AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…तर आमदार सोडून जातील, अंबादास दानवेंचा पुन्हा शिंदे गटाला टोला

अद्यापही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर पडल्याणं विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवण्यात येत आहे.

...तर आमदार सोडून जातील, अंबादास दानवेंचा पुन्हा शिंदे गटाला टोला
| Updated on: Nov 03, 2022 | 8:43 AM
Share

मुंबई : दिवाळीनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinet expansion) होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र अद्यापही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर पडल्याणं विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवण्यात येत आहे. विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबदास दानवे (Ambadas Danve) यांनी मंत्रिमंडळाच्या विस्तारावर प्रतिक्रिया देताना शिंदे, फडणवीस सरकारला जोरदार टोला लगावला आहे.  मंत्रिमंडळाचा (Cabinet)  विस्तार झाल्यास काही लोक सोडून जातील अशी भीती सत्ताधाऱ्यांना वाटत असल्यानेच मंत्रिमंडळाचा विस्तार लांबल्याचं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे. 

नेमकं काय म्हटलं दानवे यांनी

रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावर प्रतिक्रिया देताना अंबादास दानवे यांनी सरकारला जोरदार टोला लगावला आहे.  मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तर लोक सोडून जातील अशी भीती सरकारला वाटत आहे. त्यांनी अनेकांना शद्ब दिला आहे. एवढ्या लोकांना दिलेला शद्ब पूर्ण करणे अशक्य आहे. त्यामुळे आता मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तर काहीजण सोडून जातील या भीतीनेच मंत्रिमंडळाचा विस्तार रखडल्याचं दानवे यांनी म्हटलं आहे.

विरोधकांची टीका

मंत्रिमंडळाच्या विस्ताराला विलंब होत आहे, यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासोबत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील सरकारवर निशाणा साधला आहे. लंबलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावर प्रतिक्रिया देताना काही दिवसांपूर्वीच जयंत पाटील यांनी सरकारला जोरदार टोला लगावला होता. शिंदे गटाच्या प्रत्येक आमदारालाच मंत्रिपद हवं आहे, त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराला विलंब होत असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं होतं.  तर जोपर्यंत बहुमत आहे, तोपर्यंत सरकार सत्तेत राहील असं अजित पवार यांनी म्हटलं होतं.

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.