AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘जनता महाविकासआघाडीच्या कामावर समाधानी, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावणं अशक्य’

नारायण राणे यांनी आधी सरकार टिकणार नाही, फाटाफूट होऊन भाजपची सत्ता येईल, असे म्हटले. | Nawab Malik

'जनता महाविकासआघाडीच्या कामावर समाधानी, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावणं अशक्य'
नवाब मलिक
| Updated on: Mar 07, 2021 | 12:02 PM
Share

मुंबई: राज्यातील जनता महाविकासआघाडी सरकारच्या कामावर समाधानी आहे. त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करणे अशक्य आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसे नेते (NCP) आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केले. नारायण राणे यांनी आधी सरकार टिकणार नाही, फाटाफूट होऊन भाजपची सत्ता येईल, असे म्हटले. जवळपास 15 महिने झाल्यानंतर त्यांनी हा बाजा वाजवणं बंद केले. आता ते पुन्हा महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणार आहेत. कारण, भाजपकडे दुसरा पर्याय नाही पण हे अशक्य आहे. कोणत्याही राज्यात अशीच कुणालाही राष्ट्रपती राजवट लागू करता येत नाही, असे नवाब मलिक यांनी म्हटले. (NCP leader Nawab Malik salms BJP leader Narayan Rane)

नवाब मलिकांचा काँग्रेसला टोला

मोहन डेलकर आत्महत्याप्रकरणात मुख्यमंत्र्यांनी पत्रकारपरिषद घेतली. डेलकर यांनी लिहलेल्या सुसाईड नोटमध्ये बऱ्याच लोकांची नावं आहेत. पोलीस त्यांचा तपास करत आहेत. यामध्ये भाजप नेत्यांचाही समावेश आहे. याप्रकरणातील सत्य लवकरच समोर येईल. मात्र, हा तपास रोखण्यासाठी दबाव आणू नका. यंत्रणांना त्यांचं काम करुन दिलं पाहिजे, असा टोला नवाब मलिक यांनी काँग्रेसला लगावला. तसेच मनसुख हिरेन प्रकरणातही सत्य लवकरच समोर येईल. तोपर्यंत कोण काय बोलतंय, यावर विश्वास ठेवू नका, असेही नबाव मलिक यांनी म्हटले.

नारायण राणे राष्ट्रपती राजवटीची मागणी करणार?

नारायण राणे यांनी शनिवारी मुंबईत घेतलेल्या पत्रकारपरिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकासआघाडीवर टीकास्त्र सोडले होते. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था शिल्लक नाही. कुणाचे मुडदे कुठेही पडू शकतात अशी स्थिती आहे. त्यामुळे नारायण राणे लवकर केंद्रातील नेत्यांची भेट घेऊन महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची मागणी करणार असल्याची चर्चा आहे.

संबंधित बातम्या:

शरद पवारांचा कुटुंबियांसोबत डिनर टाईम; फोटो व्हायरल!

‘अब तो एक ढुंढो हजार मिलते है’; राणेंचा उद्धव ठाकरे- आदित्य यांच्यावर नाव न घेता ‘प्रहार’

‘हे शिवसैनिकांचे नाही तर फक्त ‘मातोश्री’चे राज्य’, नारायण राणेंचं मुख्यमंत्र्यांवर शरसंधान

(NCP leader Nawab Malik salms BJP leader Narayan Rane)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.