AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वंचितमध्ये संघाचे लोक घुसलेत का? इम्तियाज जलील यांचा सवाल

प्रकाश आंबेडकरांचे उपकार कधीही विसरणार नाही, पण मुस्लीम चेहरा म्हणून प्रमोट करायचं आणि नंतर अस्तित्व नाकारायचं हे चालणार नाही. आम्हाला 40 ते 50 जागा दिल्यास आम्ही सोबत जाऊ, असंही जलील (Imtiyaz Jaleel VBA) म्हणाले.

वंचितमध्ये संघाचे लोक घुसलेत का? इम्तियाज जलील यांचा सवाल
| Edited By: | Updated on: Sep 09, 2019 | 11:26 PM
Share

औरंगाबाद : एमआयएमने वंचित बहुजन आघाडीला कधीही 50 जागा मागितल्या नव्हत्या, आमची 76 जागांची मागणी होती. पण वंचितमध्ये काही संघाचे लोक घुसले का, की ज्यांनी आम्हाला एवढ्या जागा देऊ नये असं सांगितलं, असा सवाल एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel VBA) यांनी उपस्थित केलाय. प्रकाश आंबेडकरांचे उपकार कधीही विसरणार नाही, पण मुस्लीम चेहरा म्हणून प्रमोट करायचं आणि नंतर अस्तित्व नाकारायचं हे चालणार नाही. आम्हाला 40 ते 50 जागा दिल्यास आम्ही सोबत जाऊ, असंही जलील (Imtiyaz Jaleel VBA) म्हणाले.

वंचित बहुजन आघाडी शिवसेना, भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्याविरोधात उभी केली होती. त्यांना काँग्रेससोबतच जायचं असेल तर ते अगोदर सांगायला हवं होतं, असंही इम्तियाज जलील म्हणाले. आमच्याकडे व्होट बँक नाही असं प्रकाश आंबेडकरांना वाटत असेल, पण निवडणुकीत त्यांना दिसेलच, असा इशाराही त्यांनी दिलाय.

“मला खलनायक ठरवण्याचा प्रयत्न होतोय”

वंचितसोबत युती तोडण्याचा निर्णय हा इम्तियाज जलील यांचा असल्याचाही आरोप होतोय. यावरुन मला खलनायक ठरवण्याचा प्रयत्न होत असल्याचं इम्तियाज जलील म्हणाले. अजूनही निर्णय व्हावा, अन्यथा उमेदवार मिळेल तिथे लढण्याची आमची तयारी आहे. पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी हे माझ्यासाठी गॉडफादर आहेत. त्यांनी सांगितलं तर प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देईल आणि खासदारकीही सोडेल. त्यांचा मी आदर करतो. युती तोडण्याच्या अगोदर ओवेसी साहेबांना कळवलं होतं. मात्र आम्ही कोणत्याही परिस्थितीत आठ जागा मान्य करणार नाही. उत्तर मिळत नसल्याने आम्ही मुलाखती घेऊन उमेदवार जाहीर करु, अशी माहिती जलील यांनी दिली.

“मंगळवार सायंकाळपर्यंत काही उमेदवार जाहीर होणार”

एमआयएम मंगळवारपासून मुलाखती सुरु करणार आहे. मालेगाव, पुणे, नांदेडसह इतर जागांसाठी मुलाखती होतील. मंगळवारी सायंकाळपर्यंत काही उमेदवार जाहीर करु, असंही इम्तियाज जलील म्हणाले.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.