Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिनेत्री दिपाली सय्यद यांचा आमरण उपोषणाचा इशारा, साखळाई पाणी प्रश्न चिघळण्याची शक्यता

अनेक दिवसांपासून जिल्ह्यातील प्रलंबित साकळाई पाणी योजनेचा प्रश्न चिघळण्याची शक्यता आहे. सिनेअभिनेत्री दीपाली सय्यद यांनी ही योजना तातडीने मंजूर न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.

अभिनेत्री दिपाली सय्यद यांचा आमरण उपोषणाचा इशारा, साखळाई पाणी प्रश्न चिघळण्याची शक्यता
Follow us
| Updated on: Jul 28, 2019 | 6:59 PM

अहमदनगर : अनेक दिवसांपासून जिल्ह्यातील प्रलंबित साकळाई पाणी योजनेचा प्रश्न चिघळण्याची शक्यता आहे. सिनेअभिनेत्री दिपाली सय्यद यांनी ही योजना तातडीने मंजूर न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.

साकळाई योजनेतून अहमदनगर आणि श्रीगोंदा तालुक्यातील 35 गावांच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. त्यामुळे साकळाई योजनेतून 3 टीएमसी पाणी मिळावे यासाठी दिपाली सय्यद यांनी लढा उभारला आहे. ही योजना तातडीने मंजूर झाली नाही, तर आपण 9 ऑगस्ट रोजी (क्रांती दिन) आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा दिपाली सय्यद यांनी दिला. यासाठी त्यांनी साकळाई योजनेच्या लाभक्षेत्रातील गावामध्ये जाऊन ग्रामस्थांच्या भेटी घेत संवादही साधला. तसेच साकळाई योजना जनतेच्या रेट्यानेच पुढे जाणार असल्याचे स्पष्ट केले.

दिपाली सय्यद म्हणाल्या, “साकळाई योजनेतून अहमदनगर आणि श्रीगोंदा तालुक्यातील 35 गावांच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. त्यासाठी साकळाई योजनेतून 3 टीएमसी पाणी मिळणे आवश्यक आहे. मात्र, मागील 20 वर्षांपासून येथील लोकप्रतिनिधी या योजनेच्या माध्यमातून फक्त राजकारणच करत आहेत. म्हणूनच तात्काळ या योजनेला मंजूरी न दिल्यास मी 9 ऑगस्टपासून आमरण उपोषण करणार आहे.”

दरम्यान, साकळाई योजनेसाठी माजी मंत्री बबनराव पाचपुते आणि राष्ट्रवादीचे आमदार राहुल जगताप यांनी देखील पाठपुरावा केला आहे. एवढेच नाही तर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या सोबत या योजनेच्या मंजुरीसाठी बैठक देखील घेण्यात आली. तरी देखील या योजनेला अद्यापही मंजुरी मिळालेली नाही. अशातच दिपाली सय्यद यांनी या लढाईत उडी घेतल्याने या आंदोलनाला एक वेगळं वलय प्राप्त झालं आहे.

संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल
संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल.
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका.
अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला
अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला.
'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य
'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य.
डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार
डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार.
'अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?', भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल
'अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?', भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल.
मुख्यमंत्र्यांचा मी लाडका आहे, ते मला काय बोलतील? नितेश राणेंचं विधान
मुख्यमंत्र्यांचा मी लाडका आहे, ते मला काय बोलतील? नितेश राणेंचं विधान.
नागपुरच्या राड्यात 33 पोलिसांसह 4 DCP जखमी, हिंसेला सुरूवात कुठून ?
नागपुरच्या राड्यात 33 पोलिसांसह 4 DCP जखमी, हिंसेला सुरूवात कुठून ?.
नागपूरच्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केला 'छावा' चित्रपटाचा उल्लेख
नागपूरच्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केला 'छावा' चित्रपटाचा उल्लेख.
संतोष देशमुख प्रकरण; आरोपी विष्णु चाटेबद्दल मोठी अपडेट आली समोर
संतोष देशमुख प्रकरण; आरोपी विष्णु चाटेबद्दल मोठी अपडेट आली समोर.