AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेना म्हणजे ‘प्राण जाये पर वचन न जाये’; जावडेकरांच्या ‘त्या’ आरोपांवर सावंतांचे प्रत्युत्तर

'प्राण जाये पर वचन न जाये' हे वचन शिवसेना पाळते, असे प्रत्युत्तर शिवसेना नेते अरविंद सावंत (MP Arvind Sawant) यांनी दिले.

शिवसेना म्हणजे 'प्राण जाये पर वचन न जाये'; जावडेकरांच्या 'त्या' आरोपांवर सावंतांचे प्रत्युत्तर
| Updated on: Dec 08, 2020 | 8:54 PM
Share

मुंबई : “गद्दारी आणि शिवसेना हा शब्दच लागू पडू शकत नाही. ‘प्राण जाये पर वचन न जाये’ हे वचन शिवसेना पाळते, असे प्रत्युत्तर शिवसेना नेते अरविंद सावंत (MP Arvind Sawant) यांनी भाजप नेते प्रकाश जावडेकर यांना दिले. राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना “महाराष्ट्रात जे काही झालं ते शिवसेनेच्या गद्दारीमुळे झाले. भविष्यात त्यांना या सगळ्याचे परिणाम भोगावे लागतील,” असा इशारा केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी शिवसेनेला मंगळवारी (8 डिसेंबर) दिला. त्यांच्या या वक्तव्याला प्रत्युत्तर म्हणून सावंत यांनी वरिल वक्तव्य केले. ते मुंबईत ‘टिव्ही 9 मराठी’शी बोलत होते. (Arvind Sawant replied to Prakash Javadekar criticism)

“मला आश्चर्य वाटतं प्रकाश जावडेकर यांचा तोल गेलाय. सहसा ते असे वक्तव्य करत नाहीत. पण दुर्दैवाने ते असे बोलले असतील. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या जागा कमी करुन त्या 56 जागांवर कशा आणाव्यात याचा विचार कोण करत होतं? गोव्याचे मुख्यमंत्री सिंधुदुर्गात ठाण मांडून का बसले होते?,” असे सावंत म्हणाले. तसेच, शिवसेनेच्या जागा कमी करण्याचा प्रयत्न करणे ही गद्दारी होती की इमानदारी होती, असा सवालही त्यांनी जावडेकर यांना विचारला.

अमित शाहा उत्तर न देता हरियाणाला गेले

“राज्याच्या मुख्यमंत्रिपदाबाबत भाजपने शिवसेनेला शब्द दिला आहे, की नाही याचे उत्तर अमित शाहा यांनी दिले नाही. ते उत्तर न देता ते हरियाणाला गेले. सत्याला सामोरं जाण्यासाठी धारिष्ट्य लागतं. अमित शाहा गेले ते आलेच नाहीत. याच कारणामुळे महाराष्ट्राने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेला साथ दिली.” तसेच, विधानपरिषदेच्या निकालामुळे महाराष्ट्र त्यांच्या बाजूने उभा असल्याचंही ते म्हणाले.

प्रकाश जावडे कर काय म्हणाले ?

महाराष्ट्रात जे काही झालं ते शिवसेनेच्या गद्दारीमुळे झाले. भविष्यात त्यांना या सगळ्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा प्रकाश जावडेकर (BJP Prakash Javdekar) यांनी दिला. यावेळी त्यांनी कृषी कायद्यांचे जोरदार समर्थन केले. कृषी कायद्यांबाबत 95 टक्के शेतकऱ्यांना कसलीही समस्या नाही. पाच ते दहा टक्के शेतकऱ्यांचा गैरसमज आहे. तो आम्ही लवकर दूर करू. पंजाबमध्ये सरकारकडून सर्वात जास्त धान्य खरेदी झाली. मात्र, तेथील शेतकऱ्यांचा हमीभावाविषयी गैरसमज झाला आहे. अनेकदा गैरसमज दूर करायला वेळ लागतो. पण उद्याच्या बैठकीत सगळे गैरसमज दूर होतील, असा विश्वास प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केला. (Arvind Sawant replied to Prakash Javadekar criticism)

संबंधित बातम्या :

शिवसेना बाळासाहेबांची शिकवण विसरली; शरद पवारांपुढे लीन झालेय: प्रविण दरेकर

‘शिवसेनेला शेतीतलं काय कळतं; फक्त मोदींच्या विरोधासाठी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा’

व्यावसायिक वाहतूक संघटनांचे पदाधिकारी कृष्णकुंजवर, राज ठाकरेंच्या भेटीनंतर दिलासा

(Arvind Sawant replied to Prakash Javadekar criticism)

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.