AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मध्य प्रदेशात भाजपचा आमदार खासदार झाल्याने कमलनाथ सरकार सुरक्षित

भोपाळ : राजकारणात कोणत्या गोष्टीचा फायदा कुणाला होईल याचा काही नेम नाही. मध्य प्रदेशातही असंच झालंय. काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ला असला तरी विधानसभेत मात्र काँग्रेस सध्या तरी सुरक्षित आहे. मध्य प्रदेशचे रतलाममधील आमदार खासदार झाल्यामुळे काँग्रेसला फायदा झालाय. भाजपचा एक आमदार कमी झाल्यामुळे काँग्रेसची स्थिती काही प्रमाणात मजबूत झाली आहे. आमदार जीएस दामोर […]

मध्य प्रदेशात भाजपचा आमदार खासदार झाल्याने कमलनाथ सरकार सुरक्षित
| Edited By: | Updated on: May 28, 2019 | 9:27 PM
Share

भोपाळ : राजकारणात कोणत्या गोष्टीचा फायदा कुणाला होईल याचा काही नेम नाही. मध्य प्रदेशातही असंच झालंय. काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ला असला तरी विधानसभेत मात्र काँग्रेस सध्या तरी सुरक्षित आहे. मध्य प्रदेशचे रतलाममधील आमदार खासदार झाल्यामुळे काँग्रेसला फायदा झालाय. भाजपचा एक आमदार कमी झाल्यामुळे काँग्रेसची स्थिती काही प्रमाणात मजबूत झाली आहे.

आमदार जीएस दामोर यांना लोकसभा निवडणुकीचं तिकीट देण्यात आलं होतं. दामोर यांची संसदेवर निवड झाल्यामुळे त्यांना आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल. त्यांनी राजीनामा दिल्यास 230 सदस्यसंख्या असलेला आकडा 229 वर येईल. जास्तीत जास्त सहा महिन्यांपर्यंत ही परिस्थिती राहू शकते. सहा महिन्याच्या आत पोटनिवडणूक घेतली जाते. दुसरीकडे झाबुआ मतदारसंघात विधानसभेची पोटनिवडणूक बाकी आहे. काँग्रेसकडे सध्या 115 आमदार आहेत. त्यामुळे काही दिवसांसाठी का होईना अस्थिरतेचा धोका टळला आहे.

काँग्रेसचे आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा भाजपकडून सातत्याने केला जातोय. 229 वर संख्याबळ आल्यामुळे काँग्रेसची स्थिती आणखी मजबूत झाल्याचं भाजप नेतेही मान्य करतात. तर विरोधी पक्ष नेते गोपाल भार्गव यांनी अनेकदा सरकार पाडण्याचा इशारा दिलाय. पण तूर्तास आम्हाला कोणतीही घाई नसल्याचंही ते म्हणाले.

आमदार असताना संसदेत निवड झाल्यानंतर आमदारकी किंवा खासदारकी यापैकी एक निवडणं गरजेचं असतं. रतलामचे आमदार यापैकी काय निवडतील यावरही भाजप नेत्याने उत्तर दिलं. राज्यातच राहण्याची आता कोणतीही शक्यता नाही. कारण काँग्रेसवाले अगोदरच घाबरलेले आहेत. आम्हाला काहीही करण्याची गरज नाही. त्यांच्यातच अंतर्गत वाद चालू आहेत आणि एक दिवस सरकार आपोआप पडणार आहे, असं एका भाजप नेत्याने सांगितलं.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.