AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऋतुजा लटके राजीनामा प्रकरण, चित्र वाघ यांनी आयुक्तांवरील दबावाचे आरोप फेटाळले, ठाकरे गटाच्या टीकेला सडेतोड उत्तर

सध्या ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्यावरून शिंदे गट आणि ठाकरे गटात आरोप -प्रत्यारोप सुरू आहेत. या वादावर आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ऋतुजा लटके राजीनामा प्रकरण, चित्र वाघ यांनी आयुक्तांवरील दबावाचे आरोप फेटाळले, ठाकरे गटाच्या टीकेला सडेतोड उत्तर
Image Credit source: Twitter
| Updated on: Oct 13, 2022 | 3:39 PM
Share

मुंबई : सध्या ऋतुजा लटके (Rituja Latke) यांच्या राजीनाम्यावरून शिंदे गट आणि ठाकरे गटात आरोप -प्रत्यारोप सुरू आहेत. ऋतुजा लटके यांना उमेदवारी मिळू नये यासाठी शिंदे, फडणवीस सरकारने महापालिका आयुक्तांवर दबाव आणल्याचा आरोप शिवसेना (Shiv sena) उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून केला जात आहे. दुसरीकडे मात्र भाजपाने (BJP) हे आरोप फेटाळून लावले आहेत. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी ठाकरे गटाच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. लटके यांच्या राजीनाम्याबाबत महापालिका आयुक्तांवर कसलाही दबाव नसल्याचं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

आरोप फेटाळले

चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरे गटाकडून करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. लटके यांच्या राजीनाम्याबाबत महापालिका आयुक्तांवर कुठलाही दबाव नाही. याबाबत महापालिका आयुक्तांनी स्वत:च स्पष्ट केलं आहे. त्यांनी आपल्यावर कोणताही राजकीय दबाव नसल्याचं म्हटलं आहे. राजीनाम्याची जी तीस दिवसांची प्रक्रिया असते ती प्रक्रिया आयुक्त सध्या फॉलो करत असल्याचं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

ठाकरे गटाचे नेमके आरोप काय?

ऋतुजा लटके यांना उमेदवारी मिळावी नाही यासाठी शिंदे सरकारने राजीनामा मंजूर न करण्यासाठी आयुक्तांवर दबाव टाकल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी केला आहे. त्यांनी शिंदे, फडणवीस सरकारवर घणाघात केला. लटके यांनी नियमानुसार तीन ऑक्टोबरलाच राजीनामा दिला होता. तसेच महापालिकेच्या संबंधित विभागाकडे नियमानुसार एका महिन्याचा पगार देखील जमा करण्यात आला होता. मात्र तरी देखील लटके यांचा राजीनामा मंजूर झाला नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. परंतु  दुसरीकडे चित्रा वाघ यांनी हे आरोप फोटाळून लावले आहेत.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.