AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shinde Government : कोकणात मंत्रिपदासाठी रस्सीखेच, सहा नावं चर्चेत

कोकणात मंत्रिपदासाठी चुरस

Shinde Government : कोकणात मंत्रिपदासाठी रस्सीखेच, सहा नावं चर्चेत
| Updated on: Jul 02, 2022 | 8:02 AM
Share

मुंबई : राज्यात मोठ्या सत्ता संघर्षानंतर शिंदे सरकार सत्तेत आलं आहे. अश्यात आता बंडखोरी करून शिंदेची सोबत केलेल्या नेत्यांना आपल्याला मंत्रिपद मिळेल, अशी आशा आहे. अश्यात आता कोकणात चुरस पाहायला मिळत आहे. सिंधुदुर्गातून नितेश राणे आणि बंडखोर गटातील दिपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्यात स्पर्धा आहे. तर रत्नागिरीत उदय सामंत (Uday Samant) आणि योगेश कदम या दोघांमध्ये मंत्रिपदासाठी चुरस पाहायला मिळत आहे. तर रायगडमधून भरत गोगावलेंना (Bharat Gogawale) मंत्रीपद निश्चित झाल्याचं मानलं जात आहे. शिवाय प्रशांत ठाकूर यांचं नावही चर्चेत आहे. कोकणातील उदय सामंत तसंच दादा भुसे हे मंत्री शिंदे यांच्या गटाकडे आहेत. भुसे हे नाशिकचे असले तरी त्यांच्याकडे पालघर जिल्ह्याचं पालकमंत्री पद त्यांच्याकडे होतं. त्यामुळे त्यांना ही संधी पुन्हा मिळणार का? याकडे लक्ष आहे.

कोकणात मंत्रिपदासाठी चुरस

कोकणात चुरस पाहायला मिळत आहे. सिंधुदुर्गातून नितेश राणे आणि बंडखोर गटातील दिपक केसरकर यांच्यात स्पर्धा आहे. तर रत्नागिरीत उदय सामंत आणि योगेश कदम या दोघांमध्ये मंत्रिपदासाठी चुरस पाहायला मिळत आहे. तर रायगडमधून भरत गोगावलेंना मंत्रीपद निश्चित झाल्याचं मानलं जात आहे. शिवाय प्रशांत ठाकूर यांचं नावही चर्चेत आहे.कोकणातील उदय सामंत तसंच दादा भुसे हे मंत्री शिंदे यांच्या गटाकडे आहेत. भुसे हे नाशिकचे असले तरी त्यांच्याकडे पालघर जिल्ह्याचं पालकमंत्री पद त्यांच्याकडे होतं. त्यामुळे त्यांना ही संधी पुन्हा मिळणार का? याकडे लक्ष आहे.

ठाण्याला शिंदेकडून आशा

ठाण्याला पहिल्यांदा एकनाथ शिंदेच्या रुपाने मुख्यमंत्रीपद मिळालं आहे. मात्र या जिल्ह्यातही बंडखोर गटाकडून प्रताप सरनाईक आणि डॉ. बालाजी किणीकर यांच्या मंत्रिपदासाठी स्पर्धा आहे. तर भाजपकडून आमदार संजय केळकर मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत.संजय केळकर, किसन कथोरे आणि रवींद्र चव्हाण या तीन नेत्यांमध्ये स्पर्धा पाहायला मिळत आहे.

औरंगाबादमध्ये स्पर्धा

औरंगाबादेत भाजप नेते आणि आमदार हरिभाऊ बागडे, अतुल सावे आणि प्रशांत बंब हे देखील मंत्रिपदाच्या रेसमध्ये आहेत. त्यामुळे एकट्या शिंदे गटाला औरंगाबादेतून तीन किंवा चार मंत्रिपदं मिळण्याची शक्यता कमीच आहे. असं असलं तरी संजय सिरसाट मात्र मंत्रिपदासाठी आग्रही आहेत. मात्र, शिंदे गटातील नेत्यांकडून त्यांची समजूत काढली जात असल्याची माहिती मिळतेय.

मंत्रिपदाचा फॉर्म्युला काय असणार?

नव्या सरकारमध्ये मंत्रिपदे वाटपाचा फॉर्म्युलाही तयार करण्यात आला आहे. प्रत्येक सहा आमदारांमागे एक कॅबिनेट आणि राज्यमंत्रिपद देण्यात येणार आहे. मात्र, त्यात ऐनवेळी बदलही होऊ शकतो असंही सांगितलं जात आहे.

अपक्षांना अधिकाधिक संधी

शिंदे गटासोबत तब्बल 11 अपक्ष आहेत. त्यात बच्चू कडू यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात येणार आहे. तसेच इतर एक दोन अपक्षांना मंत्रिपद देऊन बाकीच्यांना महामंडळ देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.