AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मोदींना विनंती केल्यानंतर विधान परिषदेवर गेलात’, भातखळकरांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोनवरुन विनंती केल्यानंतर विधान परिषदेत गेलात. त्यामुळे तुम्हाला विधानसभेत जाता येतं' अशा शब्दात भातखळकरांनी उद्धव ठाकरे यांना टोला हाणला आहे.

'मोदींना विनंती केल्यानंतर विधान परिषदेवर गेलात', भातखळकरांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, भाजप आमदार अतुल भातखळकर
| Updated on: Jan 28, 2021 | 9:54 PM
Share

मुंबई : ‘मी विधानसभेत तुमच्या मुळे आणि तुम्ही महापालिकेत आमच्यामुळे’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यावरुन भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी जोरदार टोला लगावलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोनवरुन विनंती केल्यानंतर विधान परिषदेत गेलात. त्यामुळे तुम्हाला विधानसभेत जाता येतं’ अशा शब्दात भातखळकरांनी उद्धव ठाकरे यांना टोला हाणला आहे. मुंबई महापालिकेत आजपासून हेरिटेज वॉक सुरु करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं आज उद्घाटन करण्यात आलं. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यावरुन भातखळकर यांनी शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.(Atul Bhatkhalkar criticizes CM Uddhav Thackeray)

“मी विधानसभेत तुमच्यामुळे; तुम्ही महापालिकेत आमच्यामुळे: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. विधानसभेत? कोणत्या मतदार संघातून निवडणूक लढवली आणि जनतेने तुम्हाला कधी निवडून दिलं? मोदींना फोनवर विनंती केल्यानंतर विधान परिषदेवर गेलात तुम्ही. त्यामुळे विधानसभेत जाता येते तुम्हाला,” अशा शब्दात भातखळकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यासाठी त्यांनी टीव्ही 9 मराठीच्या बातमीचा दाखला दिला आहे.

मुख्यमंत्री काय म्हणाले?

हेरिटेज वॉक उपक्रमाच्या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी महापालिकेशी संबंधित आठवणींना उजाळा दिला. तसेच आजपासून मुंबई महापालिकेच्या भिंतीही त्यांचा इतिहास सांगतील, असे उद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले. तसेच मी विधानसभेत तुमच्यामुळे, तुम्ही महापालिकेत आमच्यामुळे आहात, असं मुख्यमंत्र्यांनी म्हणताच एकच खसखस पिकली.

गॉथिक शैलीतील मुंबई महापालिकेची सफर पर्यटकांना करता यावी म्हणून मुंबई महापालिकेने आजपासून हे हेरिटेज वॉक सुरू केल आहे. या निमित्ताने पर्यटकांना ही ऐतिहासिक इमारत पाहता येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज शुक्रवारी या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, पर्यटन राज्यमंत्री आदिती ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप आणि पालिका स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव उपस्थित होते. महापालिकेत हेरिटेज वॉक केल्यानंतर महापालिका सभागृहात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांना संबोधित केले.

संबंधित बातम्या :

मी विधानसभेत तुमच्यामुळे; तुम्ही महापालिकेत आमच्यामुळे: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

इक्बाल चहल मी लक्षात ठेवेन, शेवटी माझ्या लेकानेच मला महापालिका मुख्यालयात आणलं’ : अजित पवार

Atul Bhatkhalkar criticizes CM Uddhav Thackeray

Follow Us
नाशिक धर्मांतर प्रकरणात मोठी घडामोड! धर्मांतर, हिजाब ट्रेनिंग.....
नाशिक धर्मांतर प्रकरणात मोठी घडामोड! धर्मांतर, हिजाब ट्रेनिंग......
अखेर ठरलं! हा नेता होणार पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री
अखेर ठरलं! हा नेता होणार पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री.
तामिळनाडूत राजकीय खळबळ! थलपती विजय सरकार स्थापनेच्या उंबरठ्यावर?
तामिळनाडूत राजकीय खळबळ! थलपती विजय सरकार स्थापनेच्या उंबरठ्यावर?.
मी पालकमंत्र्यांना काडीमात्र भाव देत नाही, पालकमंत्री पोलीस आहेत का?
मी पालकमंत्र्यांना काडीमात्र भाव देत नाही, पालकमंत्री पोलीस आहेत का?.
TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान गरोदर?
TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान गरोदर?.
निदा खान प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट... एमआयएमचा नगरसेवक सहआरोपी
निदा खान प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट... एमआयएमचा नगरसेवक सहआरोपी.
नाशिक TCS प्रकरणातील मास्टरमाईंडला बेड्या; 42 दिवस पोलिसांना गुंगारा..
नाशिक TCS प्रकरणातील मास्टरमाईंडला बेड्या; 42 दिवस पोलिसांना गुंगारा...
जय पवारांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट....
जय पवारांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट.....
बदलापूरनंतर गोवंडीत संतापजनक घटना; शाळेतील शिपायाकडून 6 वर्षीय....
बदलापूरनंतर गोवंडीत संतापजनक घटना; शाळेतील शिपायाकडून 6 वर्षीय.....
दहावीच्या निकालात कोकण विभाग पुन्हा अव्वल; राज्याचा निकाल 92.09 टक्के
दहावीच्या निकालात कोकण विभाग पुन्हा अव्वल; राज्याचा निकाल 92.09 टक्के.