AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Business Empire :  वाडवडिलांचा जपला वारसा, पुढील पिढीने उभे केले अब्जावधींचे साम्राज्य

Business Empire : देशात अनेक दिग्गज घराणी आहेत. काहींच्या अगोदरच्या पिढीचे संचित म्हणून दुसऱ्या पिढीने पण त्यांचा व्यवसाय वाढवला. काहींना आता सुरुवात करत मोठा वटवृक्ष तयार केला. दुसरी पिढी व्यवसायाचा डोलारा सांभाळायला सज्ज झाली आहे. टाटा, अंबानी, अदानीपासून अनेक समूहात आता खांदेपालट सुरु आहे.

Business Empire :  वाडवडिलांचा जपला वारसा, पुढील पिढीने उभे केले अब्जावधींचे साम्राज्य
Follow us
| Updated on: Sep 09, 2023 | 2:04 PM

भारतात गेल्या काही वर्षांपासून अनेक अब्जाधीशांनी पुढील सोबत घेत आज मोठे साम्राज्य तयार केले आहे. काहींच्या अगोदरच्या पिढीने उद्योग व्यवसायात पाऊल टाकले. पुढील पिढीने पण उद्योग व्यवसाय वाढीसाठी मेहनत घेतली. भारतातील अनेक मोठ्या उद्योगांची हीच कर्मकहाणी आहे.

व्यवसाय, उद्योग सुरु करणाऱ्या पहिल्या पिढीला अनेक संकटाचा, अडचणींचा सामना करावा लागला. जिद्द, चिकाटीने त्यांनी प्रचंड कमाई केली. कंपन्यांना नवीन उंचीवर नेऊन ठेवले. यामध्ये पहिले नाव जमशेदजी टाटा यांचे येते.

जमशेद टाटा यांना भारतीय उद्योगाचे जनक म्हणण्यात येते. त्यांनी आयरन आणि स्टील कंपनीची स्थापना केली होती. त्यानंतर टाटा समूह तयार झाला. आज जगातील मोठ्या कंपन्यांमध्ये या कंपनीचे नाव आहे. रतन टाटा आणि दोराब टाटा यांनी हा समूह मोठा केला. त्यांनी त्यासाठी मेहनत घेतली.

हे सुद्धा वाचा

धीरुभाई अंबानी यांच्या प्रयत्नांनी रिलायन्स कमर्शिअल कॉर्पोरेशनची स्थापना झाली. त्यांच्या दूरदृष्टीने आजचा रिलायन्स समूह उभा आहे. हळूहळू ही कंपनी आज भारतातील मोठी कंपनी झाली. पुढे मुकेश आणि अनिल अंबानी यांनी विस्तार केला. आज मुकेश अंबानी यांनी तर या समूहाला मोठ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. अनेक कंपन्यांचा हा एक समूह झाला आहे. एखाद्या छोट्या राज्याच्या बजेट इतकी उलाढाल या समूहाची आहे.

आता अंबानी कुटुंबामध्ये पण खांदेपालट झाली आहे. नवीन पिढीला जबाबदारी सोपविण्यात आली आहे. नवीन पिढीत आकाश आणि अनंत अंबानी, मुलगी ईशा अंबानी यांनी नेटाने प्रयत्न सुरु केले आहे. मुकेश अंबानी एकूण 94.7 अब्ज डॉलर संपत्तीसह देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.

गौतम अदानी आणि त्यांचा मुलगा जीत अदानी समूहाला पुढे नेत आहेत. गौतम अदानी यांची पुढची पिढी पण सज्ज झाली आहे. गौतम अदानी 32 अब्ज डॉलर कंपनीचे मालक आहेत. ते बंदरे, विमानतळ, वीज उत्पादन, वितरण, अक्षय ऊर्जा, सिमेंट आणि इतर व्यवसायात पाय रोवून उभे आहेत.

लाला केदारनाथ अग्रवाल रोजगाराच्या शोधात 1947 मध्ये बिकानेर येथून दिल्लीत आले होते. चांदनी चौकात त्यांनी मिठाई आणि इतर खाद्य पदार्थांचे हॉटेल सुरु केले होते. त्यानंतर ही प्रसिद्ध बिकानो नावाची कंपनी झाली. त्यांचा मुलगा मनीष अग्रवाल यांनी या व्यवसायाचा विस्तार केला. आज या कंपनीचे उत्पादने 35 देशात विक्री होतात.

'उर्दूही पहिलीपासून शिकवली पाहिजे', शिंदेंच्या नेत्यानं काय म्हटलं?
'उर्दूही पहिलीपासून शिकवली पाहिजे', शिंदेंच्या नेत्यानं काय म्हटलं?.
खळबळजनक! मालेगावमध्ये 9 ठिकाणी ईडीचे छापे
खळबळजनक! मालेगावमध्ये 9 ठिकाणी ईडीचे छापे.
पहलगाममध्ये गोळ्या झाडल्या तिथे 25-30 सिलेंडर? अतिरेक्यांचा मोठा डाव?
पहलगाममध्ये गोळ्या झाडल्या तिथे 25-30 सिलेंडर? अतिरेक्यांचा मोठा डाव?.
पाणी थांबवाल तर श्वास थांबवू म्हणणारा दहशतवादी हाफिज सईद घाबरला
पाणी थांबवाल तर श्वास थांबवू म्हणणारा दहशतवादी हाफिज सईद घाबरला.
पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलाची मोठी कारवाई
पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलाची मोठी कारवाई.
पहलगामचं 'मिनी स्वित्झर्लंड' ओळख अन् तिथच अतिरेक्यांनी झाडल्या गोळ्या
पहलगामचं 'मिनी स्वित्झर्लंड' ओळख अन् तिथच अतिरेक्यांनी झाडल्या गोळ्या.
आता फक्त आठवणी अन् स्मशान शांतता; बैसरनमधून टीव्ही9चा ग्राऊंड रिपोर्ट
आता फक्त आठवणी अन् स्मशान शांतता; बैसरनमधून टीव्ही9चा ग्राऊंड रिपोर्ट.
बैसरन खोऱ्यातून टीव्ही9 मराठीचा ग्राऊंड रिपोर्ट
बैसरन खोऱ्यातून टीव्ही9 मराठीचा ग्राऊंड रिपोर्ट.
अटारी सीमेवर लागल्या रांगा; पाकिस्तानी नागरिकांना घेऊन वाहनांची गर्दी
अटारी सीमेवर लागल्या रांगा; पाकिस्तानी नागरिकांना घेऊन वाहनांची गर्दी.
भेदरलेल्या पाकिस्तानचा भारतावर निर्बंध लादण्याचा पोरकट प्रयत्न
भेदरलेल्या पाकिस्तानचा भारतावर निर्बंध लादण्याचा पोरकट प्रयत्न.