AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मैदान कौंनसा भी हो… साथ में खेलना है और साथ जितना है… आदित्य ठाकरे असं का म्हणाले?

हे सरकार घटनाबाह्य आहे; 40 लोक गद्दार आहेत. आता तरी निवडणुका घ्या आता कशाला घाबरत आहे, असं आव्हान आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिलं.

मैदान कौंनसा भी हो... साथ में खेलना है और साथ जितना है... आदित्य ठाकरे असं का म्हणाले?
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Dec 09, 2022 | 9:59 AM
Share

 रोहा, रायगडः मैदान कौंनसा भी हो साथ में खेलना है ओर साथ मे जितना है. मातीत खेळण्याची मजा वेगळीच असते; आताच्या काळात आर्टिफिशियल मैदानं आहेत. आपण आपली माती आपली माणसं म्हणतो, तेच चित्र मैदानात असतं, असं वक्तव्य आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केलं. रायगड जिल्ह्यातील रोहा आदित्य ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं. खोखो क्रिडापटूंना बोलताना आदित्य ठाकरेंनी प्रोत्सहनपर भाषण केलं तसंच राजकीय शत्रूंवर टीकाही केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या 82 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धेला उपस्थित होते.

गुजरात निवडणुकीसाठी उद्योग पळवले तसे कर्नाटक निवडणुकीसाठी राज्यातील गावं पळवतील, अशी सडकून टीका शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी केली. मातीतल्या खेळांना महत्व दिलं पाहिजे, मैदाने वाचवली पाहिजे असं मत आदित्य ठाकरे यानी व्यक्त केलं.

राज्यात विविध गटांकडून दबावतंत्र सुरु आहे, यावर बोट ठेवताना आदित्य ठाकरे म्हणाले, उद्योग, राजकीय असेल, देशाला एकत्र आणण्याचं काम खेळासारखा दुसरं काही नाही. महाराष्ट्राला प्रत्येक बाजूने दाबण्याचा प्रयत्न करत आहे. उद्योग, गावे, जिल्हे दुसऱ्या राज्यात जात आहेत. तसेच महापुरुषांचा अपमान देखील होत असल्याची खंत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली.

पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, या रोह्यात बल्क ड्रग प्रकल्प आणणार होतो दुसऱ्या राज्यात गेला. हे सरकार घटनाबाह्य आहे. हे सरकार बसल्यानंतर पाच प्रकल्प राज्यातून बाहेर गेले. बल्क ड्रक प्रकल्प राज्यातून बाहेर गेला. बेळगाव बाबत हे सरकार बोलत नाही घाबरट सरकार आहे. असे अनेक विषय आहेत, महिला अत्याचार, शेतकरी असे अनेक प्रश्न असून दुसरं काहीतरी वादग्रस्त वक्तव्य केली जात आहेत. हे राजकारण आहे. हे राजकारण दूषित करायचं काम हे सरकार करत आहे, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

आदित्य ठाकरे यांनी देशातील विधानसभा निवडणूक निकालांवर भाष्य केलं. सर्व विजेत्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो, या विजयानंतर आता तरी महाराष्ट्रात निवडणुका घेतील. हे सरकार घटनाबाह्य आहे; 40 लोक गद्दार आहेत. आता तरी निवडणुका घ्या आता कशाला घाबरत आहे, असं आव्हान आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिलं.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.