AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra politics: …तर लोकशाही कशी जिवंत राहणार?, भाजपाला अटलजींच्या विचारांची गरज; ‘सामना’मधून पुन्हा टीकेचे बाण

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या संपादकीयमधून पुन्हा एकदा भाजपावर निशाणा साधण्यात आला आहे. भाजपाला अटलजींच्या विचाराची गरज असल्याचे म्हटले आहे.

Maharashtra politics: ...तर लोकशाही कशी जिवंत राहणार?, भाजपाला अटलजींच्या विचारांची गरज; 'सामना'मधून पुन्हा टीकेचे बाण
संजय राऊत Image Credit source: tv9
| Updated on: Jul 01, 2022 | 7:21 AM
Share

मुंबई : शिवेसेनेचे (Shiv Sena) मुखपत्र असलेल्या सामनाच्या संपादकीयमधून पुन्हा एकदा भाजप आणि बंडखोर आमदारांवर टीकेचे बाण सोडण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील राजकारणात एक सोनेरी पान लिहिले गेले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर एका क्षणात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यांनाही काही काळ थांबून विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी गोंधळ निर्माण करून काही आमदारांचे निलंबन घडवून ते सरकार वाचवू शकले असते. पण त्यांनी तो मार्ग निवडला नाही, व आपल्या स्वभावाला साजेशी भूमिका घेतली. त्यांनी आधीच वर्षा बंगला सोडला होता, त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्रीपद आणि विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा देखील राजीनामा दिला. या सर्व पार्श्वभूमीवर अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांची दोन महत्त्वाची विधाने आठवतात. अटलजींचे सरकार फक्त एका मताने कोसळत असतानाही अटल बिहारी विचलित झाले नाहीत. तोडफोड करून मिळालेल्या बहुमतास मी चिमट्यानेही शिवणार नाही” असे त्यांनी म्हटले होते. पण त्यांनी पुढे जे सांगितले त्याची नोंद आजच्या भाजप नेत्यांनी घेणे गरजेचे आहे. ते लोकसभेच्या सभागृहात म्हणाले ”मंडी सजी हुई थी, माल भी बिकने केलिए तैयार था, लेकिन हमने माल खरीदना पसंद नही किया था!” अटलजींचा हा वारसा आज संपला आहे, असा घणाघात सामनाच्या संपादकीयमधून करण्यात आला आहे.

बंडखोरांच्या सुरक्षेसाठी सैन्य मैदानात

पुढे सामनाच्या संपादकीयमध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्रातले आमदार आधी सुरतला नेले. तेथून त्यांना आसामला हलवले. आता ते गोव्यात आले व त्यांचे स्वागत भाजपवाले मुंबईत करीत आहेत. देशाच्या सीमेच्या रक्षणासाठी असलेले हजारो जवान खास विमानाने मुंबईच्या विमानतळावर उतरले. इतका बंदोबस्त केंद्र सरकार ठेवत आहे तो कोणासाठी? ज्या पक्षाने जन्म दिला त्या पक्षाशी, हिंदुत्वाशी, बाळासाहेब ठाकरे यांच्याशी द्रोह करणाऱ्या आमदारांच्या संरक्षणासाठी? असा सवाल देखील सामनामधून उपस्थित करण्यात आला आहे. हिंदुस्थानसारख्या महान देशाला आणि त्या महान देशाच्या घटनेला नैतिक ऱ्हासाने ग्रासून टाकले आहे. या परिस्थितीत नजीकच्या भविष्यकाळात तरी बदल होण्याची चिन्हे दिसत नाहीत कारण बाजारात सर्वच रखवालदार विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

…तर लोकशाही कशी जिवंत राहणार?

सामनाच्या संपादकीयमधून मोदींवर देखील टीका करण्यात आली आहे. जगभरात लोकशाहीचा डंका वाजवत फिरायचे आणि आपल्याच लोकशाही व व्यक्तिस्वातंत्र्याच्या दिव्याखाली अंधार, अशी सध्याची स्थिती आहे, विरोधी पक्षाचे अस्तित्व संपवून या देशात लोकशाही कशी जिवंत राहणार? शिवसेनेचे आमदार फुटावेत यासाठी कोणत्या महाशक्ती प्रयत्न करीत होत्या हे मुंबईत उतरविलेल्या सैन्याने उघड केल्याचे सामनाच्या संपादकीयमध्ये म्हटले आहे.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.