AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo : कृषीपंपाचा विद्युत पुरवठा प्रश्न पेटला, कोल्हापूर, सांगलीत आंदोलनानंतर इचलकरंजीत ‘स्वाभिमानी’ची भूमिका काय?

इचलकरंजी : कृषीपंपाचा विद्युत पुरवठा हा दिवसा व्हावा तसेच रब्बी हंगामातील पिकांची अवस्था पाहता सलग 10 तास विद्युत पुरवठा व्हावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी कोल्हापूरात आंदोलनाला सुरवात केली होती. आता आंदोलनाची झळ ही सर्वत्र पोहचू लागली आहे. रात्रीच विद्युत पुरवठा केला जात असल्याने शेतकऱ्यांना आपला जीव धोक्यात घालून पिकांना पाणी द्यावे लागत आहे. त्यामुळे दिवसा विद्युत पुरवठा करावा या मागणीसाठी इचलकरंजी शहरासह ग्रामीण भागात रास्तारोको करण्यात आला आहे. शिवाय मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आंदोलने सुरुच राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

| Edited By: | Updated on: Mar 04, 2022 | 12:37 PM
Share
दिवसा अन् सुरळीत विद्युत पुरवठा: ऐन रब्बी हंगामात महावितरणकडून विद्युत पुरवठ्याचे वेळापत्रक हे जाहीर केले जाते. शिवाय हे शेतकऱ्यांच्या सोईचे नसल्याने असंख्य अडचणींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. सध्या 8 तास अन् तोही अनियमित वीज पुरवठा असल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे सलग 10 तास आणि तोही दिवसा विद्युत पुरवठा करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे.

दिवसा अन् सुरळीत विद्युत पुरवठा: ऐन रब्बी हंगामात महावितरणकडून विद्युत पुरवठ्याचे वेळापत्रक हे जाहीर केले जाते. शिवाय हे शेतकऱ्यांच्या सोईचे नसल्याने असंख्य अडचणींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. सध्या 8 तास अन् तोही अनियमित वीज पुरवठा असल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे सलग 10 तास आणि तोही दिवसा विद्युत पुरवठा करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे.

1 / 5
रात्रीच्या वेळी जीव धोक्यात : रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान होऊ नये म्हणून शेतकरी सध्या रात्रीचा दिवस करीत आहे. असे असले तरी रात्री वन्यजीव आणि जंगली प्राण्यांमुळे जीव मुठीत घेऊन शेतीकामे  करावी लागत आहेत. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन सुरु असूनही या वेळापत्रकात कोणताच बदल केलेला नाही.

रात्रीच्या वेळी जीव धोक्यात : रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान होऊ नये म्हणून शेतकरी सध्या रात्रीचा दिवस करीत आहे. असे असले तरी रात्री वन्यजीव आणि जंगली प्राण्यांमुळे जीव मुठीत घेऊन शेतीकामे करावी लागत आहेत. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन सुरु असूनही या वेळापत्रकात कोणताच बदल केलेला नाही.

2 / 5
घटनास्थळी पोलिसांचा बंदोबस्त: यापूर्वी सांगली आणि कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने विविध आंदोलने सुरु आहेत. शुक्रवारी इचलकरंजी येथे रास्तारोको करण्यात आला होता. कोणता गैरप्रकार होऊ नये म्हणून या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैणात करण्यात आला होता. मात्र, आंदोलनादरम्यान रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

घटनास्थळी पोलिसांचा बंदोबस्त: यापूर्वी सांगली आणि कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने विविध आंदोलने सुरु आहेत. शुक्रवारी इचलकरंजी येथे रास्तारोको करण्यात आला होता. कोणता गैरप्रकार होऊ नये म्हणून या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैणात करण्यात आला होता. मात्र, आंदोलनादरम्यान रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

3 / 5
मागण्या मान्य नाहीत तोपर्यंत आंदोलनाचे अस्त्र: शेतकऱ्यांच्या मागण्याकडे कायम सरकारचे दुर्लक्ष राहिलेले आहे. रब्बी हंगामातील उत्पादकता वाढवण्यासाठी पाण्याची गरज आहे. सध्या मुबलक प्रमाणात पाणी असतानाही केवळ विद्युत पुरवठा सुरळीत होत नसल्याने शेतकऱ्यांची अडचण होत आहे.

मागण्या मान्य नाहीत तोपर्यंत आंदोलनाचे अस्त्र: शेतकऱ्यांच्या मागण्याकडे कायम सरकारचे दुर्लक्ष राहिलेले आहे. रब्बी हंगामातील उत्पादकता वाढवण्यासाठी पाण्याची गरज आहे. सध्या मुबलक प्रमाणात पाणी असतानाही केवळ विद्युत पुरवठा सुरळीत होत नसल्याने शेतकऱ्यांची अडचण होत आहे.

4 / 5
रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने इचलकरंजी येथे रास्तारोको करण्यात आला होता. या दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लगल्या होत्या. आंदोलन सुरु असूनही महावितरण कोणतीच भूमिका घेत नसल्याने आता वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलने सुरु होत आहेत.

रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने इचलकरंजी येथे रास्तारोको करण्यात आला होता. या दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लगल्या होत्या. आंदोलन सुरु असूनही महावितरण कोणतीच भूमिका घेत नसल्याने आता वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलने सुरु होत आहेत.

5 / 5
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.