AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ram Mandir : अयोध्येतून आलेल्या अक्षता तुम्हाला ही मिळाल्या का? जाणून घ्या त्याचं काय करायचं

Ayodhya ram mandir : सध्या देशात सगळीकडे राममय वातावरण पाहायला मिळत आहे. अयोध्येत श्री राम विराजमान होणार आहेत. त्याआधी रामभक्त आपल्या सर्वांपर्यंत अक्षता घेऊय पोहोचले आहेत. त्यामुळे अनेकांना या अक्षतांचे करायचे काय असा प्रश्न पडला आहे. जाणून घ्या त्या अक्षता का देण्यात आल्या आहेत.

Ram Mandir : अयोध्येतून आलेल्या अक्षता तुम्हाला ही मिळाल्या का? जाणून घ्या त्याचं काय करायचं
Follow us
| Updated on: Jan 20, 2024 | 8:36 PM

Ayodhya Akshata : अयोध्येतील राम मंदिरात रामलल्ला विराजमान झाले असून सोमवारी २२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते प्राणप्रतिष्ठा होणार आहे. ज्या दिवसाची शेकडो वर्षापासून वाट पाहिली जात होती. तो दिवस अखेर जवळ आला आहे. भव्य असे राम मंदिर बनून तयार आहे. राम मंदिरात होत असलेल्या या सोहळ्याच्या निमित्ताने जगभरातील राम भक्तांच्या मनात उत्साहाचे वातावरण आहे. हा दिवस दिवाळीसारखा साजरा केला जाणार आहे. या दिवसाचे साक्षीदार होण्यासाठी देशभरातून नाही तर जगभरातून हजारो लोक अयोध्येत येणार आहेत. २२ जानेवारी रोजी मोजक्या लोकांनाच येथे प्रवेश मिळणार आहे. त्यानंतर मात्र सर्वांसाठी हे मंदिर खुले होणार आहे.

सध्या घरोघरी जावून रामभक्त लोकांना अयोध्येतून आलेल्या अक्षत: देत आहेत. याच्या माध्यमातून लोकांना अयोध्येत येण्याचे निमंत्रण देखील दिल जात आहे. पण अनेक लोकांच्या मनात हा प्रश्न आहे की, या अक्षत:चे करायचे काय.

अक्षता देऊन निमंत्रण देण्याची जुनी पंरपरा

भारतीय परंपरेनुसार, प्राचीन काळापासून लोकं त्यांच्या घरी कोणत्याही शुभ कार्यासाठी लोकांना आमंत्रित करण्यासाठी अक्षताचा वापर करत असत. लग्नाची पत्रिका देताना देखील अनेक जण सोबत अक्षत: देतात. जे हळदीने रंगवलेले असतात. कारण हिंदू धर्मात त्याला विशेष महत्त्व आहे. कोणत्याही धार्मिक कार्यात अक्षता वापरल्या जातात.

निमंत्रणात दिलेल्या अक्षताचं काय करायचं?

ज्योतिषशास्त्रानुसार तांदूळ हे शुक्र ग्रहाचे प्रतिनिधी आहे. ज्यामुळे धन आणि वैभव प्राप्त होते. त्यामुळे ते तांदूळ तुम्ही लाल रेशमी कापडात बांधून तिजोरीत ठेवू शकता. यामुळे घरामध्ये सुख-समृद्धी देखील येतेय.

तुम्ही हे अक्षता तुमच्या देवघरात देखील ठेवू शकता. किंवा तुमच्या जवळच्या मंदिरात देखील जावून देवावर अर्पण करु शकता. तुम्ही तुमच्या घरी एखाद्या शुभकार्यात देखील त्याचा वापर करु शकता.

ज्यांच्या घरात विवाह होणार असेल. त्या अक्षतांमध्ये देखील हे अक्षता तुम्ही मिसळू शकता. या शिवाय औक्षण करताना देखील हे तांदूळ तुम्ही वापरु शकता.

भारताचा श्वास बंद करणार, म्हणणाराच घाबरला...हाफीज सईदला पुरवली सुरक्षा
भारताचा श्वास बंद करणार, म्हणणाराच घाबरला...हाफीज सईदला पुरवली सुरक्षा.
'पुष्पा'मुळे ओळख...अल्लू अर्जुनच्या आयुष्याला ‘पुष्पा 2’ नंतर कलाटणी
'पुष्पा'मुळे ओळख...अल्लू अर्जुनच्या आयुष्याला ‘पुष्पा 2’ नंतर कलाटणी.
मिस्टर इंडिया 2 बद्दल शेखर कपूरांचा दावा, ChatGPTचा उल्लेख करत म्हणाले
मिस्टर इंडिया 2 बद्दल शेखर कपूरांचा दावा, ChatGPTचा उल्लेख करत म्हणाले.
पाकड्यांची तंतरली, पाकच्या नौदल प्रमुखांचं मोठं वक्तव्य, आपल्याला....
पाकड्यांची तंतरली, पाकच्या नौदल प्रमुखांचं मोठं वक्तव्य, आपल्याला.....
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी; आता अमेरिका भारताला...
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी; आता अमेरिका भारताला....
पाकड्यांच्या LOC वर कुरापती काही थांबेना, सलग सातव्या दिवशी...
पाकड्यांच्या LOC वर कुरापती काही थांबेना, सलग सातव्या दिवशी....
पाकचे धाबे दणाणले; पाकिस्तानने हाफिज सैदच्या सुरक्षेत वाढ केली
पाकचे धाबे दणाणले; पाकिस्तानने हाफिज सैदच्या सुरक्षेत वाढ केली.
भारताचा पाकड्यांना दणका, येत्या २३ मेपर्यंत बसणार मोठा आर्थिक फटका
भारताचा पाकड्यांना दणका, येत्या २३ मेपर्यंत बसणार मोठा आर्थिक फटका.
बीड दौऱ्यावर असताना मनोज जरांगेंची प्रकृती खालावली
बीड दौऱ्यावर असताना मनोज जरांगेंची प्रकृती खालावली.
लाडक्या बहिणींनो आता एप्रिलचा हफ्ता कधी? आदिती तटकरेंनी थेट सांगितलं..
लाडक्या बहिणींनो आता एप्रिलचा हफ्ता कधी? आदिती तटकरेंनी थेट सांगितलं...