AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी गँगस्टर होतो तर मुख्यमंत्री का केलं, राणेंच्या खड्या सवालाला शिवसेनेचा पहिला जवाब!

Sanjay Raut | बाळासाहेबांचे तुम्ही काय होतात आणि आम्ही काय होतो, हे सगळं विसरून बाळासाहेब शिवसेना पुढे घेऊन गेले. आमच्यासारख्या सामान्य आणि रस्त्यावरच्या कार्यकर्त्याला बाळासाहेबांनी सर्वोच्च पदावर पोहोचवले. याची जाण सगळ्यांनी ठेवायला पाहिजे, असेही संजय राऊत यांनी म्हटले.

मी गँगस्टर होतो तर मुख्यमंत्री का केलं, राणेंच्या खड्या सवालाला शिवसेनेचा पहिला जवाब!
दिल्लीत आपली महाराष्ट्रापेक्षा जास्त वट, राणेंचं वक्तव्य
Follow us
| Updated on: Aug 26, 2021 | 12:33 PM

मुंबई: बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या काळात गंगेचा प्रवाह निर्माण केला होता. त्यामध्ये नारायण राणे यांच्यासारख्या अनेकांना शुद्ध करून घेण्यात आलं. त्यामुळे शिवसेनेने नारायण राणे यांना त्याकाळी मुख्यमंत्री केल्याचे संजय राऊत (Sanjay Raut) यांनी स्पष्ट केले. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तील अग्रलेखातून नारायण राणे यांच्यावर नुकतीच टीका करण्यात आली होती. राणे एखाद्या छपरी गँगस्टारसारखेच वागत-बोलत असल्याचा उल्लेख या अग्रलेखात होता. हाच धागा पकडत नारायण राणे यांनी, ‘मी जर गँगस्टर होतो, तर शिवसेनेनं मला मुख्यमंत्री का केलं?’, असा रोकडा सवाल शिवसेनेला विचारला होता.

या प्रश्नाला संजय राऊत यांनी गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना तितकेच चोख प्रत्युत्तर दिले. त्याकाळी बाळासाहेब ठाकरे यांनी गंगेचा प्रवाह निर्माण केला होता. त्यामध्ये नारायण राणे आणि आमच्यासह सगळ्यांना शुद्ध करुन घेतलं होतं, असे संजय राऊत यांनी म्हटले. नारायण राणे यांनी शिवसेनेचे उपकार मानले पाहिजेत. बाळासाहेबांचे तुम्ही काय होतात आणि आम्ही काय होतो, हे सगळं विसरून बाळासाहेब शिवसेना पुढे घेऊन गेले. आमच्यासारख्या सामान्य आणि रस्त्यावरच्या कार्यकर्त्याला बाळासाहेबांनी सर्वोच्च पदावर पोहोचवले. याची जाण सगळ्यांनी ठेवायला पाहिजे, असेही संजय राऊत यांनी म्हटले.

‘केंद्रीय मंत्री म्हणून काम करा, इकडे येऊन बेताल बडबड करू नका’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रिपद दिले आहे. केंद्रीय सूक्ष्म, मध्यम आणि लघूद्योग खात्यासाठी नारायण राणे यांनी चांगले काम करुन देश पुढे न्यायला हवा. पण ते महाराष्ट्रात येऊन केवळ बेताल बडबड करणार असतील तर शिवसेनेकडून त्याला प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा संजय राऊत यांनी दिला. महाराष्ट्राच्या राजकारणात विधायक टीकेची परंपरा आहे. तशी टीका झाल्यास शिवसेना त्याचे स्वागत करेल, असेही राऊत यांनी सांगितले.

संबंधित बातम्या:

राणेंनी स्वतःला महान समजणं बंद केलं तरी त्यांच्या आयुष्यातील समस्या औषधांशिवाय बऱ्या होतील, सामनातून राणेंवर पुन्हा हल्लाबोल

नारायण राणे फार दिवस मंत्रिमंडळात राहणार नाही, सामनाच्या अग्रलेखातले 5 स्फोटक मुद्दे

राणेंवरील कारवाईनंतर नाशिक भाजप आक्रमक, मुख्यमंत्री आणि संजय राऊतांविरोधात 3 तक्रार अर्ज

(Shivsena MP Sanjay Raut take a dig at BJP Union Minister Narayan Rane)

पाकिस्तानला भारताचा आणखी एक दणका!
पाकिस्तानला भारताचा आणखी एक दणका!.
5 तारखेला लग्न झालं अन् फोन आला, हळदीच्या अंगाने जवान सीमेवर परतला
5 तारखेला लग्न झालं अन् फोन आला, हळदीच्या अंगाने जवान सीमेवर परतला.
टेररीस्ट अ‍ॅक्टिव्हिटीसाठी धार्मिक स्थळांचा आसरा - विक्रम मिस्री
टेररीस्ट अ‍ॅक्टिव्हिटीसाठी धार्मिक स्थळांचा आसरा - विक्रम मिस्री.
दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट,विक्रम मिस्रींनी स्पष्टच सांगितलं
दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट,विक्रम मिस्रींनी स्पष्टच सांगितलं.
ड्रोन, मिसाईलला हवेतच निकामी केलं - कर्नल सोफिया कुरेशी
ड्रोन, मिसाईलला हवेतच निकामी केलं - कर्नल सोफिया कुरेशी.
एअर स्ट्राईकनंतर आता वॉटर स्ट्राईक! बगलिहार, सलाल धरणाचे दरवाजे उघडले
एअर स्ट्राईकनंतर आता वॉटर स्ट्राईक! बगलिहार, सलाल धरणाचे दरवाजे उघडले.
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?.
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय.
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर.
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?.