AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Pawar: ह्यात निश्चित काही काळंबेरं आहे, अजित पवारांनी शिंदेंना भाजपच्या धोक्याची आठवण करुन दिली

Ajit Pawar : 105 आमदार असताना फडणवीस उपमुख्यमंत्री अन् शिंदे मुख्यमंत्री, याच नक्कीच काही काळबेरं, असं अजित पवार म्हणाले.

Ajit Pawar: ह्यात निश्चित काही काळंबेरं आहे, अजित पवारांनी शिंदेंना भाजपच्या धोक्याची आठवण करुन दिली
| Updated on: Jul 04, 2022 | 1:12 PM
Share

मुंबई : शिंदे गट आणि भाजपने (BJP) एकत्र येत सरकार स्थापन केलं. त्यावर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी सभागृहात भाष्य केलं. “40 आमदार असलेली व्यक्ती मुख्यमंत्री होतात, 106 आमदार असलेले देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उपमुख्यमंत्री होतात, याच नक्कीच काहीतरी काळंबेरं आहे. “आमच्या 105 मुळे आज तुम्ही मुख्यमंत्री आहेत, हे मनुष्यस्वभाव बोलायला मागे पुढे पाहणार नाही, हे लक्षात घ्या”,असं अजित पवार म्हणाले. गेल्या 8-10 दिवसांत राज्यात इतकं काही बरंच घडलं, की म्हटलं जातं की 40 आमदार उद्धव ठाकरेंवर अविश्वास दाखवून गेला. त्यामुळे त्यांना पद सोडावं लागलं. आता जरा बाहेर शिवसैनिकांच्या मनात काय सुरु आहे, याची माहिती घ्या”, असंही अजितपवार म्हणाले.

“तुम्ही मंत्री होतात आणि आपल्या कार्यकर्त्याला सांगताय की मिरच्या झोंबल्या पाहिजे, अरे काय…ssss सूरतवरुन गुवाहाटी मग गोवा… माझ्या माहितीप्रमाणे इतक्या 10-12 दिवसात आतापर्यंतच्या हयातीत इतकं सगळं फिरायला मिळालं नसेल. मग आमचे शहाजीबापू.. काय झाडी… काय डोंगार… काय हॉटेल.. ओक्केयओक्केय… याच्यात फार गोंधळून जाण्याची आणि फार लगेच वक्तव्य करण्याचं कारण नाही”, असंही अजित पवार म्हणाले.

“सत्तेचा ताम्रपट कुणाकडेही नाही”

“विरोधी मतदान करुन आम्ही आमची भूमिका मांडली. सत्ता येते, सत्ता जाते. ताम्रपट घेऊन कुणीच जन्माला आलेलं नाही. पण देवेंद्रजी मी तुमचं भाषण बारकाईने ऐकलं, तुम्ही त्यांचं एवढं समर्थन करत होतात, मग मागच्या टर्म असतान फक्त रस्ते विकास महामंडळच त्यांच्याकडे का दिलं? नेता मोठा असला की खाती जास्त असतात, हे चंद्रकात पाटील यांना माहीत आहेत. जर शिंदे साहेब सर्वगुणसंपन्न होते, तर छोटंसं रस्ते विकास महामंडळ, ज्याचा जनतेशी संबंधच नव्हता, हायवे करायचे, टनल करायचे, असं असताना त्यांनी दुसरं कुठलं खातं का नाही दिलं? याचा महाराष्ट्रपण विचार करेल”,  असं म्हणत अजित पवारांनी सत्तेचं गणित मांडलं.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.