Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोना अंगावर काढू नका, पावसाळ्यात अधिक काळजी घेणे गरजेचे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोरोना औषधांचा अनाठायी वापर टाळायला हवा, असा सल्ला ही उद्धव ठाकरेंनी यावेळी दिला. (CM Uddhav Thackeray caution about Corona Third wave) 

कोरोना अंगावर काढू नका, पावसाळ्यात अधिक काळजी घेणे गरजेचे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
CM Uddhav thackeray
Follow us
| Updated on: May 29, 2021 | 3:51 PM

मुंबई : राज्यातील कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत नाही तोपर्यंत तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका असल्याचे बोललं जात आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महिला आणि बाल विकास विभागासोबत बैठक घेतली.  कोरोनाचा आजार वेगळा आहे. तो अंगावर काढू नका. कोरोना औषधांचा अनाठायी वापर टाळायला हवा, असा सल्ला ही उद्धव ठाकरेंनी यावेळी दिला. (CM Uddhav Thackeray caution about Corona Third wave)

“कोरोनाचा आजार अंगावर काढू नका” 

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता अधिक आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. काही दिवसांनी राज्यात पावसाच्या सरी कोसळायला सुरुवात होईल. त्यामुळे पावसाळ्यात सर्वाधिक काळजी घेणं गरजेचे आहे, असेही उद्धव ठाकरेंनी सांगितले. तसेच कोरोनाचा आजार अंगावर काढू नका. कोरोना औषधांचा अनाठायी वापर टाळायला हवा, असा सल्ला ही उद्धव ठाकरेंनी यावेळी दिला.

कोरोनाचा विषाणू अधिक झपाट्याने पसरतो आहे. त्यामुळे काळजी घ्या. कोणालीही बंधनात राहणे आवडत नाही, पण काळजी घेणे गरजेचे आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

बालकांना सुरक्षित ठेवण्यासाठी सूचना

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज महिला आणि बाल विकास विभागासोबत बैठक पार पडली. या बैठकीत कोरोनापासून बालकांना सुरक्षित ठेवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी  काही सूचना दिल्या. तसेच कोरोनामुळे दोन्ही किंवा एका पालकाचा मृत्यू झाला असेल तर बालकांबाबत विभागाने धोरण निश्चित करावे. या बालकांना संगोपनापासून शिक्षणापर्यंतचे लाभ कसे देता येतील, याची माहिती द्यावी, असे उद्धव ठाकरेंनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वाच्या सूचना

?टास्कफोर्समधील बालरोगतज्ज्ञ आणि महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांत संवाद घडवून आणावा.

?या संवादात बालकांना कोरोनापासून कशाप्रकारे सुरक्षित करता येईल याचे मार्गदर्शन करावे.

?विभागाचा बालकांसंदर्भातील अनुभव आणि माहितीची देवाणघेवाण करावी.

?यासंदर्भातील उपाययोजनांचा मार्गदर्शक सूचनांमधे समावेश करावा.

?कोरोनामुळे दोन्ही किंवा एका पालकाचा मृत्यू झालेल्या बालकांबाबत विभागाने धोरण निश्चित करावे.

?अशा बालकांना संगोपनापासून शिक्षणापर्यंतचे लाभ कसे देता येतील याची माहिती द्यावी.

बालकांचे कुपोषण कमी करण्याच्यादृष्टीने काम करा

माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियानांतर्गत राज्यातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचून कुटुंबांचे सर्वेक्षण झालं आहे. या सर्वेक्षणाची संपूर्ण माहिती संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे आहे. त्यात बालकांची माहिती ही समाविष्ट आहे. यामधील कमी वजनाच्या बालकांकडे अधिक लक्ष देऊन त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी असंही मुख्यमंत्री म्हणाले. ग्रामीण, आदिवासी तसेच शहरी भागातील बालकांचे कुपोषण कमी करण्याच्यादृष्टीने आयसीडीएसची पुनर्रचना करण्यासंदर्भात विभागाने प्रस्ताव सादर करावा, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.  (CM Uddhav Thackeray caution about Corona Third wave)

संबंधित बातम्या :

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून बालकांना सुरक्षित ठेवा, मुख्यमंत्र्यांचा टास्कफोर्सला महत्वाचा सल्ला

कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना सरकार आधार देणार?, यशोमती ठाकूर यांचा मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव

संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला.
'तुम्ही मुसलमांनाना का डॉमिनेट करता?,'शिरसाट आणि आव्हाडांमध्ये खडाजंगी
'तुम्ही मुसलमांनाना का डॉमिनेट करता?,'शिरसाट आणि आव्हाडांमध्ये खडाजंगी.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; काय आहे सुनावणीचे अपडेट्स? इनसाईड स्टोरी
संतोष देशमुख हत्या प्रकरण; काय आहे सुनावणीचे अपडेट्स? इनसाईड स्टोरी.
पवारच आता दादांसोबत जातील... बच्चू कडूंच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण
पवारच आता दादांसोबत जातील... बच्चू कडूंच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण.
माझ्यावरचा हल्ला रोहित पवारांनीच केला; पडळकरांचा खळबळजनक आरोप
माझ्यावरचा हल्ला रोहित पवारांनीच केला; पडळकरांचा खळबळजनक आरोप.
'रात्री एक्स्प्रेस हायवेवर बोलवलं अन्...' दादांनी सांगितला 'तो' किस्सा
'रात्री एक्स्प्रेस हायवेवर बोलवलं अन्...' दादांनी सांगितला 'तो' किस्सा.
रायगडावरील वाघ्या कुत्र्यावरून वाद कायम, सरकार सोक्षमोक्ष करणार?
रायगडावरील वाघ्या कुत्र्यावरून वाद कायम, सरकार सोक्षमोक्ष करणार?.
माझ्या नावाची अडचण असेल तर पत्र लगेच मागे घेतो..; भास्कर जाधव चिडले
माझ्या नावाची अडचण असेल तर पत्र लगेच मागे घेतो..; भास्कर जाधव चिडले.
हातात तिरंगा अन् विधानभवन परिसरातील झाडावर 'त्याचं' आंदोलन, मागणी काय?
हातात तिरंगा अन् विधानभवन परिसरातील झाडावर 'त्याचं' आंदोलन, मागणी काय?.
'सौगात ए मोदी'चं आम्ही स्वागत करतो, पण..; राऊतांनी घेतली भाजपची बाजू
'सौगात ए मोदी'चं आम्ही स्वागत करतो, पण..; राऊतांनी घेतली भाजपची बाजू.