AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tamilnadu election 2021 : तामिळनाडूचे मुख्यमंत्री पंतप्रधान मोदींपुढे झुकतात तेव्हा वाईट वाटतं – राहुल गांधी

चेन्नई इथं प्रचारसभेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी भाजप आणि अण्णाद्रमुकवर जोरदार निशाणा साधला.

Tamilnadu election 2021 : तामिळनाडूचे मुख्यमंत्री पंतप्रधान मोदींपुढे झुकतात तेव्हा वाईट वाटतं - राहुल गांधी
तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची प्रचार रॅली
| Updated on: Mar 28, 2021 | 3:16 PM
Share

चेन्नई : काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी हे सध्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या प्रचार दौऱ्यावर आहेत. चेन्नई इथं प्रचारसभेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी भाजप आणि अण्णाद्रमुकवर जोरदार निशाणा साधला. “तामिळनाडूचे मुख्यमंत्री जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचे पाय धरतात, त्यांच्यासमोर झुकतात, ते पाहून वाईट वाटतं”, अशा शब्दात राहुल गांधी यांनी भाजप आणि अण्णाद्रमुकवर टीका केलीय.(Congress MP Rahul Gandhi criticizes BJP and AIADMK in Chennai)

तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना पंतप्रधान कंट्रोल करतात आणि मुख्यमंत्री निमूटपणे त्यांचे पाय धरतात, हे मी स्वीकार करु शकत नाही, असंही राहुल गांधी यांनी म्हटलंय. “मी एक फोटो पाहिला आहे. ज्यात निवडून आलेले लोकप्रतिनिधी अमित शाहांच्या पाया पडत आहेत. हा प्रकार भाजपमध्येच होऊ शकतो, जिथे तुम्हाला भाजप नेत्यांचे पाय धरावे लागतात. जिथे नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यासमोर सर्वांना झुकावं लागतं”, अशी टीकाही राहुल गांधी यांनी भाजपवर केलीय.

‘तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांचाही नाईलाज आहे’

“जेव्हा मी पंतप्रधानांना तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना कंट्रोल करताना पाहतो. मुख्यमंत्र्यांनी निमुटपणे त्यांचे पाय धरलेले पाहिलं आहे. मी हा प्रकार स्वीकारला तयार नाही. तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनाही अमित शाह यांच्यासमोर झुकायला आवडत नाही. पण त्यांनी जो भ्रष्टाचार केला आहे. त्यामुळे त्यांचाही नाईलाज आहे”, अशा शब्दात राहुल गांधी यांनी अण्णाद्रमुकवर टीकास्त्र डागलं आहे. राहुल गांधी यांनी आज चेन्नईमध्ये काँग्रेस उमेदवार हसन हारुन यांच्या समर्थनात प्रचारसभा घेतली. हसन हारुन हे वेलाचेरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

संबंधित बातम्या :

Bengal-Assam Election voting : पहिल्या टप्प्यात पश्चिम बंगालमध्ये 79.79 टक्के, तर आसाममध्ये 72.14 टक्के मतदान

West Bengal Election 2021 : तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयात बॉम्बस्फोट, TMC नेत्यांचा डावे आणि काँग्रेसवर आरोप

Congress MP Rahul Gandhi criticizes BJP and AIADMK in Chennai

नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल.
दमानियांचा सुषमा अंधारे यांना पाठिंबा; शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी
दमानियांचा सुषमा अंधारे यांना पाठिंबा; शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी.
सनसनाटी निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न! शंभूराज देसाईंचा टोला
सनसनाटी निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न! शंभूराज देसाईंचा टोला.
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.