काहीही काम केले नाही.

आज आमच्या सरकारने जगभरात ओळख केली आहे. ती देखील आमच्या कष्टाने केली आहे. असा टोला नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसला लगावला आहे. आम्ही कुठलीही समस्या कायम स्वरूपी सोडवत असतो असं मोदी म्हणाले आहे.

देशातील पाण्याच्या बाबतीत विचार केला जात प्रत्येक घरातील नळ कनेक्शनवर बोललो तर करोडो लोकांना मदत केली आहे. यापूर्वी पाण्याचे टाकीचे उद्घाटन केले आहे. यापूर्वी 3 कोटी घरांना नळ दिले होते आम्ही ते 11 कोटींवर नेले आहे असेही नरेंद्र मोदी यांनी म्हंटलं आहे.

अनेक बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले होते. मात्र अर्ध्याहून अधिक लोकांचे बँकेत खाते नव्हते, आम्ही जनधन योजेनच्या माध्यमातून गरीब नागरिकांना बँकेशी जोडले असून 48 खातेधारक आम्ही बँकेशी जोडले असल्याचे मोदी म्हणाले आहे.

यापूर्वी देशात योजना प्रलंबित ठेवण्याचे काम केलं जायचं. मात्र पीएम गती शक्तीच्या माध्यमातून योजना वेगाने पूर्ण करण्याचे काम आम्ही करत आहोत. गरीबी हटवा असे तुम्ही म्हणायचे पण जनता काम पाहते आहे अशीही टीका मोदींनी कॉंग्रेसवर केली आहे.

कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना.
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका.