AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुष्कर सिंह धामी यांनी घेतली उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ; ज्येष्ठ नेत्यांचाही मंत्रिमंडळात समावेश

पुष्कर सिंह धामी यांनी उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राजभवनात धामी यांना पद आणि गोपनीयतेची आज शपथ घेतली आहे. (Pushkar singh Dhami)

पुष्कर सिंह धामी यांनी घेतली उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ; ज्येष्ठ नेत्यांचाही मंत्रिमंडळात समावेश
Pushkar singh Dhami
Follow us
| Updated on: Jul 04, 2021 | 5:45 PM

डेहराडून: पुष्कर सिंह धामी यांनी उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राजभवनात धामी यांना पद आणि गोपनीयतेची आज शपथ घेतली आहे. त्यांच्यासोबत सतपाल महाराज, हरक सिंह रावत या ज्येष्ठ नेत्यांनीही पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे. तसेच वंशीधर, यशपाल आर्य, बिशन सिंह आणि सुबोध उनियाल यांनाही मंत्रिपदाची शपथ देण्यात आली आहे. (Pushkar Singh Dhami takes oath as CM, Cabinet ministers also sworn in)

आज संध्याकाळी राजभवनात छोटेखानी कार्यक्रमात पुष्कर सिंह धामी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात आली. त्यांच्याबरोबर सतपाल महाराज, धन सिंह रावत, विशन सिंह चुफल, मदन कौशिक, गणेश जोशी, अरविंद पांडे, सुबोध उनियाल, रेखा आर्या, बंशीधर भगत आदी नेतेही शपथ घेण्यासाठी राजभवनात पोहोचले होते.

आधी सतपाल महाराजांना भेटले

धामी यांची मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आल्याने सतपाल महाराज नाराज झाले होते. त्यामुळे पदाची शपथ घेण्यापूर्वी धामी यांनी सतपाल महाराज यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर सतपाल महाराजही मंत्रिमंडळात येण्यास तयार झाल्याचं सूत्रांनी सांगितलं.

कोण आहेत धामी?

पुष्करसिंह धामी हे उत्तराखंडमध्ये भाजपच्या युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्षही होते. 2002 ते 2008 पर्यंत त्यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहिलं आहे. धामी यांचा जन्म टुंडी, पिथौरागड येथे झाला होता. त्यांनी पदव्युत्तर पदवी आणि वकिलीचं शिक्षण घेतलं आहे. त्यांना तीन बहिणी आहेत. त्यांचे वडील माजी सैनिक होते. उत्तराखंडमधील खटीमा विधानसभा मतदारसंघातून ते दोनदा विजयी झाले आहेत. 2012 ते 2017 पर्यंत ते आमदार होते. 2017च्या विधानसभा निवडणुकीत ते पुन्हा निवडून आले. अवघ्या दुसऱ्या टर्ममध्येच त्यांना मुख्यमंत्रीपदाची लॉटरी लागली आहे. त्यांनी 1990 ते 1999पर्यंत एबीव्हीपीमध्ये अनेक पदांवर काम केलं आहे. भाजयुमोच्या अध्यक्षपदी असताना सहा वर्ष राज्यात फिरून बेरोजगार तरुणांचं संघटन उभारल्याचा धामी यांचा दावा आहे. धामी हे खटीमा विधानसभा मतदारसंघातून दोनदा विजयी झाले आहेत. राज्यातील तरुण नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात असून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जवळचेही असल्याचं सूत्रांनी सांगितलं. (Pushkar Singh Dhami takes oath as CM, Cabinet ministers also sworn in)

संबंधित बातम्या:

पुष्कर सिंह धामी यांच्याकडे उत्तराखंडची सूत्रे, राज्याचे 11 वे मुख्यमंत्री म्हणून घेणार शपथ

उत्तराखंडात 10 वर्षात 6 मुख्यमंत्री बदलले; कारण काय? वाचा सविस्तर

तीरथ सिंह रावत यांच्या राजीनाम्यानंतर उत्तराखंडेच्या पुढचा मुख्यमंत्री कोण? ‘ही’ 2 नावं शर्यतीत

(Pushkar Singh Dhami takes oath as CM, Cabinet ministers also sworn in)

काश्मीरवर तोडगा निघणार? डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं मोठं विधान
काश्मीरवर तोडगा निघणार? डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं मोठं विधान.
पाकच्या पंतप्रधानांचं ऐकण्यास मुल्ला मुनिरचा नकार
पाकच्या पंतप्रधानांचं ऐकण्यास मुल्ला मुनिरचा नकार.
अमेरिकाके पापाने वॉर रुकवा दिया क्या?, युद्धबंदीवर राऊतांची विखारी टीक
अमेरिकाके पापाने वॉर रुकवा दिया क्या?, युद्धबंदीवर राऊतांची विखारी टीक.
पाकिस्तान बॅकफूटवर, 5 वाजेपासून युद्धविराम, दोन्ही देशांकडून सहमती अन
पाकिस्तान बॅकफूटवर, 5 वाजेपासून युद्धविराम, दोन्ही देशांकडून सहमती अन.
भारत-पाक तणावादरम्यान मुंबईकरांसाठी मोठी बातमी, आता 9 जूनपर्यंत....
भारत-पाक तणावादरम्यान मुंबईकरांसाठी मोठी बातमी, आता 9 जूनपर्यंत.....
मोदी सरकारचा दहशतवादाविरुद्ध मोठा निर्णय, यापुढे तसं कृत्य युद्ध ठरेल
मोदी सरकारचा दहशतवादाविरुद्ध मोठा निर्णय, यापुढे तसं कृत्य युद्ध ठरेल.
भारतीय लष्कराकडून सैन्याच्या शौर्याचा व्हिडीओ शेअर, एकदा बघाच...
भारतीय लष्कराकडून सैन्याच्या शौर्याचा व्हिडीओ शेअर, एकदा बघाच....
VIDEO: पाकच्या रहिम यार खान एअरबेसचा चक्काचूर अन् धावपट्टीही उद्ध्वस्त
VIDEO: पाकच्या रहिम यार खान एअरबेसचा चक्काचूर अन् धावपट्टीही उद्ध्वस्त.
चिनाब नदीवरील सलाल धरणातून पाणी सोडलं, पाकिस्तानात पूर येणार?
चिनाब नदीवरील सलाल धरणातून पाणी सोडलं, पाकिस्तानात पूर येणार?.
पाकिस्तानचा कांगावा, 'तो' दावा खोटा, भारतीय लष्कराने दिला पुरावा
पाकिस्तानचा कांगावा, 'तो' दावा खोटा, भारतीय लष्कराने दिला पुरावा.