AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune : राष्ट्रपतींच्या शपथ सोहळ्यात शाकाहारीच भोजन ठेवा; पुण्यातून ई-मेलद्वारे आग्रह

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा शपथविधी म्हणजे देशभरातील राजकीय नेते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती या सोहळ्याला राहणार आहे. तर विशेष पाहुणे म्हणून जगभरातून मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या दरम्यान होणाऱ्या स्नेहभोजनात जर शुद्ध शाकाहारी पदार्थाची मेजावानी राहिली तर शाकाहारीचे महत्व सर्वांच्याच लक्षात येणार आहे.

Pune : राष्ट्रपतींच्या शपथ सोहळ्यात शाकाहारीच भोजन ठेवा; पुण्यातून ई-मेलद्वारे आग्रह
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jul 22, 2022 | 3:41 PM
Share

पुणे : पुणे तिथे काय उणे…ही म्हणीला अगदी तंतोतंत कृत्यही पुणेकरांनी केलेले आहेत. त्यामुळे याला विशेष महत्वही आहे. इतरांपेक्षा काहीतरी वेगळे हे पुणेकरांचे वैशिष्ट राहिलेले आहे. आता (The President ) राष्ट्रपतींच्या शपथविधीवरुन पुणे चर्चेत आले आहे. भारताच्या नव्या राष्ट्रपती म्हणून (Draupadi Murmu) द्रौपदी मुर्मू यांची निवड झाली आहे. त्यामुळे 25 जुलै रोजी (Swearing-in ceremony) शपथग्रहण सोहळा पार पडत आहे. नवनियुक्त नियुक्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ह्या अध्यात्मिक आहेत तर त्या शुध्द शाकाहारी देखील असून या सोहळ्यात स्नेहभोजन हे शुद्ध शाकाहारी असावे अशी मागणीच शाकाहाराचे पुरस्कर्ते डॉ. कल्याण गंगवाल यांनी केली. त्यामुळे या अनोख्या मागणीची खमंग चर्चा आता रंगू लागली आहे. यासंदर्भात गंगवाल यांनी संबंधित विभागांना मेलही केले आहेत.

शाकाहाराचे महत्व जगाला कळेल

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा शपथविधी म्हणजे देशभरातील राजकीय नेते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती या सोहळ्याला राहणार आहे. तर विशेष पाहुणे म्हणून जगभरातून मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या दरम्यान होणाऱ्या स्नेहभोजनात जर शुद्ध शाकाहारी पदार्थाची मेजावानी राहिली तर शाकाहारीचे महत्व सर्वांच्याच लक्षात येणार आहे. भारतीय शाकाहाराची जगभर माहिती होण्यासाठी या कार्यक्रमाचे निमित्त राहणार आहेत. शिवाय भारतीय खाद्य संस्कृतीचेही दर्शन घडेल असा विश्वास शाकाहाराचे पुरस्कर्ते डॉ. कल्याण गंगवाल यांना आहे. त्यामुळे त्यांनी पत्रव्यवहार तर केला आहे. त्यावर काय निर्णय होणार हे पहावे लागणार आहे.

नेमका आग्रह कशामुळे?

भारताच्या नव्या राष्ट्रपती म्हणून काल द्रौपदी मुर्मू यांची निवड झाली आहे. आदिवासी समाजातील महिलेची निवड ही सर्वोच्चपदी झाली आहे. द्रौपदी मुर्मू या अध्यात्मिक आहेत. शिवाय त्या मंसाहार करीत नसून शुद्ध शाकाहारी आहेत. त्यामुळे त्यांच्या शपथविधी सोहळ्यात केवळ शाकाहारीच असेच जेवण ठेवावे अशी मागणी डॉ. कल्याण गंगवाल यांनी मेलद्वारे राष्ट्रपती भवन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे. त्यांच्या मागणीवर काय निर्णय होणार हे आता पहावे लागणार आहे.

25 जुलै रोजी शपथग्रहन सोहळा

राष्ट्रपतीपदी आदिवासी समाजातील द्रौपदी मुर्मू यांची वर्णी लागली आहे. गुरुवारी निवडीचा निकाल लागला असून आता 25 जुलै रोजी शपथग्रहन सोहळा होत आहे. त्याअनुशंगाने परदेशातील पाहुणे आणि देशभरातून राजकीय नेते हे उपस्थित राहणार आहेत. या दरम्यान, सर्व उपस्थितांसाठी शाकाहारच जेवण करण्याची मागणी डॉ. कल्याण गंगवाल यांनी केली तर ते एक शाकाहाराचे पुरस्कर्ते आहेत.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.