AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुरेश धस पंकजा मुंडेंच्या व्यासपीठावर, मुलाचा अपक्ष अर्ज दाखल

सुरेश धस यांची ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या रॅलीलाही उपस्थिती होती, तर त्यांच्या मुलाने अपक्ष अर्ज दाखल केलाय. त्यामुळे पंकजा मुंडे याबाबतीत काय निर्णय घेतात ते महत्त्वाचं ठरणार आहे.

सुरेश धस पंकजा मुंडेंच्या व्यासपीठावर, मुलाचा अपक्ष अर्ज दाखल
| Edited By: | Updated on: Oct 03, 2019 | 6:05 PM
Share

बीड : भाजपचे आमदार सुरेश धस यांचे चिरंजीव जयदत्त धस (Jaydutt Dhas) यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. जयदत्त (Jaydutt Dhas) यांनी अर्ज दाखल केलेल्या आष्टी-पाटोदा-शिरुर मतदारसंघासाठी भाजपने भिमराव धोंडे यांना उमेदवारी दिली आहे. पण जयदत्त यांच्या अर्जामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. दुसरीकडे सुरेश धस यांची ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या रॅलीलाही उपस्थिती होती, तर त्यांच्या मुलाने अपक्ष अर्ज दाखल केलाय. त्यामुळे पंकजा मुंडे याबाबतीत काय निर्णय घेतात ते महत्त्वाचं ठरणार आहे.

सुरेश धस यांचे चिरंजीव गेल्या काही वर्षांपासून मतदारसंघात गाठीभेटी घेत आहेत. पक्षाने अधिकृत उमेदवारी द्यावी, अशी त्यांची इच्छा होती. पण पुन्हा एकदा भिमराव धोंडे यांनाच उमेदवारी देण्यात आली आहे. मतदारसंघात धोंडे यांना विरोध असल्याने दुसरा उमेदवार द्यावा, असं धस गटाचं म्हणणं आहे. पण पक्षाने पुन्हा एकदा धोंडे यांच्याच नावावर शिक्कामोर्तब केलं.

सुरेश धस हे राष्ट्रवादीत असताना आष्टी-पाटोदा-शिरुर मतदारसंघाचे आमदार होते. पण 2014 ला भिमराव धोंडे यांनी त्यांचा पराभव केला. धस सध्या विधानपरिषदेवर आहेत. त्यामुळे त्यांच्या मुलाने विधानसभेची तयारी सुरु केली होती. अर्ज दाखल करण्याची 4 ऑक्टोबर ही अखेरची तारीख आहे. जयदत्त यांनी अर्ज मागे न घेतल्यास इथे भाजपच्या अधिकृत उमेदवाराची डोकेदुखी वाढणार हे निश्चित आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.