AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोलापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक विहीर, बाबासाहेब प्यायले होते चांदीच्या वाटीतून पाणी !

देशाच्या संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने आज त्यांच्या आठवणींना आणि कार्याला उजाळा दिला जात आहे. त्यांनी ज्या ज्या ठिकाणी भेटी दिल्या होत्या, त्या ठिकाणी मोठ्या उत्साहात जयंती साजरी होत आहे. आज जयंतीच्या निमित्ताने सोलापूर जिल्ह्यातील एक विहीर चर्चेत आली आहे.

| Updated on: Apr 14, 2025 | 11:17 AM
Share
महामानव, बोधीसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती देशभरात अत्यंत जल्लोषात साजरी केली जात आहे. जयंती निमित्ताने आज देशभरात ठिकठिकाणी विचारांचा उत्सव साजरा होत आहे. बाबासाहेबांच्या कार्याचं स्मरण केलं जात असून देशासाठीच्या त्यांच्या योगदानावर भरभरून बोललं जात आहे.

महामानव, बोधीसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती देशभरात अत्यंत जल्लोषात साजरी केली जात आहे. जयंती निमित्ताने आज देशभरात ठिकठिकाणी विचारांचा उत्सव साजरा होत आहे. बाबासाहेबांच्या कार्याचं स्मरण केलं जात असून देशासाठीच्या त्यांच्या योगदानावर भरभरून बोललं जात आहे.

1 / 8
बाबासाहेबांचा लढा केवळ दलितांच्या उद्धारासाठी नव्हता, तर तो समाज घडवण्याचा लढा होता. समाजात समता प्रस्थापित करण्याचा आणि त्यातून देश घडवण्याचा लढा होता. त्यासाठी त्यांनी आपलं अख्खं आयुष्य देशाला अर्पण केलं. आज आपण नेशन फर्स्टची चर्चा करतो. पण त्याकाळात 'मी प्रथम भारतीय आणि अंतिमतः भारतीय आहे', असं ठासून सांगणारे बाबासाहेब हे एकमेव युगपुरुष होते.

बाबासाहेबांचा लढा केवळ दलितांच्या उद्धारासाठी नव्हता, तर तो समाज घडवण्याचा लढा होता. समाजात समता प्रस्थापित करण्याचा आणि त्यातून देश घडवण्याचा लढा होता. त्यासाठी त्यांनी आपलं अख्खं आयुष्य देशाला अर्पण केलं. आज आपण नेशन फर्स्टची चर्चा करतो. पण त्याकाळात 'मी प्रथम भारतीय आणि अंतिमतः भारतीय आहे', असं ठासून सांगणारे बाबासाहेब हे एकमेव युगपुरुष होते.

2 / 8
बाबासाहेबांनी देशात ज्या ज्या ठिकाणी भेट दिली, ती ठिकाणं ऐतिहासिक ठरली आहेत. आजही तिथल्या नागरिकांनी आपल्या लाडक्या युगपुरुषाच्या आठवणी जतन करून ठेवल्या आहेत. सोलापूरच्या अक्कलकोटमधील रहिवाशांनी तर एक विहीरच जतन करून ठेवली आहे.

बाबासाहेबांनी देशात ज्या ज्या ठिकाणी भेट दिली, ती ठिकाणं ऐतिहासिक ठरली आहेत. आजही तिथल्या नागरिकांनी आपल्या लाडक्या युगपुरुषाच्या आठवणी जतन करून ठेवल्या आहेत. सोलापूरच्या अक्कलकोटमधील रहिवाशांनी तर एक विहीरच जतन करून ठेवली आहे.

3 / 8
सोलापूरच्या अक्कलोकट तालुक्यातील वळसंग गावात एक विहीर आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षाची साक्ष देणारी ही विहीर सरकारकडून संरक्षित करण्यात आली आहे. ही विहीर आजही बाबासाहेबांच्या संघर्षाची साक्ष देत आहे.

सोलापूरच्या अक्कलोकट तालुक्यातील वळसंग गावात एक विहीर आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षाची साक्ष देणारी ही विहीर सरकारकडून संरक्षित करण्यात आली आहे. ही विहीर आजही बाबासाहेबांच्या संघर्षाची साक्ष देत आहे.

4 / 8
 24 एप्रिल 1937 साली डॉ. आंबेडकरांनी वळसंग येथील विहिरीतले पाणी रेशीम दोराने काढून चांदीच्या वाटीतून प्राशन केले होते.

24 एप्रिल 1937 साली डॉ. आंबेडकरांनी वळसंग येथील विहिरीतले पाणी रेशीम दोराने काढून चांदीच्या वाटीतून प्राशन केले होते.

5 / 8
गावात स्पृश्य अस्पृश्यता असल्याने दलितांनी स्वतः ही विहीर खोदली होती. त्यानंतर डॉ. आंबेडकरांच्या हस्ते त्या विहिरीचे उद्घाटन करण्यात आले होते. नंतर सोलापूर जिल्हा लोकल बोर्डाने वळसंग येथील विहीर बांधून दिली होती.

गावात स्पृश्य अस्पृश्यता असल्याने दलितांनी स्वतः ही विहीर खोदली होती. त्यानंतर डॉ. आंबेडकरांच्या हस्ते त्या विहिरीचे उद्घाटन करण्यात आले होते. नंतर सोलापूर जिल्हा लोकल बोर्डाने वळसंग येथील विहीर बांधून दिली होती.

6 / 8
वळसंग येथील या ऐतिहासिक क्षणावरून विहिरीला 'आंबेडकर बावड' असं नाव देण्यात आलं होतं. 1937 मध्ये बाबासाहेबांनी सोलापुरातील प्रचाराच्या वेळेस वळसंग येथील ऐतिहासिक विहिरीला भेट दिली होती.

वळसंग येथील या ऐतिहासिक क्षणावरून विहिरीला 'आंबेडकर बावड' असं नाव देण्यात आलं होतं. 1937 मध्ये बाबासाहेबांनी सोलापुरातील प्रचाराच्या वेळेस वळसंग येथील ऐतिहासिक विहिरीला भेट दिली होती.

7 / 8
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उमेदवार ऐदाळे यांच्या प्रचारासाठी डॉ. आंबेडकर यांनी 3 हजारहून अधिक लोकांसह वळसंग येथील विहिरीला भेट दिली होती. तेव्हा स्थानिकांनी बाबासाहेबांना पाणी उपसण्यासाठी आग्रह धरला होता. वळसंग येथील 'आंबेडकर बावड' ऐतिहासिक असल्याने आजही आंबेडकरी जनता या ठिकाणाला भेट देते.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उमेदवार ऐदाळे यांच्या प्रचारासाठी डॉ. आंबेडकर यांनी 3 हजारहून अधिक लोकांसह वळसंग येथील विहिरीला भेट दिली होती. तेव्हा स्थानिकांनी बाबासाहेबांना पाणी उपसण्यासाठी आग्रह धरला होता. वळसंग येथील 'आंबेडकर बावड' ऐतिहासिक असल्याने आजही आंबेडकरी जनता या ठिकाणाला भेट देते.

8 / 8
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.