भाजपला यंदा कोणामुळे बसला इतका मोठा झटका, प्रशांत किशोर यांनी सांगितलं कारण

लोकसभा निवडणुकीत यंदा भाजपला मोठा धक्का बसला आहे. बहुमताचा आकडा भाजपला गाठता आला नाही. अनेक मोठे नेते पराभूत झालेत. काय आहे यामागचं कारण. कोणाची झाली चूक, प्रशांत किशोर यांनी सांगितलं कारण

भाजपला यंदा कोणामुळे बसला इतका मोठा झटका, प्रशांत किशोर यांनी सांगितलं कारण
Follow us
| Updated on: Jun 07, 2024 | 11:52 PM

प्रशांत किशोर यांनी आज लोकसभा निवडणुकीत भाजपला झालेल्या पराभवाचे कारण सांगितले आहे. भाजपला या निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. बहुमताचा आकडा गाठता न आल्याने भाजपला एनडीएमधल्या घटकपक्षांसोबत सरकार स्थापन करावे लागणार आहे. पण भाजपला हा मोठा झटका का लागला, याला जबाबदार कोण, हे देखील प्रशांत किशोर यांनी सांगितले आहे. आम्ही नक्कीच जिंकू, असा विश्वास भाजपने कायम ठेवल्याचे प्रशांत किशोर म्हणाले. भाजपचे 208 जुने खासदार विजयी झालेत. पण जिथे उमेदवार न पाहता कोणालाही तिकीट दिले गेले तिथेच पराभवाचा धक्का बसला आहे. पश्चिम बंगाल, बिहार इत्यादी ठिकाणी अशी उमेदवारी दिल्याने त्यांचा पराभव झाला. भाजपला माहित होते आणि त्यांच्या अंतर्गत सर्वेक्षणात कोणते उमेदवार पराभूत होत आहेत हे देखील समोर आले होते, परंतु त्यांनी काळजी न करता पंतप्रधान मोदींची सभा झाली तर विजय होईल असे सांगितले. अशा अनेक जागा आहेत जिथे भाजपने सर्वेक्षणाच्या विरोधात जाऊन तिकिटे दिली.

भाजपचे नुकसान होण्याचे कारण काय

निकालानंतर इंडिया टुडेशी बोलताना निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनीही भाजपचे नुकसान होण्याचे कारण देखील सांगितले. प्रशांत किशोर म्हणाले की,  “ अब की बार 400 पार यात काही चूक नव्हती, पण ती अर्धी घोषणा होती. त्यांना 400 का हवे आहे हे त्यांनी स्पष्ट सांगायला हवे होते. 2014 मध्ये म्हटले होते की, बहुत हो गई महंगाई की मार, अब की बार मोदी सरकार. कारण तेव्हा त्यांना महागाई कमी करायची आहे. यावेळी तुम्ही 400 च्या पुढे म्हणालात. यामुळे काही लोकांना तो अहंकार वाटू लागला. तर काहींना हे षडयंत्र वाटले, ज्याचे भांडवल करून विरोधकांनी म्हटले की, संविधान बदलण्यासाठी त्यांना ४०० पार हवेत आहेत..

काय झाली मोठी चूक

प्रशांत किशोर पुढे म्हणाले की, भाजपचा 400 पासचा नारा ज्याने लिहिला. ही त्याची सर्वात मोठी चूक होती. याशिवाय भाजपच्या काही नेत्यांनी त्यांना संविधान बदल्यासाठी ४०० जागा द्या असे म्हटल्याने ते सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यामुळे भाजपचे सर्वाधिक नुकसान झाले.

प्रशांत किशोर पुढे म्हणाले की, जे भाजप आणि पंतप्रधान मोदींना विरोध करत होते, त्यांचा एकच उद्देश होता. आम्हाला भाजपला कोणत्याही परिस्थितीत रोखायचे आहे. उदाहरणार्थ, वाराणसीच्या जागेवर, 2014 च्या तुलनेत पीएम मोदींच्या मतांची टक्केवारी केवळ दोन टक्क्यांनी कमी झाली, पण विरोधकांच्या मतांची टक्केवारी 20 टक्क्यांवरून 41 टक्क्यांपर्यंत वाढल्याने विजयाचे अंतर खूपच कमी झाले. जो हरतोय त्यालाच मत द्यायचं हे लोकांना माहीत होतं. वाराणसीमधून पीएम मोदींनी काँग्रेस आणि सपा इंडिया आघाडीचे उमेदवार अजय राय यांचा दीड लाख मतांनी पराभव केला आहे, तर गेल्या लोकसभा निवडणुकीत पीएम मोदींनी जवळपास 4 लाख 80 हजार मतांनी विजय मिळवला होता.

Non Stop LIVE Update
विधानपरिषदेत शिवीगाळ, भर सभागृहात दानवेंनी कोणाला वापरली अर्वाच्य भाषा
विधानपरिषदेत शिवीगाळ, भर सभागृहात दानवेंनी कोणाला वापरली अर्वाच्य भाषा.
मुंबई पदवीधर मतदारसंघात अनिल परब vs किरण शेलारांमध्ये लढत, आघाडीवर कोण
मुंबई पदवीधर मतदारसंघात अनिल परब vs किरण शेलारांमध्ये लढत, आघाडीवर कोण.
नाहीतर भिडेंच्या मिशा कापणार, 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावरून कुणी घेरल?
नाहीतर भिडेंच्या मिशा कापणार, 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावरून कुणी घेरल?.
विधान परिषदेसाठी भाजपकडून ही 5 नावं जाहीर, मुंडेंसह कोणाची लागली वर्णी
विधान परिषदेसाठी भाजपकडून ही 5 नावं जाहीर, मुंडेंसह कोणाची लागली वर्णी.
पंकजा मुंडेंचं भाजपकडून पुनर्वसन, विधान परिषदेची उमेदवारी मिळाली
पंकजा मुंडेंचं भाजपकडून पुनर्वसन, विधान परिषदेची उमेदवारी मिळाली.
हे काय मॅच जिंकणार! विधानसभेत त्यांच्या...'त्या' दाव्यावर कुणाचा टोला?
हे काय मॅच जिंकणार! विधानसभेत त्यांच्या...'त्या' दाव्यावर कुणाचा टोला?.
आम्ही 13 जुलैपर्यंतच वाट बघणार, त्यानंतर...जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम
आम्ही 13 जुलैपर्यंतच वाट बघणार, त्यानंतर...जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम.
मनोज जरांगे साहेब, जरा शब्दांना...शिंदे गटाच्या महिला नेत्यानं सुनावलं
मनोज जरांगे साहेब, जरा शब्दांना...शिंदे गटाच्या महिला नेत्यानं सुनावलं.
कुटुंबातील 17 जण पिकनीकला, भावाचा फोन अन् घाबरतच म्हणाला, मुलगी वाहून
कुटुंबातील 17 जण पिकनीकला, भावाचा फोन अन् घाबरतच म्हणाला, मुलगी वाहून.
सत्तेची वारी शेवटची..माझी लाडकी बहीण योजनेवरून सामनातून दादांवर निशाणा
सत्तेची वारी शेवटची..माझी लाडकी बहीण योजनेवरून सामनातून दादांवर निशाणा.