AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Pawar : पूर्ण बहुमत असताना राज्याला मंत्रिमंडळापासून वंचित ठेवणं बरोबर नाही, अजित पवारांनी व्यक्त केली खंत

मंत्रिमंडळ विस्तार हा सर्वस्वी शिंदे-फडणवीस यांचा अधिकार आहे. ते काही विरोधीपक्ष नेत्याचे काम नाही. त्यांच्याकडे पूर्ण बहुमतदेखील आहे. अशावेळी राज्याला मंत्रिमंडळापासून वंचित ठेवणे योग्य नाही, असे अजित पवार म्हणाले.

Ajit Pawar : पूर्ण बहुमत असताना राज्याला मंत्रिमंडळापासून वंचित ठेवणं बरोबर नाही, अजित पवारांनी व्यक्त केली खंत
लोकशाहीची थट्टा लावलीय, खून पाडला जातोय, सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्याने अजित पवारांची सडकून टीकाImage Credit source: tv9
| Updated on: Jul 15, 2022 | 4:10 PM
Share

अहमदनगर : अतिवृष्टीमुळे (Heavy rain) मोठे नुकसान झाले आहे. रोप वाया गेली. पेरण्या झाल्या मात्र जास्त पावसामुळे ते वाया गेले. अॅक्शन घेणे गरजेचे आहे काही शेतकरी म्हणाले अजून आमच्याकडे कोणी आले नाही. किमान पालकमंत्री तरी नेमावे, अशी अपेक्षा विरोधीपक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी व्यक्त केली आहे. ते अहमदनगरमध्ये बोलत होते. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागांचीदेखील त्यांनी पाहणी केली. सध्या राज्यात केवळ दोनच व्यक्ती कारभार पाहत आहेत, अशी टीका त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली. लवकर मंत्रिमंडळ अस्तित्वात येणे गरजेचे आहे. पालकमंत्रीही नेमले गेले पाहिजे, अशी अपेक्षा अजित पवार यांनी व्यक्त केली आहे. पूर्ण बहुमत असताना राज्याला मंत्रिमंडळापासून वंचित ठेवणे बरोबर नाही, अशी टीका त्यांनी केली.

‘अनेकांना शब्द दिले आहेत, ते पाळण्याची भीती वाटत असेल’

मंत्रिमंडळ विस्तार हा सर्वस्वी शिंदे-फडणवीस यांचा अधिकार आहे. ते काही विरोधीपक्ष नेत्याचे काम नाही. त्यांच्याकडे पूर्ण बहुमतदेखील आहे. अशावेळी राज्याला मंत्रिमंडळापासून वंचित ठेवणे योग्य नाही. मात्र दुसरीकडे अनेकांना शब्द दिले आहेत. ते पाळले जातील की नाही, अशी शंका त्यांना वाटत असेल, असा टोला त्यांनी राज्य सरकारला लगावला. लोकशाही जर मजबूत करायची असेल तर तातडीने त्यांनी सहकाऱ्यांना काम करण्याची संधी द्यावी, असे अजित पवार म्हणाले.

‘तातडीने पंचनामे झाले पाहिजेत’

राज्यात पुराचे संकट रौद्र रूप धारण करत आहे. शेतकऱ्यांची पिके वाहून गेली आहेत. काही ठिकाणी दुबार पेरणी करावी लागत आहे. या संदर्भात राज्य सरकारने तातडीने पंचनामे झाले पाहिजेत. वेळ निघून गेली तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल, अशी भीती अजित पवार यांनी व्यक्त केली. तर नामांतराच्या मुद्द्यावरून त्यांनी टीका केली. माझे सरकार आल्यानंतर संभाजीनगर करणार, असे ते म्हणाले होते. मग त्यांनी हा प्रस्ताव रद्द करण्याते कारण काय, असा सवाल करत काँग्रेस-राष्ट्रवादीची आणि शिवसेनेची विचारधारा वेगळी होती. मात्र विकासाच्या बाबत एक मत होते, असेही ते यावेळी म्हणाले.

काय म्हणाले अजित पवार?

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.