AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vidhan Parishad Election Result 2022 : फडणवीसांचा नाद करायचा नाय, राज्यातील प्रस्थापितांना त्यांनी लोळवलं; विजयानंतर प्रवीण दरेकरांची पहिली प्रतिक्रिया

विधानपरिषदेमध्ये भाजपाचा पाचवा उमेदवार देखील विजयी झाला आहे. या विजयानंतर भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमच्याकडे संख्याबळ नसताना देखील प्रसाद लाड हे विजयी झाले. फडणवीसांचा नाद करायचा नाही असे त्यांनी म्हटले आहे.

Vidhan Parishad Election Result 2022 : फडणवीसांचा नाद करायचा नाय, राज्यातील प्रस्थापितांना त्यांनी लोळवलं; विजयानंतर प्रवीण दरेकरांची पहिली प्रतिक्रिया
प्रवीण दरेकर
| Updated on: Jun 21, 2022 | 7:26 AM
Share

मुंबई : राज्यसभा निवडणुकीत भाजपाला (BJP) अनपेक्षित असे यश मिळाले होते. या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे (ShivSena) उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाला तर भाजपाचे महाडिक विजयी झाले होते. याच निकालाची पुनरावृत्ती पुन्हा एकदा विधान परिषदेमध्ये पहायला मिळाली. भाजपाचे उमेदवार प्रसाद लाड (Prasad Lad) हे विजयी झाले तर काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला आहे. यावर भाजप नेते प्रवीण दरेकरांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. या विजयाचे श्रेय देवेंद्र फडणवीस यांना जातं. आपल्याकडे एकही मत नसताना प्रसाद लाड विजयी झाले. ही किमया फडणवीसांनी करून दाखवली. देवेंद्र फडणवीसांचा नाद करायचा नाही. त्यांनी प्रस्तापितांना लोळवण्याचे काम केले, अशी प्रतिक्रिया विजयानंतर प्रवीण दरेकर यांनी दिली आहे. विधानपरिषद निवडणुकीत शिवसेनेचे दोन, राष्ट्रवादीचे दोन आणि भाजपाचे पाच उमेदवार विजयी झाले आहेत. या निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे उमदेवार चंद्रकांत हंडोरे यांचा पभारव झाला आहे.

काय म्हणाले प्रवीण दरेकर?

प्रवीण दरेकर यांनी या विजयाचे सर्व श्रेय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. आमच्याकडे एकही मत नसताना आमचे उमेदवार प्रसाद लाड हे विजयी झाले. ही किमया फडणवीसांनी करून दाखवली. त्यामुळे आता फडणवीस यांचा नाद करायचा नाही. त्यांनी प्रस्तापितांना लोळवण्याचे काम केले, अशी प्रतिक्रिया विजयानंतर प्रवीण दरेकर यांनी दिली आहे. तसेच त्यांनी यावेळी शिवसेनेवर देखील निशाणा साधला आहे. पराभव झाल्यानंतर जनतेसमोर येण्यासाठी धाडस लागतं, उद्याचा सामना वाचा तुम्हाला सर्व काही कळून जाईल. ‘गिर गया तो भी टांग उपर’ अशी शिवसेनेची भूमिका असल्याचे दरेकर यांनी म्हटले आहे.

कोणाची किती मतं फुटली?

विधानपरिषद निवडणुकीत पुन्हा एकदा राज्यसभा निवडणुकीची पुनरावृत्ती झाल्याचे पहायला मिळाले. पुरेसे संख्याबळ नसताना देखील भाजापाचा पाचवे उमेदवार प्रसाद लाड हे विजयी झाले. दुसरीकडे या निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसला. काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेने मात्र आपले दोन्ही उमेदवार निवडून आणले. या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे एकूण आमदार 55 होते. अपक्ष आमदार मिळून त्यांचे संख्याबळ 64 च्या आसपास जात होते. त्यापैकी त्यांना केवळ 52 मतं पडली. शिवसेनेचे एकूण 12 मतं फुटली. तर काँग्रेसचे एकूण 44 आमदार आहे. अपक्ष मिळून त्यांचे संख्याबळ 48 एवढे होते. मात्र त्यांना 42 एवढेच मतं पडली. काँग्रेसचे सहा मतं फुटली. दुसरीकडे भाजपाला 21 मतं अधिक मिळाली. तर राष्ट्रवादीला 6 मतं अधिक मिळाली.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.