AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : खायला मटण-मासे, पत्ते खेळायला पैसे, निवडणूक कशी लढवली, शिवसेना आमदाराने खरं खरं सांगितलं!

पूर्वी राजकारणात निष्ठा, तत्व, शब्दांना मान होता. परंतु अलीकडच्या काळात निष्ठा-तत्वांची जागा पैशाने घेतलीय. अशा प्रकारची उदाहरणे वारंवार समोरही येतात. अशी उदाहरणं लोकांमध्ये चर्चेत असतात. पण राजकारणासाठी पैशांचं वाढलेलं महत्त्व, तडजोडींना दिलेला छेद खुद्द अशा गोष्टी जेव्हा लोकप्रतिनिधीच बोलून दाखवतात, तेव्हा त्याचं महत्त्व अधिक तीव्रतेने लक्षात येतं.

Video : खायला मटण-मासे, पत्ते खेळायला पैसे, निवडणूक कशी लढवली, शिवसेना आमदाराने खरं खरं सांगितलं!
शिवसेना आमदार शहाजी बापू पाटील
Follow us
| Updated on: Oct 18, 2021 | 1:37 PM

सांगोला : पूर्वी राजकारणात निष्ठा, तत्व, शब्दांना मान होता. परंतु अलीकडच्या काळात निष्ठा-तत्वांची जागा पैशाने घेतलीय. अशा प्रकारची उदाहरणे वारंवार समोरही येतात. अशी उदाहरणं लोकांमध्ये चर्चेत असतात. पण राजकारणासाठी पैशांचं वाढलेलं महत्त्व, तडजोडींना दिलेला छेद खुद्द अशा गोष्टी जेव्हा लोकप्रतिनिधीच बोलून दाखवतात, तेव्हा त्याचं महत्त्व अधिक तीव्रतेने लक्षात येतं. एवढं सगळं सांगायचं कारण म्हणजे सांगोल्याचे शिवसेना आमदार शहाजी बापू पाटील यांनी साखर कारखान्याच्या निवडणुकीत निवडणूक जिंकण्यासाठी मतदारांना कसं आमिष दाखवलं, निवडणूक जिंकण्यासाठी काय काय क्लुप्त्या केल्या, याचा पाढाच वाचून दाखवला.

सांगोला सहकारी कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमाला शिवसेना आमदार शहाजी बापू पाटील आणि तालुक्यातील विविध मान्यवर मंडळी उपस्थित होते. यावेळी केलेल्या भाषणात शहाजी बापू पाटील यांनी निवडून येण्यासाठी सत्ता, पैसा आणि इतरही कश्या प्रकारची आमिषं दिली जातात, याची उघड उघड कबुलीच दिली.

खायला मटण-मासे, पत्ते खेळायला पैसे

शहाजी बापू पाटील म्हणाले, “सांगोला साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून माजी आमदार(कै.) गणपतराव देशमुख यांच्याकडे माझे काही संचालक घ्या असा प्रस्ताव ठेवला होता. त्यावेळी गणपतराव देशमुख यांनी वेळ निघून गेल्याचे सांगितले. त्यानंतर दिल्ली, हरियाणा, लुधियाना येथून विमानाने सभासदांना आणले. एवढंच नाही तर सभासदांना तीन तीन हजार रुपये वाटप केले. निवडणुकी दरम्यान 1700 सभासदांना कोल्हापूरात ठेवले. त्या ठिकाणी त्यांच्या खाण्यापिण्याची व पत्ते खेळण्यासाठी लागणारे पैसेही दिले”

सांगोला सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत मतदारांना तीन -तीन हजार रुपये रोख वाटले, शिवाय त्यांना मटण आणि माशांची पार्टीही दिली. त्या काळात 57 लाख रुपये वाटून कारखान्याची निवडणूक लढवली, असा मोठा गौप्यस्फोट आमदार पाटील यांनी केला.

कारखान्याच्या दुरावस्थेला मी देखील जबाबदार

कारखान्याच्या निवडणुकीत सभासदांना पैसे वाटून आणि त्यांना मटन खायला घालून कारखान्याच्या निवडणुकीत गणपतराव देशमुख गटाला कसा हिस्सका दाखवला हे सांगताना त्यांनी कारखान्याच्या निवडणुकीत आपण कसा प्रताप केला हे देखील सांगून टाकले. कारखान्याच्या दुरावस्थेला माझ्या सह सर्वच नेते जबाबदार आहेत. मी देखील तितकाच पापी असल्याची कबुली दिली.

आमदार पाटलांच्या कबुलीने राज्यातील कारखान्यांत चालणाऱ्या गैर कारभाराचे सत्य समोर

आमदार पाटील यांनी कारखाना उभारणीमध्ये कोणी कोणी कसा गैर कारभार केला याची उदाहणे देत, कारखान्याच्या दुरावस्थेला आम्ही जबाबदार असल्याचेही मान्य केले. आमदार पाटलांच्या गौप्यस्फोटानंतर राज्यातील सहकारी साखर कारखान्यात चालणाऱ्या गैर कारभाराचे सत्य समोर आले आहे.

(How Bribes to voters to win elections Reveal Shivsena MLA Shahaji bapu Patil)

हे ही वाचा :

शेतकऱ्यांना टोपी घालण्यात मोदी पवार सारखेच, राजू शेट्टींनी बाह्या सरसावल्या

निवडणुकीसाठी मनसेचा ‘डिजिटल राजमार्ग’, राज ठाकरेंच्या विचारांना follow करण्याचं आवाहन

जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव.
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.