Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bhaskar Jadhav : मुंबई महापालिकेसाठी भाजप दंगल घडवेल, भास्कर जाधवांचा थेट आरोप

महाराष्ट्रात आमचं सरकार आलं आणि हिंदुचे सगळे सण साजरे व्हायला लागले आहेत असा अप्रचार सध्या राज्यात सुरु आहे. कारण कोरोनाच्या काळात आमच्या सरकारने संसर्ग अधिक पसरु नये म्हणून आमच्या सरकारनी निर्बंध लादले होते असंही त्यांनी वक्तव्य केलं.

Bhaskar Jadhav : मुंबई महापालिकेसाठी भाजप दंगल घडवेल, भास्कर जाधवांचा थेट आरोप
मुंबई महापालिकेसाठी भाजप दंगल घडवेल, भास्कर जाधवांचा थेट आरोपImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 03, 2022 | 11:58 PM

रत्नागिरी : देशात दंगली घडवण्याचे काम भारतीय जनता पार्टीने (BJP) केलं आहे. गुहागर मधील शिवसेना मेळाव्यात जाधव बोलत होते, त्यावेळी त्यांनी भाजपवरती थेट आरोप केले. मागच्या काही दिवसांपासून भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) राजकारणात अधिक सक्रिय झाले आहेत. त्यांनी आत्तापर्यंत भाजपवरती अनेकदा जोरादार टीकास्त्र केले आहे. जिथं जिथं भाजपची सत्ता आहे, तिथं तिथं दंगली झाल्या आहेत असा इतिहास असं मोठं वक्तव्य देखील भास्कर जाधव यांनी केलं. आज शिवसेनेच्या (Shivsena) एका मेळाव्यात बोलत होते. एकनाथ शिंदेसह अनेक आमदारांनी आपली वेगळी भूमिका मांडल्यापासून शिवसेना राज्यात बैठका घेत आहे. मुंबई पालिकेसाठी भाजप दंगल घडवेल असं वक्तव्य भास्कर जाधव यांनी केल्यापासून राज्यात पुन्हा राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

काही महिन्यात महापालिकेच्या निवडणुका लागणार आहेत. त्यामुळे आत्तापासून पालिकेच्या अनुशंगाने राजकीय नेत्यांनी बैठका घ्यायला सुरुवात केली आहे. भाजपच्या काही नेत्यांनी आत्तापासून मुंबई महापालिकेतील काही गोष्टी चव्हाट्यावर आणायला सुरुवात केली आहे. त्यामुळे होणारी निवडणुक अगदी संघर्षाची होईल अशी चिन्ह दिसत आहेत.

हे सुद्धा वाचा

आज झालेल्या मेळाव्यात भास्कर जाधव यांनी अनेक मोठी विधानं केली आहेत. भाजपाने महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी नवनीत राणा यांना पुढे केलं. त्याचबरोबर सुशांतसिंग राजपूत, कंगना राणावत अशी अनेक नावे घेतली. भाजपने आत्तापर्यंत अनेक नेत्यांना ईडीची भीती दाखवली आहे. तसेच राजकारण तापवत असताना कुणाच्या हातात हनुमान चाळिसा दिली असा आरोप भास्कर जाधव यांच्यावरती केला.

महाराष्ट्रात आमचं सरकार आलं आणि हिंदुचे सगळे सण साजरे व्हायला लागले आहेत असा अप्रचार सध्या राज्यात सुरु आहे. कारण कोरोनाच्या काळात आमच्या सरकारने संसर्ग अधिक पसरु नये म्हणून आमच्या सरकारनी निर्बंध लादले होते असंही त्यांनी वक्तव्य केलं. आमच्या सरकारच्या काळात सुध्दा अनेक सण साजरे झाले आहेत असं भास्कर जाधव यांनी उपस्थितांना सांगितलं.

कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.