AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गौतम बुद्धांचा प्रेम, करुणा, अहिंसा आणि निसर्गाशी एकरूप होऊन जगणं आजच्या समाजासाठी आवश्यक, मुख्यमंत्री केसीआर यांचं प्रतिपादन

अडीच हजार वर्षांपूर्वी जागतिक मानवतेला शांततामय सहअस्तित्वाचे तत्त्व देणारे बुद्ध ज्या भूमीवर चालले, त्या भूमीवर राहण्याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटला पाहिजे, असं मुख्यमंत्री यांनी नमूद केलं.

गौतम बुद्धांचा प्रेम, करुणा, अहिंसा आणि निसर्गाशी एकरूप होऊन जगणं आजच्या समाजासाठी आवश्यक, मुख्यमंत्री केसीआर यांचं प्रतिपादन
| Updated on: May 06, 2023 | 2:10 AM
Share

हैदराबाद | “गौतम बुद्धांचा प्रेम, करुणा, अहिंसा आणि निसर्गाशी सुसंगत राहण्याचा मार्ग आजच्या समाजासाठी अत्यंत आवश्यक आहे. गौतम बुद्धांच्या शिकवणुकीचे आचरण करून मानवी जीवन परिपूर्ण बनवता येतं”, असं मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी सर्वांना गौतम बुद्ध जयंती आणि बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी मुख्यमंत्री केसीआर यांनी बुद्धाच्या शिकवणी आणि उपक्रमांचे स्मरण केलं.

अडीच हजार वर्षांपूर्वी जागतिक मानवतेला शांततामय सहअस्तित्वाचे तत्त्व देणारे बुद्ध ज्या भूमीवर चालले, त्या भूमीवर राहण्याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटला पाहिजे, असं मुख्यमंत्री यांनी नमूद केलं. “भगवान बुद्धांनी रंग, जात इत्यादींच्या आधारे भेदभाव आणि द्वेषाच्या विरोधात शिकवलेली सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक तत्त्वे अमर आहेत. जोपर्यंत मानव समाज आहे तोपर्यंत बुद्धाची शिकवण समर्पक राहील” असं केसीआर यांनी सांगितलं.

तेलंगणाच्या भूमीवर बौद्ध धर्माचा प्रसार होणे ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब असल्याचंही केसीआर यांनी स्पष्ट केलं. तेलंगणातील सामाजिक जीवन आणि संस्कृतीची मुळे बौद्ध धर्मात आहेत. तेलंगणात बौद्ध धर्माचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला. कृष्णा गोदावरीच्या खोऱ्यात हजारो वर्षांपासून चमकणारे बुद्ध हे आजही त्याचा जिवंत पुरावा आहे”, असे मुख्यमंत्री केसीआर यांनी सांगितलं.

राज्य सरकारने नागार्जुन सागर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विकसित केलेले ‘बुद्धवनम’ जगभरातील पर्यटकांना आकर्षित करत आहे. “संपूर्ण तेलंगणात पसरलेल्या प्राचीन बौद्ध मंदिरांचे पुनरुज्जीवन करून मध्य तेलंगणात बुद्धाची शिकवण जगासमोर मांडण्याच्या निर्धाराने राज्य सरकारचे उपक्रम सुरू आहेत. तेलंगणातील लोक सर्व क्षेत्रात आनंदाने राहावेत यासाठी सरकार सतत प्रयत्न करत आहे. राज्य सरकार एससी, एसटी, अल्पसंख्याक, महिला, सर्व लोकांच्या विकासासाठी योजना राबवून गौतम बुद्धांच्या आकांक्षांना आदरांजली अर्पण करत आहे”, असंही शेवटी केसीआर म्हणाले.

भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.