AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तबेल्यातून घोडे फरार झाल्यावरच आपण जागणार का? राजस्थानच्या स्थितीवर कपिल सिब्बल यांच्याकडून नाराजी

मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे राजस्थानमधील सरकारच्या स्थितीवर काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांनी चिंता व्यक्त केली (Kapil Sibal on Rajasthan).

तबेल्यातून घोडे फरार झाल्यावरच आपण जागणार का? राजस्थानच्या स्थितीवर कपिल सिब्बल यांच्याकडून नाराजी
| Updated on: Jul 12, 2020 | 6:08 PM
Share

नवी दिल्ली : राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वातील सरकार संकटात आल्याच्या मुद्द्यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी चिंता व्यक्त केली आहे (Kapil Sibal on Rajasthan Political Crisis). घोडे तबेल्यातून फरार झाल्यावरच आपण जागणार आहोत का? असा थेट सवाल सिब्बल यांनी विचारला आहे. तसेच राजस्थानमधील पक्षाच्या स्थितीबद्दल काळजीत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. त्यांनी ट्विट करत आपलं मत व्यक्त केलं.

कपिल सिब्बल म्हणाले, “घोडे तबेल्यातून फरार झाल्यावरच आपण जागणार आहोत का? पक्षाच्या स्थितीबद्दल काळजी वाटत आहे.” राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी भाजपवर राज्य सरकार पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला आहे. भाजप राजस्थान काँग्रेसचे आणि इतर काही अपक्ष आमदार 10-15 कोटी रुपये देऊन खरेदी करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

दरम्यान, मध्य प्रदेशनंतर राजस्थानमधील काँग्रेस सरकारही संकटात येण्याची भीती वर्तवली जात आहे. राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातील संघर्ष वाढत असल्याचे बोलले जात आहे. एकीकडे काँग्रेस सरकार पाडण्यासाठी भाजप राजस्थानमध्ये घोडेबाजाराचा प्रयत्न करत असल्याचा आरोप गेहलोत यांनी केला आहे. तर सचिन पायलट दिल्ली दरबारी पोहोचल्याने चर्चांना ऊत आला आहे.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

अशोक गहलोत यांनी काल (शनिवारी) रात्री साडेआठ वाजता कॅबिनेट मंत्र्यांची बैठक बोलावली. सुमारे दोन तास चाललेल्या या बैठकीत राजस्थान सरकारचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट उपस्थित नव्हते. पायलट यांच्यासह काँग्रेसचे 10 आमदार दिल्लीत गेल्याने राजकीय संकट गडद झाल्याचं बोललं जात आहे.

हेही वाचा :

Rajasthan Politics | राजस्थानमध्ये राजकारण तापले, गेहलोत यांचा भाजपवर घोडेबाजाराचा आरोप, पायलट दिल्लीत

Kapil Sibal on Rajasthan Political Crisis

निकालादरम्यान जामखेडमध्ये अचानक मतमोजणी थांबवली, कारण काय?
निकालादरम्यान जामखेडमध्ये अचानक मतमोजणी थांबवली, कारण काय?.
बीडमध्ये दादांना धक्का तर भाजपचं वर्चस्व, 2 नगरसेवकपदाचे उमेदवार विजयी
बीडमध्ये दादांना धक्का तर भाजपचं वर्चस्व, 2 नगरसेवकपदाचे उमेदवार विजयी.
संजय गायकवाड यांची पत्नी आघाडीवर, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडीवर
संजय गायकवाड यांची पत्नी आघाडीवर, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडीवर.
भाजपला मोठा धक्का, फुलंब्रीमध्ये उद्धव ठाकरे यांची सेना आघाडीवर
भाजपला मोठा धक्का, फुलंब्रीमध्ये उद्धव ठाकरे यांची सेना आघाडीवर.
साताऱ्यातील मतमोजणीत दोन्ही राजेंना धक्का तर 3 अपक्ष आघाडीवर
साताऱ्यातील मतमोजणीत दोन्ही राजेंना धक्का तर 3 अपक्ष आघाडीवर.
मतमोजणीत महायुती आघाडीवर, भाजप नंबर 1, 100 चा आकडा पार
मतमोजणीत महायुती आघाडीवर, भाजप नंबर 1, 100 चा आकडा पार.
बारामतीत अजित पवार vs शरद पवार संघर्ष, दोन्ही गटांची प्रतिष्ठा पणाला
बारामतीत अजित पवार vs शरद पवार संघर्ष, दोन्ही गटांची प्रतिष्ठा पणाला.
राजगुरुनगरमध्ये वळसे-पाटील अन् अमोल कोल्हेंची प्रतिष्ठा पणाला
राजगुरुनगरमध्ये वळसे-पाटील अन् अमोल कोल्हेंची प्रतिष्ठा पणाला.
कणकवलीत राणे बंधूंमध्ये चुरस, कोण मारणार बाजी? निकालाची प्रतीक्षा
कणकवलीत राणे बंधूंमध्ये चुरस, कोण मारणार बाजी? निकालाची प्रतीक्षा.
नादच खुळा...निकालाआधी कोल्हापुरात विजयाचे बॅनर, कागलमध्ये कुणाची चर्चा
नादच खुळा...निकालाआधी कोल्हापुरात विजयाचे बॅनर, कागलमध्ये कुणाची चर्चा.