AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेनेतून आलेल्या बाळू धानोरकरांनी काँग्रेसची लाज राखली!

चंद्रपूर : लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीला मोठा पराभव स्वीकारावा लागला आहे. काँग्रेसला राज्यात केवळ एकाच जागेवर विजय मिळवता आला, ती म्हणजे चंद्रपूरची जागा. या मतदारसंघातून काँग्रेसचे बाळू धानोरकर विजयी झाले. विशेष म्हणजे, बाळू धानोरकर हे काही मूळचे काँग्रेसी नेते नाहीत. तर लोकसभा निवडणुकीत तिकीट मिळावं म्हणून बाळू धानोरकर […]

शिवसेनेतून आलेल्या बाळू धानोरकरांनी काँग्रेसची लाज राखली!
Follow us
| Updated on: May 23, 2019 | 8:18 PM

चंद्रपूर : लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीला मोठा पराभव स्वीकारावा लागला आहे. काँग्रेसला राज्यात केवळ एकाच जागेवर विजय मिळवता आला, ती म्हणजे चंद्रपूरची जागा. या मतदारसंघातून काँग्रेसचे बाळू धानोरकर विजयी झाले.

विशेष म्हणजे, बाळू धानोरकर हे काही मूळचे काँग्रेसी नेते नाहीत. तर लोकसभा निवडणुकीत तिकीट मिळावं म्हणून बाळू धानोरकर यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. चंद्रपूरच्या जागेवर काँग्रेसने उमेदवार घोषित केला होता. मात्र, बाळू धानोरकरांसाठी काँग्रेसने उमेदवार बदलण्याचा निर्णय घेतला.

बाळू धानोरकर यांना काँग्रेसचं तिकीट मिळाल्यानंतर त्यांनी शिवसेनेच्या आमदारकीचाही राजीनामा दिला. ते चंद्रपुरातील वरोरा विधानसभा मतदारसंघातून आमदार होते.

धानोरकर यांच्यासमोर भाजपकडूनही तगडं आव्हान उभं होतं. भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर हे चंद्रपुरातून उभे होते. केंद्रीय मंत्री असलेल्या हंसराज अहिर आणि शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेल्या बाळू धानोरकर यांच्यात ‘काँटे की टक्कर’ झाली. मात्र, अखेर बाळू धानोरकर यांचा विजय झाला.

राज्यात फक्त काँग्रेसला एकच जागा मिळाली आणि ती बाळू धानोरकर यांच्या रुपाने. त्यामुळे मूळच्या काँग्रेसी उमेदवाराने नव्हे, पण शिवसेनेतून आलेल्या उमेदवाराने काँग्रेसची राज्यात लाज राखली, हे निश्चित.

जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव.
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.