AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

UPSC Success story : चहाच्या टपरीवर काम करणारा जेव्हा आधी IPS आणि मग IAS होतो

कोणतीही अवघड गोष्ट मिळवायची असेल तर त्यासाठी संघर्ष करावाच लागतो. सहजच कोणतीही गोष्ट मिळत नाही. यूपीएससी सारखी परीक्षा जर पास करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला जिद्द आणि चिकाटी हवीच. तरच या परीक्षेत पास होता येतं. एक चहा विक्रेता आयपीएस आणि आयएएस अधिकारी होतो. कोण आहेत ते अधिकारी.

UPSC Success story : चहाच्या टपरीवर काम करणारा जेव्हा आधी IPS आणि मग IAS होतो
Follow us
| Updated on: Mar 26, 2024 | 6:15 PM

UPSC EXAM : एखादी गोष्ट करण्याची जिद्द असेल तर तुम्ही कोणतेही यश मिळवू शकता. यूपीएससी परीक्षा पास होण्यासाठी देखील तेच लागतं. जिद्द आणि चिकाटी या दोन गोष्टीच्या आधारावर या परीक्षेत पास होता येतं. या परीक्षा पास होण्यासाठी अनेकजण म्हणतात की, कोचिंग क्लासेस शिवाय हे शक्य नाही. पण देशात असे अनेक उदाहरणं आहेत ज्यांंनी कोणत्याही कोचिंग शिवाय या परीक्षेत यश मिळवलं आहे.गरिबीचा सामना करणाऱ्या कुटुंबातील मुले देखील यात यशस्वी होतात. अशाच एका मुलाची कहाणी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ज्याचे वडील मजूर होते. तो स्वतः चहा विकायचा पण आता तोच आयएएस अधिकारी झाला आहे.

शाळेत जाण्यासाठी रोज ७० किमीचा प्रवास

हिमांशू गुप्ता यांचे बालपण अत्यंत गरिबीत गेले. शाळेत जाण्यासाठी दररोज ते 70 किमीचा प्रवास करत होते. एवढेच नाही तर वडिलांना मदत करण्यासाठी एकेकाळी चहाच्या दुकानात देखील काम केले. उत्तराखंडच्या हिमांशू गुप्ता यांनी आपल्या मेहनतीने UPSC परीक्षा (UPSC Civil Service Exam) उत्तीर्ण केली आणि IAS अधिकारी बनले.

यूपीएससी उत्तीर्ण करून आयएएस झालेल्या हिमांशू गुप्ताचे वडील रोजंदारीवर काम करायचे. पैसे कमावण्यासाठी ते चहाचा टपरीही चालवत असत पण त्यांनी आपल्या मुलाच्या शिक्षणात कधीही तडजोड केली नाही.

सलग तीन वेळा परीक्षा पास

हिमांशू गुप्ता यांनी 2018 मध्ये पहिल्यांदा UPSC परीक्षा उत्तीर्ण केली, जेव्हा त्याची भारतीय रेल्वे वाहतूक सेवा (IRTS) साठी निवड झाली. त्यांनी 2019 मध्ये पुन्हा परीक्षा दिली आणि दुसऱ्या प्रयत्नात भारतीय पोलीस सेवेसाठी (IPS) निवड झाली. आणि त्यानंतर 2020 मध्ये तिसऱ्या प्रयत्नात त्यांची भारतीय प्रशासकीय सेवेत (IAS) निवड झाली.

हिमांशू गुप्ता म्हणतात – ‘मी शाळेत जाण्यापूर्वी आणि नंतर माझ्या वडिलांसोबत काम करायचो. शाळा 35 किमी अंतरावर होती, येण्या-जाण्याचे अंतर 70 किमी होते. जेव्हा माझे वर्गमित्र आमच्या चहाच्या स्टॉलजवळून जायचे तेव्हा मी लपून बसायचे. पण एकदा कोणीतरी मला तिथे पाहिलंच आणि माझी चेष्टा करायला सुरुवात केली. मला ‘चायवाला’ म्हटले जाऊ लागले. पण त्याकडे लक्ष देण्याऐवजी मी माझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केले आणि मला वेळ मिळेल तेव्हा माझ्या वडिलांना मदत केली. आमचे घर चालवण्यासाठी आम्ही मिळून दिवसाला ४०० रुपये कमवायचो.

‘माझी स्वप्न मोठी होती’

‘पण माझी स्वप्ने मोठी होती. मी शहरात राहण्याचे आणि माझे आणि माझ्या कुटुंबासाठी चांगले जीवन जगण्याचे स्वप्न पाहिले होते. पप्पा अनेकदा म्हणायचे, ‘स्वप्न साकार करायचे असेल तर अभ्यास कर!’ मी तेच केले. मला माहीत होते की जर मी कठोर परीश्रम घेतले तरच मला प्रतिष्ठित विद्यापीठात प्रवेश मिळेल. पण मला इंग्रजी येत नव्हते, म्हणून मी इंग्रजी चित्रपटाच्या DVD विकत घ्यायचो आणि शिकण्यासाठी त्या बघायचो.

'पहलगाम'वरून मविआतील मतभेद उघड, पवार अन् राऊतांचं वेगळं मत
'पहलगाम'वरून मविआतील मतभेद उघड, पवार अन् राऊतांचं वेगळं मत.
‘सिंधू’ करार स्थगितीचा प्लॅन ठरला... पाकिस्तानवर 'वॉटर स्ट्राईक'
‘सिंधू’ करार स्थगितीचा प्लॅन ठरला... पाकिस्तानवर 'वॉटर स्ट्राईक'.
'ही आमची चूक...', पाकच्या रक्षा मंत्री ख्वाजा आसिफ यांची मोठी कबुली
'ही आमची चूक...', पाकच्या रक्षा मंत्री ख्वाजा आसिफ यांची मोठी कबुली.
पहलगाम हल्ल्यानंतर काहीतरी मोठं घडणार? शाहांकडून बैठकांचा सपाटा अन्...
पहलगाम हल्ल्यानंतर काहीतरी मोठं घडणार? शाहांकडून बैठकांचा सपाटा अन्....
'काश्मीर जन्नत', हल्ल्यानंतर पहलगाम पर्यटकांनी फुललं, सध्या माहौल कसा?
'काश्मीर जन्नत', हल्ल्यानंतर पहलगाम पर्यटकांनी फुललं, सध्या माहौल कसा?.
'शरद पवारांनी मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांकडून घटना ऐकावी, मग...'
'शरद पवारांनी मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांकडून घटना ऐकावी, मग...'.
पहलगामच्या हल्ल्यात आदिलचा मृत्यू, शिंदेंनी घेतला झटक्यात मोठा निर्णय!
पहलगामच्या हल्ल्यात आदिलचा मृत्यू, शिंदेंनी घेतला झटक्यात मोठा निर्णय!.
सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक
सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक.
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'.
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली.