AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घुसखोरी करणारा एकही अतिरेकी जिवंत परतणार नाही; लष्करप्रमुखांचा निर्वाणीचा इशारा

जम्मू-काश्मीरच्या नागरोटा येथे आज पहाटे झालेल्या अतिरेकी आणि भारतीय जवानांच्या चकमकीत जैश-ए-मोहम्मदच्या चार अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला. त्यानंतर भारतीय लष्कराचे प्रमुख एम. एम. नरवणे यांनी भारतात घुसखोरी करणाऱ्या अतिरेक्यांना सज्जड दम भरला आहे.

घुसखोरी करणारा एकही अतिरेकी जिवंत परतणार नाही; लष्करप्रमुखांचा निर्वाणीचा इशारा
Follow us
| Updated on: Nov 19, 2020 | 8:57 PM

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या नागरोटा येथे आज पहाटे झालेल्या अतिरेकी आणि भारतीय जवानांच्या चकमकीत जैश-ए-मोहम्मदच्या चार अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला. त्यानंतर भारतीय लष्कराचे प्रमुख एम. एम. नरवणे यांनी भारतात घुसखोरी करणाऱ्या अतिरेक्यांना सज्जड दम भरला आहे. सीमेवरून भारतात होणारा घुसखोरीचा कोणताही प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही. नियंत्रण रेषेवरून घुसखोरीचा प्रयत्न केल्यास एकही अतिरेकी जिवंत परतणार नाही, असा निर्वाणीचा इशाराच नरवणे यांनी दिला आहे. (Terrorists crossing LoC won’t be able to survive: Army Chief)

नियंत्रण रेषेवरून होणारी घुसखोरी खपवून घेतली जाणार नाही. या घुसखोरी करणाऱ्या अतिरेक्यांना तिथल्या तिथेच कंठस्नान घातल्या जाईल. हे अतिरेकी परत पाकिस्तानात जाऊ शकणार नाहीत. हा संदेश पाकिस्तान आणि त्यांच्या अतिरेक्यांसाठी पुरेसा आहे, असं नरवणे यांनी म्हटलं आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हे स्पष्ट केलं.

यावेळी लष्करप्रमुख नरवणे यांनी तांदळाच्या पोत्यांनी भरलेल्या ट्रकमधून जाणाऱ्या अतिरेक्यांविरोधात भारतीय जवानांनी यशस्वी ऑपरेशन केल्याबद्दल जवानांचं कौतुक केलं. भारतीय सेना, जम्मू-काश्मीर पोलीस आणि अर्ध सैनिक दालातील उत्तम समन्वयामुळेच हे ऑपरेशन यशस्वी होऊ शकल्याचं त्यांनी सांगितलं. सुरक्षा दलाने केलेलं हे अत्यंत यशस्वी ऑपरेशन होतं. सुरक्षा दलाच्या उत्तम समन्वय आणि सुसंगततेचं हे उत्तम उदाहरण होतं. त्यामुळे आमच्या देशात जो कोणी घुसखोरी करण्याचा प्रयत्न करेल त्याला अशा पद्धतीनेच परिणामाला सामोरे जावं लागेल, असा संदेशच या ऑपरेशनमधून गेला असल्याचं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, जम्मू-काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात आज पहाटे अतिरेकी आणि भारतीय जवानांमध्ये झालेल्या चकमकीत चार अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात आले. या चकमकीत एक पोलीस कॉन्स्टेबल जखमी झाला आहे. जम्मू-श्रीनगर महामार्गावरील बान टोलनाक्यावर गुरुवारी पहाटे पाच वाजता दहशतवादी आणि भारतीय जवान आमनेसामने आले. यानंतर दोन्ही बाजूंनी तुफान गोळीबार सुरु झाला. या पार्श्वभूमीवर नागरोटा परिसरातील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून जम्मू-श्रीनगर महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या:

पाकिस्तानमधील अनेक दहशतवादी बंकर्स उद्ध्वस्त, भारताची धडाकेबाज कारवाई

काश्मीरमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक; चार दहशतवाद्यांचा खात्मा, एक पोलीस जखमी

लडाखमध्ये मायनस 40 डिग्रीतही चीनला आव्हान देणार, थंडीसाठी भारतीय सैन्याची चोख व्यवस्था

(Terrorists crossing LoC won’t be able to survive: Army Chief)

श्रीगंगागनगरमध्ये बॉर्डवर बीएसएफकडून पाकिस्तानी जवानाला अटक
श्रीगंगागनगरमध्ये बॉर्डवर बीएसएफकडून पाकिस्तानी जवानाला अटक.
लाडक्या बहिणींना 500 रुपये देणं ही फसवणूक; राऊतांची महायुतीवर टीका
लाडक्या बहिणींना 500 रुपये देणं ही फसवणूक; राऊतांची महायुतीवर टीका.
पीएम मुद्रा योजनेनं पालटलं कोट्यवधी भारतीयांचं नशीब; कसा करायचा अर्ज?
पीएम मुद्रा योजनेनं पालटलं कोट्यवधी भारतीयांचं नशीब; कसा करायचा अर्ज?.
शेतकरी ओळखपत्र नसेल तर मिळणार नाहीत लाभ; अशी करा नोंदणी..
शेतकरी ओळखपत्र नसेल तर मिळणार नाहीत लाभ; अशी करा नोंदणी...
पंतप्रधान मुर्ख बनवतात, पाकिस्तानचा काहीही बदला घेतला नाही - संजय राऊत
पंतप्रधान मुर्ख बनवतात, पाकिस्तानचा काहीही बदला घेतला नाही - संजय राऊत.
भारताचा पाकिस्तानला पूर्णपणे व्यापारावर बंदीचा दणका
भारताचा पाकिस्तानला पूर्णपणे व्यापारावर बंदीचा दणका.
सर्जिकल स्ट्राईकच्या वादग्रस्त वक्तव्यावरून कॉंग्रेस खासदाराचं घुमजाव
सर्जिकल स्ट्राईकच्या वादग्रस्त वक्तव्यावरून कॉंग्रेस खासदाराचं घुमजाव.
मुख्यमंत्री व्हावं वाटतं अन् कधी ना कधी... दादांना म्हणायचंय तरी काय?
मुख्यमंत्री व्हावं वाटतं अन् कधी ना कधी... दादांना म्हणायचंय तरी काय?.
'लाडकी बहीण'च्या निधीवरून शिरसाट भडकले, थेट दादांच्या खात्यावर निशाणा
'लाडकी बहीण'च्या निधीवरून शिरसाट भडकले, थेट दादांच्या खात्यावर निशाणा.
पाकिस्तानच्या मंत्र्यानं डिवचलं, पुढच्याच क्षणी भारतानं दाखवला इंगा
पाकिस्तानच्या मंत्र्यानं डिवचलं, पुढच्याच क्षणी भारतानं दाखवला इंगा.