AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकरी आंदोलन : इंटरनेट बंदीचा मुद्दा गेला सर्वोच्च न्यायालयात

शेतकरी आंदोलन : इंटरनेट बंदीचा मुद्दा गेला सर्वोच्च न्यायालयात(Farmer Protest : Internet ban issue)

शेतकरी आंदोलन : इंटरनेट बंदीचा मुद्दा गेला सर्वोच्च न्यायालयात
शेतकरी आंदोलन : इंटरनेट बंदीचा मुद्दा गेला सर्वोच्च न्यायालयात
| Updated on: Feb 06, 2021 | 8:27 PM
Share

नवी दिल्ली : देशातील शेतकरी दिल्लीच्या वेशीवर कृषी कायद्यांच्या निषेधार्थ आंदोलन करीत आहेत. या ठिकाणी केलेली इंटरनेट बंदी कायद्याच्या कचाट्यात अडकणार आहे. इंटरनेटवरील निर्बंध हटवण्याची मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे. वकिल संप्रीत सिंह अजमानी आणि पुष्पिंदर सिंह यांनी ही याचिका दाखल केली आहे.(Farmer Protest : Internet ban issue)

शेतकऱ्याच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी करा

प्रजासत्ताक दिनी दिल्लीत काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर रॅलीतील एका आंदोलक शेतकऱ्याचा हकनाक बळी गेला. त्या व्यक्तीच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. संबंधित आंदोलकाचा गोळी लागूनच मृत्यू झाला, असा आरोपही याचिकेतून केला आहे.

मूलभूत अधिकारांवर गदा आणल्याचा आरोप

आंदोलनाच्या ठिकाणचे इंटरनेट बंद करणे म्हणजे आंदोलकांच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणण्याचा प्रकार आहे, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने याआधीच्या प्रकरणात इंटरनेट हा नागरिकांचा मूलभूत अधिकार असल्याचे म्हटले होते. त्यामुळे शेतकरी आंदोलन ठिकाणचे इंटरनेट बंद करून सरकारने आंदोलकांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन केले आहे. तसेच शेतकरी आणि सच्चा पत्रकारांना देशासमोर आंदोलनाची खरी वस्तुस्थिती आणण्यापासून रोखले आहे. शेतकऱ्यांनी कृषी कायद्यांना विरोध केला म्हणूनच इंटरनेटवर निर्बंध आणण्यात आले आहेत. केवळ सरकारचीच भूमिका समोर आणली जात आहे. हा मूलभूत अधिकारांवरील सरळसरळ हल्लाच आहे, असे याचिकेत म्हटले आहे.(Farmer Protest : Internet ban issue)

इतर बातम्या

सुप्रीम कोर्टचे न्यायमूर्ती म्हणाले, मोदी सर्वाधिक लोकप्रिय नेते

भाजपला झटक्यावर झटके! अजून एका नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.