Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हा मोर्चा म्हणजे चेतावणी आहे, हा मोर्चा म्हणजे आव्हान आहे, तुम्हाला झोपू देणार नाही

हर घर जल ही योजना केंद्राची असून पस्तीस हजार कोटींची आहे. मात्र आपलं सरकार काहीच करत नाही. यातले पाचशे कोटींही या सरकारने खर्च केले नाहीत. त्यामुळे हा आजचा मोर्चा म्हणजे चेतावणी आहे, एक आव्हान आहे.

हा मोर्चा म्हणजे चेतावणी आहे, हा मोर्चा म्हणजे आव्हान आहे, तुम्हाला झोपू देणार नाही
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीसImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 15, 2022 | 3:41 PM

जालना : औरंगाबाद पाणी प्रश्नावरून राज्यातील महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi government) घेरल्यानंतर ही फक्त सुरूवात आहे. राज्यातील पाणी प्रशानावरून तुम्हाला झोपू देणार नाही असे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Leader of Opposition Devendra Fadnavis) यांनी म्हटलं होतं. त्याचीच प्रचिती आज जालन्यात आली. आज बुधवारी जालन्याचा पाणी प्रश्नावरून (Jalna water issue) भाजपकडूण विराट मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी औरंगाबादप्रमाणेच येथेही जालनेकरांच्या जलाक्रोश पाहायला मिळाला. यावेळी फडणवीस यांनी हा मोर्चा म्हणजे चेतावणी आहे, हा मोर्चा म्हणजे आव्हान आहे, तुम्हाला झोपू देणार नाही असं म्हटलं आहे. त्यामुळे राज्यात मोर्चांची मालिका सुरू होईल की काय असा प्रश्न आता अनेकांना पडत आहे.

तसेच फडणवीस यांनी म्हटलं आहे की, सरकारने जाणीवपूर्वक कोट्यवधींच्या योजना या थांबवल्या. जसे औरंगाबादच्या पाण्याचा प्रश्न आहे तो तसाच येथेही आहे. येथेही 15 दिवसांनी पाणी येतं. त्यामुळे जालन्याच्या जनतेते आक्रोश भरला आहे. ते आता आक्रमक झाले आहेत. तर जालन्याच्या उशाला घरण असूनही येथे 15 दिवसांनी पाणी येतं. ही कसली शोकांतीका? म्हणत फडणवीस यांनी टीका केली. तसेच पंतप्रधान मोदींनी गरिब कल्याणाचा मंत्र दिला. मात्र हे सरकार पैसा खर्च करत नाही. हर घर जल ही योजना केंद्राची असून पस्तीस हजार कोटींची आहे. मात्र आपलं सरकार काहीच करत नाही. यातले पाचशे कोटींही या सरकारने खर्च केले नाहीत. त्यामुळे हा आजचा मोर्चा म्हणजे चेतावणी आहे, एक आव्हान आहे. कामं करा… पाणी द्या. अन्यथा आम्ही तुम्हाला झोपू देणार नाही, आम्ही तुम्हाला कारभार करून देणार नाही.

हे सुद्धा वाचा

तसेच फडणवीस यांनी सरकारवर टीका केल्यानंतर जोपर्यंत तुम्ही सामान्य माणसाला न्याय देत नाही तोपर्यंत गप्प बसणार नसल्याचेही म्हटलं आहे. तर जोपर्यंत शुद्ध पाणी नळाला येत नाही तोपर्यंत आम्ही संघर्ष करत राहू असेही फडणवीस म्हणाले. तसेच आपल्या काळात प्रत्येक वेळी पैसा दिला, योजना दिल्या, जे मागितलं ते दिलं. मात्र आताचे सरकार हे झोपा काढत आहे. गेल्या अडीच वर्षात मुख्यमंत्री येते आले नाहीत. तर त्यांनी पैसाही दिला नाही. त्यामुळेच भर उन्हा या मता भगिनी रस्त्यावर उतरल्या आहेत. मता भगिनींनी मुख्यमंत्र्यांकडे पाणी मागितलं मात्र ते इश्वराने दिलं. हे सरकार इश्वर भरोसे चाललं असल्याचा टोलाही फडणवीस यांनी लगावला.

महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग..
महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग...
गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी ट्विट केला व्हिडिओ
गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी ट्विट केला व्हिडिओ.
कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट
कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट.
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते.
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट.
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी.
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे.
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले.
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली.
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण.