AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राणा जगजितसिंहांचं सलग तिसरं पत्र, म्हणाले, ‘मुख्यमंत्री होऊन 22 महिने झाले तरीही एक बैठक नाही’

भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सलग तिसरं पत्र लिहिलं आहे. तिसऱ्या पत्राच्या माध्यमातून त्यांनी उस्मानाबाद जिल्ह्याच्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेऊन मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका केली आहे.

राणा जगजितसिंहांचं सलग तिसरं पत्र, म्हणाले, 'मुख्यमंत्री होऊन 22 महिने झाले तरीही एक बैठक नाही'
राणा जगजितसिंह पाटील आणि उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Sep 18, 2021 | 11:49 AM

मुंबई : भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सलग तिसरं पत्र लिहिलं आहे. तिसऱ्या पत्राच्या माध्यमातून त्यांनी उस्मानाबाद जिल्ह्याच्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेऊन मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका केली आहे. ‘मुख्यमंत्री होऊन 22 महिने उलटले तरी उस्मानाबाद जिल्ह्याच्या अति महत्वाच्या विषयांकडे ठाकरे सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. आजवर जिल्ह्यातील विकास कामांबाबत आपण एकही व्यापक बैठक घेतलेली नाही’, असं त्यांनी पत्रात म्हटलं आहे.

उस्मानाबाद जिल्ह्याचे अनेक विषय प्रलंबित

शिवसेनेच्या मंत्री महोदयांकडे तांत्रिक कापड निर्मिती प्रकल्प (टेक्निकल टेक्स्टाईल पार्क), सोलापूर – तुळजापूर – उस्मानाबाद रेल्वे मार्ग, तुळजापूर शहराचा ‘प्रशाद’ योजनेत समावेश करणे, वॉटर ग्रीड, पीक विमा असे अनेक विषय प्रलंबितच आहेत, अशी तक्रारही त्यांनी पत्राच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यावर घोर अन्याय

रजाकारांपासून आम्हाला मुक्ती मिळून 73 वर्षे झाले व या मुक्ती संग्राम दिनी आपल्याला शुभेच्छा देत असताना उस्मानाबाद जिल्ह्यावर होत असेलल्या या घोर अन्यायाची जबाबदारी ठाकरे सरकारवरच असल्याचा घणाघात त्यांनी पत्रातून उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे.

केंद्र सकारात्मक, राज्य सरकार सहकार्य करत नाही, ही भावना वेदनादायी

उस्मानाबाद जिल्ह्यावर अन्याय होत असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झालेली आहे. ‘आकांक्षीत’ जिल्ह्याच्या विकासासाठी केंद्र सकारात्मक असताना आपलेच राज्य सरकार सहकार्य करत नाही ही भावना खूप वेदनादायी असल्याचं राणा जगजितसिंह पाटील यांनी पत्रातून म्हटलं आहे.

(BJP MLA Rana jagjeetSinh Patil Write a Letter to Cm Uddhav Thackeray Over osmanabad District probleam)

हे ही वाचा :

राणा जगजितसिंह पाटील मैदानात, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सडेतोड पत्र

भारत - पाकमधला तणाव वाढला; सीमेवर नागरिकांकडून बंकरची साफसफाई सुरू
भारत - पाकमधला तणाव वाढला; सीमेवर नागरिकांकडून बंकरची साफसफाई सुरू.
'मी पाकिस्तानची...', भारत सोडण्यावर सीमा हैदरची मोठी प्रतिक्रिया
'मी पाकिस्तानची...', भारत सोडण्यावर सीमा हैदरची मोठी प्रतिक्रिया.
पाकिस्तान्यांना आज भारत सोडावाच लागणार;अटारी सीमेवर काय आहे परिस्थिती?
पाकिस्तान्यांना आज भारत सोडावाच लागणार;अटारी सीमेवर काय आहे परिस्थिती?.
पाकिस्तानला एकटं पडण्याची जोरदार तयारी; मोदींनी कोणाकोणाला केले फोन
पाकिस्तानला एकटं पडण्याची जोरदार तयारी; मोदींनी कोणाकोणाला केले फोन.
'तो हल्ला भयानक, पण मला खात्री...', पहलगामवर ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य
'तो हल्ला भयानक, पण मला खात्री...', पहलगामवर ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य.
दहशतवाद्यांचं काऊंटडाऊन सुरू... भारताकडून यादीच जाहीर, आता पुढे काय?
दहशतवाद्यांचं काऊंटडाऊन सुरू... भारताकडून यादीच जाहीर, आता पुढे काय?.
VIDEO: गोळ्यांचा आवाज, आर्त किंकाळ्या.. हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर
VIDEO: गोळ्यांचा आवाज, आर्त किंकाळ्या.. हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर.
भारत-पाक सीमेवर हायअलर्ट, रखरखत्या उन्हातही BSF कडून युद्धाभ्यास सुरू
भारत-पाक सीमेवर हायअलर्ट, रखरखत्या उन्हातही BSF कडून युद्धाभ्यास सुरू.
पाकड्यांची मस्ती उतरेना...सामान्य वेषात अन् पठाणी सूटमध्ये LOC वर रेकी
पाकड्यांची मस्ती उतरेना...सामान्य वेषात अन् पठाणी सूटमध्ये LOC वर रेकी.
छुप्या दहशतवादी कारवायांवर आता ध्रुवची नजर,'पहलगाम'नंतर आर्मीचा निर्णय
छुप्या दहशतवादी कारवायांवर आता ध्रुवची नजर,'पहलगाम'नंतर आर्मीचा निर्णय.