AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Governor : गुजरात निवडणुकीनंतर राज्यपालांची उचलबांगडी? केंद्र घेणार निर्णय..शिवप्रेमींच्या आक्रमक भूमिकेनंतर चर्चांना उधाण

Governor : गुजरात निवडणुकीनंतर राज्यपालांची उचलबांगडी होणार का?  वादग्रस्त वक्तव्य त्यांच्यावर शेकणार का?

Governor : गुजरात निवडणुकीनंतर राज्यपालांची उचलबांगडी? केंद्र घेणार निर्णय..शिवप्रेमींच्या आक्रमक भूमिकेनंतर चर्चांना उधाण
वक्तव्य शेकणार का?Image Credit source: TV9marathi
| Updated on: Dec 03, 2022 | 6:46 PM
Share

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने टीकेचे धनी ठरलेल्या राज्यपाल (Governor) महोदयांची लवकरच उचलबांगडी होण्याची शक्यता आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीनंतर ही कारवाई अटळ असल्याची अटकळ राजकीय वर्तुळात चर्चिल्या जात आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्याविरोधात केंद्र सरकार (Central Government) मोठा निर्णय घेणार असल्याचे सूत्रांकडून कळते. राज्यपालांच्या विरोधात राज्यात वातावरण तापले आहे. भाजपचेच खासदार उदयनराजे (MP Udayanraje Bhosale) यांनी त्यांच्याविरोधात जोरदार मोहिम उघडली आहे. तर दुसरीकडे शिवप्रेमींमध्ये संतापाची भावना आहे. त्याचा फटका बसण्याची शक्यता लक्षात राज्यपाल हटाव मोहिमेला यश येण्याची चिन्हं आहेत.

राज्यपालांचे पार्सल परत पाठवा अशी मागणी राज्यात अनेकदा राजकीय पक्ष आणि सामाजिक संगघटनांनी केली होती. यापूर्वीही राज्यपाल कोश्यारी यांच्या वादग्रस्त विधानामुळं राज्य सरकार अडचणीत आले आहे. आता त्यांच्याविरोधात जनभावना आहेत.

गुजरात निवडणुकीचा शेवटचा टप्पा 5 डिसेंबर रोजी मतदानानंतर संपेल. तर 19 डिसेंबरपासून नागपुरला विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे. अधिवेशनात राज्य सरकारला विरोधकांचा कडवा सामना करावी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे 8 डिसेंबरनंतर राज्यपालाची उचलबांगडी करण्यात येईल असा चर्चा रंगली आहे.

दरम्यान राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. राज्यपालांच्या वादग्रस्त विधाना बाबात राज्यातील जनतेची बाजू मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारला कळवल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यपालांना हटविण्याचा निर्णय केंद्र घेत असते. केंद्र सरकार याविषयी योग्य तो निर्णय घेईलच. पण राज्यपालांनी वेळीच माफी मागितली असती तर हा विषय वाढला नसता अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. गेल्यावेळी राज्यपालांच्या माफीनंतर वादग्रस्त प्रकरणावर पडदा पडल्याची आठवण केसरकरांनी करुन दिली.

औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्यात वादग्रस्त विधान करण्यात आले होते. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भाषणात वादग्रस्त वक्तव्य केले होते.त्यांच्या विधानानंतर उद्धव ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी, मराठा संघटना, शिवप्रेमींनी जोरदार आंदोलन केले होते.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.