
सूर्यप्रकाश हा व्हिटॅमिन डीचा प्रमुख स्त्रोत आहे. आयुर्वेदातही सूर्यप्रकाशाला अधिक महत्त्व आहे. असे मानले जाते की सूर्यकिरणांमध्ये रोग दूर करण्याची शक्ती असते. म्हणूनच आयुर्वेदातसूर्यप्रकाशित पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.

सूर्यप्रकाशित पाण्यासाठी पाण्याने भरलेल्या बाटल्या किंवा जार किमान 6 तास सूर्यप्रकाशात ठेवावेत. याला आयुर्वेदात सूर्य उपचार असे म्हणतात.

आयुर्वेदानुसार हे पाणी एकंदर आरोग्य सुधारण्यास मदत करते. या पाण्यात अँटी व्हायरल, अँटी फंगल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात जे शरीर आणि त्वचेसाठी देखील फायदेशीर असतात.

अपचन, छातीत जळजळ, अल्सर आणि आतड्यांसंबंधी आरोग्यासाठीही हे पाणी पिणे फायदेशीर मानले जाते. सूर्य हा व्हिटॅमिन डीचा मुख्य स्त्रोत आहे. याच पाण्यात व्हिटॅमिन डी देखील आढळते.

उन्हाळ्यात सर्वात मोठी समस्या म्हणजे डिहायड्रेशनची असते. ही समस्या टाळण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे सूर्यप्रकाशित पाणी प्या. (वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला घ्या)