AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Imtiaz Jaleel : ‘काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी औरंगाबादेत येऊन दाखवावं’, नामांतरावरुन खासदार इम्तियाज जलील यांचा थेट इशारा

औरंगाबाद आणि उस्मानाबादचं (Osmanabad) नामांतर करण्याचा निर्णय आज घेण्यात आलाय. या निर्णयावरुन एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी सरकारवर जोरदार टीका केलीय. तसंच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना जलील यांनी थेट इशारा दिलाय.

Imtiaz Jaleel : 'काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी औरंगाबादेत येऊन दाखवावं', नामांतरावरुन खासदार इम्तियाज जलील यांचा थेट इशारा
इम्तियाज जलील, खासदार, एमआयएमImage Credit source: TV9
| Updated on: Jun 29, 2022 | 8:11 PM
Share

औरंगाबाद : महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) अखेरच्या घटना मोजत आहे. अशावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आलेत. औरंगाबादचं (Aurangabad) नाव संभाजीनगर आणि उस्मानाबादचं नाव धाराशीव करण्याची मागणी शिवसेनेकडून गेल्या अनेक वर्षांपासून सुरु होती. मात्र, अद्याप त्यावर निर्णय होऊ शकला नाही. महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळातही त्यावर निर्णय होऊ शकला नाही. मात्र, आता महाविकास आघाडी सरकार पायउतार होण्याच्या मार्गावर आहे. अशावेळी औरंगाबाद आणि उस्मानाबादचं (Osmanabad) नामांतर करण्याचा निर्णय आज घेण्यात आलाय. या निर्णयावरुन एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी सरकारवर जोरदार टीका केलीय. तसंच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना जलील यांनी थेट इशारा दिलाय.

इम्तियाज जलील यांचा काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांना इशारा

काँग्रेसचे कुणीही लोक दिसले तर त्यांच्या फोटोंवर जोड्यांची माळ घाला. काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी औरंगाबादेत येऊन दाखवावं, पाहा आम्ही तुमचं कसं स्वागत करतो, असा इशाराच जलील यांनी दिलाय. तसंच हा निर्णय घेण्यापूर्वी काँग्रेसच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांच्या तोंडावर राजीनामे फेकायला पाहिजे होते. चंद्रकांत खैरे यांनी आता फक्त नाचत राहिलं पाहिजे. कारण त्यांच्यासाठी आता फक्त तेवढंच काम शिल्लक राहिलं असल्याचा टोलाही त्यांनी लगावलाय. दरम्यान, नागरिकांनी शांतता राखण्याचं आवाहनही जलील यांनी केलंय.

औरंगाबाद आणि उस्मानाबादचं नामांतर

शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी कालच शिवसेनेकडून तीन महत्वाचे प्रस्ताव उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत मांडण्यात येणार असल्याचं जाहीर केलं होतं. औरंगाबादचं नाव संभाजीनगर आणि उस्मानाबादचं नाव धाराशिव करा अशी शिवसेनेची मागणी आहे. मात्र, मागील अडीच वर्षापासून सत्तेत असूनही शिवसेनेकडून याबाबत कुठलीही हालचाल झाली नव्हती. मात्र, आता शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे शिवसेनेनं हे महत्वाचे प्रस्ताव सादर केले. तसंच नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटलांचं नाव देण्याचाही एक प्रस्ताव शिवसेनेकडून मांडला गेला. औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराला काँग्रेस जोरदार विरोध करण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, मंत्रिमंडळाच्या बैठकीत काँग्रेसच्या मंत्र्यांनी नामांतराच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्याचं पाहायला मिळालं.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.