AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

समयने कुछ वक्त मेरा साथ ना दिया… धनंजय मुंडे यांचा शायरीतून निशाणा

मंत्री झाल्याने जबाबदारी आहे वाढली आहे. जनतेची कामे करायची आहेत. जिथे जाल तिथे सांगा मी प्रभू परळी वैद्यनाथाच्या नगरीतला आहे, असं धनंजय मुंडे म्हणाले. राष्ट्रवादीतील फूट आणि मंत्री झाल्यानंतर ते पहिल्यांदाच परळीत आले होते.

समयने कुछ वक्त मेरा साथ ना दिया... धनंजय मुंडे यांचा शायरीतून निशाणा
dhananjay mundeImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 14, 2023 | 7:32 AM

बीड : मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच धनंजय मुंडे काल परळीत आले होते. यावेळी धनंजय मुंडे यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. मुंडे यांच्या स्वागतासाठी सात क्विंटलचा फुलांचा हार मागवण्यात आला होता. मुंडे यांच्या स्वागतासाठी हजारो लोक परळीत हजर होते. यावेळी धनंजय मुंडे यांनी परळीकरांशी संवाद साधला. शेरोशायरीतून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. समयने कुछ वक्त मेरा साथ ना दिया, मेरी काबिलीयत पर लोग शक करने लगे, असं म्हणत धनंजय मुंडे यांनी राजकीय विरोधकांवर निशाणा साधला.

मागीलवेळी मंत्री झालो तेव्हा मिरवणुकीत एवढा वेळ गेला की भाषण करता आले नाही. माझ्या जीवनात कधीच असा प्रतिसाद मिळाला नाही इतका मोठा प्रतिसाद आज मिळतो आहे. माझ्या संकटकाळात जे लोक सोबत आणि पाठीशी होते त्या सर्वासमोर नतमस्तक होतो.मी दुसऱ्यांदा मंत्री झाल्यावर काय बोलावे? कुणाकुणाचे आभार मानावे, ऋण व्यक्त करावे हेच कळत नाही. मी इथल्या प्रत्येक व्यक्तीला एक शब्द दिला होता. तो पूर्ण केल्याचा मला अभिमान वाटतो. तो म्हणजे, महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर काही करायची वेळ येील तेव्हा परळीच्या वैद्यनाथाला विचारल्याशिवाय काहीच करणार नाही, असं मी म्हणालो होतो. तो शब्द पूर्ण केला आहे, असं धनंजय मुंडे म्हणाले.

हे सुद्धा वाचा

आज पुन्हा तुमच्या डोळ्यात प्रेम दिसतंय

सकाळी 9 वाजता नगरहून निघालो आणि रात्री पावणे दहा वाजता परळीत पोहोचलो. सहा महिन्यापूर्वीचा काळ माझ्या डोळ्यासमोर येतोय. अपघात झाल्यावर आपण जे प्रेम दाखवले, त्यानंतर आज परत तुमच्या डोळ्यात प्रेम दिसतंय, असं भावूक उद्गारही त्यांनी काढलं.

सत्ता येते आणि जाते

महाराष्ट्राच्या राजकारणात काय झालं, काय नाही झालं हे आपण पाहिलं असेल. याचे तुम्हाला काही सोयरसुतक वाटतेय का? नाही. आगामी काळात आपल्याला राज्यात आणि देशात अधिक सन्मान मिळेल. सत्ता येते आणि जाते. पण सत्ता येताना आणि जाताना काय फरक असतो ते मी पाहिले आहे, असं ते म्हणाले.

मंत्रिमंडळ परळीत आणणार

पूर्वी ज्या पक्षात होतो तेव्हा मला विधान परिषदेत जायला मिळाले. मी पहिल्यांदा विधान मंडळात गेलो ते केवळ अजितदादांमुळे. मंत्री झालोय, त्यामुळं तुमच्या अपेक्षा वाढल्यात. कार्यकर्त्याच्या अपेक्षा पूर्ण करणे फार अवघड नाही. ही तयारी पाहिल्यावर नियम पाळावा की तोडावा असे वाटते. पण समोर चॅनेलवाले आहेत. परत एकदा सभा घ्यायची आहे. संपूर्ण मंत्रिमंडळाला परत इथे आणायचे आहे. अजितदादा, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना परळीत आणणार. आपल्या मातीचे नाव उभ्या देशात गाजवल्या गप्प बसणार नाही, असंही ते म्हणाले.

मोठी बातमी, मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल; म्हणाले 'वेळ अन् टार्गेट'
मोठी बातमी, मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल; म्हणाले 'वेळ अन् टार्गेट'.
पहलगामचा मास्टमाईंड कॅमेऱ्यात कैद, पाक सैन्याची कनेक्शन, काय होता डाव?
पहलगामचा मास्टमाईंड कॅमेऱ्यात कैद, पाक सैन्याची कनेक्शन, काय होता डाव?.
'आपल्याकडे वेळ कमी', मोदींचं सूचक विधान, पाकने घेतला धसका; काय होणार?
'आपल्याकडे वेळ कमी', मोदींचं सूचक विधान, पाकने घेतला धसका; काय होणार?.
पाकने युद्धाची वेळ सांगितली अन् मोदींची दिल्लीत फायनल बैठक, पुढे काय?
पाकने युद्धाची वेळ सांगितली अन् मोदींची दिल्लीत फायनल बैठक, पुढे काय?.
पाकिस्तानची झोप उडाली, भारत बदला घेण्यासाठी ही रणनिती वापरण्याची भिती
पाकिस्तानची झोप उडाली, भारत बदला घेण्यासाठी ही रणनिती वापरण्याची भिती.
'त्या' झिपलाइन ऑपरेटवरील संशय खरा? NIA च्या चौकशीतून मोठी माहिती समोर
'त्या' झिपलाइन ऑपरेटवरील संशय खरा? NIA च्या चौकशीतून मोठी माहिती समोर.
भारतानं पाकला पाडलं उघडं, संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा दाखला अन्...
भारतानं पाकला पाडलं उघडं, संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा दाखला अन्....
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या संरक्षण दलात मोठे बदल, 1 मे पासून...
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या संरक्षण दलात मोठे बदल, 1 मे पासून....
गुजरात ड्रग्स प्रकरणाचा पहलगाम हल्ल्याशी थेट संबंध - एनआयएने
गुजरात ड्रग्स प्रकरणाचा पहलगाम हल्ल्याशी थेट संबंध - एनआयएने.
इलेक्ट्रिक वाहनांच्या पॉलिसीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी
इलेक्ट्रिक वाहनांच्या पॉलिसीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी.