AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vinayak Mete: फडणवीसांचा हातात हात अन् पंकजा मुंडेंच्या विरोधात प्रचार!, वाचा निवडणूक प्रचाराचा ‘तो’ किस्सा

Vinayak Mete : युतीचा भाग, देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय, पण पंकजा मुंडेंचा कडाडून विरोध, वाचा बीडच्या राजकारणातील 'तो' निवडणूक किस्सा...

Vinayak Mete: फडणवीसांचा हातात हात अन् पंकजा मुंडेंच्या विरोधात प्रचार!, वाचा निवडणूक प्रचाराचा 'तो' किस्सा
| Updated on: Aug 14, 2022 | 2:59 PM
Share

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय घडेल सांगता येत नाही. कधी कोण कुणासोबत जाईल अन् कधी काय घडेल सांगता येत नाही. साल होतं 2019 अन् निवडणूक होती लोकसभेची. एव्हाना निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. प्रचार हळूहळू त्याचं विस्तारित रुप धारण करत होता. महायुतीने आपले उमेदवार जाहीर केले होते. आघाडीने प्रचाराला सुरुवात केली होती. पण या सगळ्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये मात्र काहीतरी वेगळंच सुरु होतं. प्रीतम मुंडे या युतीच्या उमेदवार होत्या तर राष्ट्रवादीकडून बजरंग सोनावणे निवडणुकीच्या रिंगणात होते. विनायक मेटे (Vinayak Mete Passed Away) युतीचा महत्वपूर्ण भाग होते. शिवाय तत्वाकालिन मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे ते निकटवर्तीय होते.  पंकजा मुंडे (Pankaja Munde) तेव्हा महिला आणि बालकल्याणमंत्री होत्या. मेटे यांनी पंकजा मुंडेंच्या विरोधात रणशिंग फुंकलं होतं. अन् थेट राष्ट्रवादीच्या उमेदवाराला आपला पाठिंबा दिला होता.

युतीचा भाग पण पंकजांचा विरोध का?

युतीत असून देखील मेटे पंकजा मुंडेंचा विरोध का करत आहेत, असं अनेकांना वाटलं. एका मेळाव्या दरम्यान मेटेंनी आपली नाराजी बोलून दाखवली. आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना पंकजा मुंडे यांच्याकडून त्रास दिला जातो, असा थेट आरोप विनायक मेटे यांनी केला. आपण राज्यभर भाजपसोबत आहोत. पण बीड जिल्ह्यात भाजपचा प्रचार करणार नाही, राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार करणार, असं विनायक मेटे यांनी मेळाव्यात जाहीर केलं. विनायक मेटे यांनी बजरंग सोनवणे यांना पाठिंबा जाहीर केल्याने प्रीतम मुंडे आणि पंकजा मुंडे यांची डोकेदुखी चांगलीच वाढली होती. निकाल प्रितम मुंडे यांच्या बाजूने लागला. पण विनायक मेटे यांच्या विरोधामुळे मुंडे भगिनींना जास्त कसरत करावी लागली एवढं मात्र खरं…

विनायक मेटेंचं निधन

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचं निधन झालं आहे. आज पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास मुंबई- पुणे एक्सप्रेस हायवेवर त्यांच्या गाडीला अपघात झाला. खोपली इथल्या बातम बोगद्याजवळ हा अपघात झालाय.  मराठा समन्वय समितीची आज दुपारी बैठक होती. त्यासाठी ते मुंबईकडे येत होते. पण मुंबईत पोहोचण्याआधीच त्यांच्या गाडीचा अपघात झाला. त्यात ते गंभीररित्या जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं आहे.

पंकजा मुंडेंकडून शोक व्यक्त

खरोखरच विनायक मेटेंच्या निधनाची बातमी धक्कादायक आहे. मला सकाळी स्वत: चंद्रकांत पाटील यांनी फोन करून याबाबत माहिती दिलीयं. मात्र, ते गंभीर असल्याचे सांगितले गेले होते अगोदर, माझी आणि त्यांची काही दिवसांपूर्वीच सागर बंगल्यावर भेट झाली होती, आम्ही बऱ्याच वेळ जिल्हातील प्रश्नांबाबत चर्चा केली. तसेच सोबत मिळून कसे काम करता येईल यावर देखील आमचे बोलणे झाले. अत्यंत सर्वसामान्य कुटुंबामध्ये त्यांनी जन्म घेऊ संघर्ष केला. ते चार वेळा आमदार होते. मलाच एकच वाटते की, त्याचे हे जाण्याचे वय नव्हते अत्यंत धडधाकट माणूस अपघातामध्ये जातो हे अत्यंत दुदैवच म्हणावे लागेल, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी मेटेंच्या निधनावर शोक व्यक्त केलाय.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.