AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uddhav Thackeray : एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे थेट जनतेशी बोलणार, 5 वा. लॉग ऑन करा tv9 मराठी

शिवसेनेत एवढं मोठ बंड झाल्यावर मुख्यमंत्री काय बोलणार? तसेच कोणती मोठी घोषणा करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Uddhav Thackeray : एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे थेट जनतेशी बोलणार, 5 वा. लॉग ऑन करा tv9 मराठी
तुम्ही आरती केली तर आम्ही पण करणार, शिंदे गटाने गणपतीच्या आरतीची घोषणा करताच ठाकरे गटही उद्या आरती करणारImage Credit source: tv9
| Updated on: Jun 22, 2022 | 5:01 PM
Share

मुंबई : एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) बंडानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) थेट जनतेशी बोलणार आहेत. ते पाच वाजता राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. शिवसेनेत एवढं मोठ बंड झाल्यावर मुख्यमंत्री काय बोलणार? तसेच कोणती मोठी घोषणा करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. यावेळी उद्धव ठाकरे ही एखादी मोठी घोषणा करण्याचीही शक्यता आहे. सध्या एकनाथ शिंदे यांची जे विधानसभा अध्यक्षांना (Assembly Speaker) पत्र लिहिलं आहे. त्या पत्रावर 34 शिवसेना आमदारांच्या सह्या असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सहाजिकच उद्धव ठाकरे यांच्याकडे आमदारांची सख्या ही अल्पशी उरलेली. सकाळपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या राजीनाम्याचीही चर्चा आहे. त्यामुळे मुख्यमत्री उद्धव ठाकरे हे राजीनाम्याची घोषणा करणार का? असाही एक सवाल सध्या राज्याच्या राजकारणात विचारला जात आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं ट्विट

बंडांच्या 72 तासानंतर जनतेला काय बोलणार?

शिवसेनेतलं सर्वात मोठं बंड झाल्याच्या 72 तासांनंतर मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे हे जनतेशी बोलणार आहेत. या काही तासांमध्ये अनेक राजकीय घडामोडी घडल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचं फोनवरून बोलणं हेही झालं आहे. तसेच अनेक बैठाक पार पडल्या आहे. इकडे मुंबईत महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या अनेक बैठका झाल्या आहेत. तर तिकडे भाजप नेते हे सत्ता बदलासाठी सुत्रं फिरवताना दिसत आहे. त्यामुळे आजचा दिवस हा राज्याच्या राजकारणातला सर्वात मोठा आहे.

एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांची वेळ मागितली

तर दुसरीकडे शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांची वेळ मागितली आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांची पुढची चाल काय असणार? याचा अंदाजही सध्या तरी कुणाला लागत नाही. भाजपच्या गोटातही सत्ता बदलासाठीच्या हलचाली वेगाने वाढल्या आहेत. चंद्रकांत पाटील हे काही आमदारांसह गुवाहाटीला रवाना झाले आहेत. त्यामुळे पुढचे काही तास हे राज्याच्या राजकारणात सर्वात महत्वाचे ठरणार आहेत. राज्यात सध्या सत्ता बदलाच्या चर्चांनी चांगलाच जोर धरला आहे. तसेच पुन्हा फडणवीस सरकार येणार असल्याच्या चर्चांनी सध्या रान पेटवलं आहे. मात्र राज्याचं राजकारण कोणत्या दिशेने जातं हे पाहण्यासाठी पुढचे काही तास वाट पाहावी लागणार आहे.

ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.