AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Business Empire :  वाडवडिलांचा जपला वारसा, पुढील पिढीने उभे केले अब्जावधींचे साम्राज्य

Business Empire : देशात अनेक दिग्गज घराणी आहेत. काहींच्या अगोदरच्या पिढीचे संचित म्हणून दुसऱ्या पिढीने पण त्यांचा व्यवसाय वाढवला. काहींना आता सुरुवात करत मोठा वटवृक्ष तयार केला. दुसरी पिढी व्यवसायाचा डोलारा सांभाळायला सज्ज झाली आहे. टाटा, अंबानी, अदानीपासून अनेक समूहात आता खांदेपालट सुरु आहे.

Business Empire :  वाडवडिलांचा जपला वारसा, पुढील पिढीने उभे केले अब्जावधींचे साम्राज्य
| Updated on: Sep 09, 2023 | 2:04 PM
Share

भारतात गेल्या काही वर्षांपासून अनेक अब्जाधीशांनी पुढील सोबत घेत आज मोठे साम्राज्य तयार केले आहे. काहींच्या अगोदरच्या पिढीने उद्योग व्यवसायात पाऊल टाकले. पुढील पिढीने पण उद्योग व्यवसाय वाढीसाठी मेहनत घेतली. भारतातील अनेक मोठ्या उद्योगांची हीच कर्मकहाणी आहे.

व्यवसाय, उद्योग सुरु करणाऱ्या पहिल्या पिढीला अनेक संकटाचा, अडचणींचा सामना करावा लागला. जिद्द, चिकाटीने त्यांनी प्रचंड कमाई केली. कंपन्यांना नवीन उंचीवर नेऊन ठेवले. यामध्ये पहिले नाव जमशेदजी टाटा यांचे येते.

जमशेद टाटा यांना भारतीय उद्योगाचे जनक म्हणण्यात येते. त्यांनी आयरन आणि स्टील कंपनीची स्थापना केली होती. त्यानंतर टाटा समूह तयार झाला. आज जगातील मोठ्या कंपन्यांमध्ये या कंपनीचे नाव आहे. रतन टाटा आणि दोराब टाटा यांनी हा समूह मोठा केला. त्यांनी त्यासाठी मेहनत घेतली.

धीरुभाई अंबानी यांच्या प्रयत्नांनी रिलायन्स कमर्शिअल कॉर्पोरेशनची स्थापना झाली. त्यांच्या दूरदृष्टीने आजचा रिलायन्स समूह उभा आहे. हळूहळू ही कंपनी आज भारतातील मोठी कंपनी झाली. पुढे मुकेश आणि अनिल अंबानी यांनी विस्तार केला. आज मुकेश अंबानी यांनी तर या समूहाला मोठ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. अनेक कंपन्यांचा हा एक समूह झाला आहे. एखाद्या छोट्या राज्याच्या बजेट इतकी उलाढाल या समूहाची आहे.

आता अंबानी कुटुंबामध्ये पण खांदेपालट झाली आहे. नवीन पिढीला जबाबदारी सोपविण्यात आली आहे. नवीन पिढीत आकाश आणि अनंत अंबानी, मुलगी ईशा अंबानी यांनी नेटाने प्रयत्न सुरु केले आहे. मुकेश अंबानी एकूण 94.7 अब्ज डॉलर संपत्तीसह देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.

गौतम अदानी आणि त्यांचा मुलगा जीत अदानी समूहाला पुढे नेत आहेत. गौतम अदानी यांची पुढची पिढी पण सज्ज झाली आहे. गौतम अदानी 32 अब्ज डॉलर कंपनीचे मालक आहेत. ते बंदरे, विमानतळ, वीज उत्पादन, वितरण, अक्षय ऊर्जा, सिमेंट आणि इतर व्यवसायात पाय रोवून उभे आहेत.

लाला केदारनाथ अग्रवाल रोजगाराच्या शोधात 1947 मध्ये बिकानेर येथून दिल्लीत आले होते. चांदनी चौकात त्यांनी मिठाई आणि इतर खाद्य पदार्थांचे हॉटेल सुरु केले होते. त्यानंतर ही प्रसिद्ध बिकानो नावाची कंपनी झाली. त्यांचा मुलगा मनीष अग्रवाल यांनी या व्यवसायाचा विस्तार केला. आज या कंपनीचे उत्पादने 35 देशात विक्री होतात.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.