Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्राच्या राजकारणात वादळ घोंघावतंय, पुन्हा भूकंप की सरकारमध्ये स्थिरता? जस्टिस शाह यांच्या रिटायर्मेंटआधी….

महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात वादळ घोंघावणार की सरकार स्थिर होणार? याबाबतची स्पष्टता आता लवकरच जाहीर होणार आहे. जस्टिस शाह यांच्या निवृत्तीआधी हे सगळं चित्र समोर येण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात वादळ घोंघावतंय, पुन्हा भूकंप की सरकारमध्ये स्थिरता? जस्टिस शाह यांच्या रिटायर्मेंटआधी....
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 16, 2023 | 5:27 PM

मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी (Maharashtra Political Crisis) आता संपलेली आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटांचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. आता कुणीही युक्तिवाद करणार नाही. महाराष्ट्राने गेल्या दहा महिन्यांमध्ये बरेच राजकीय भूकंप पाहिले. सत्तांतर पाहिलं आणि भांडणंही पाहिली. महाराष्ट्रातील सरकार आजही पूर्णपणे स्थिर आहे, असं म्हणता येणार नाही. सुप्रीम कोर्टाचा निकाल जर ठाकरे गटाच्या बाजूने लागला तर महाराष्ट्रात कदाचित मध्यावधी निवडणुका जाहीर होऊ शकतात, अशी परिस्थिती आहे. याच पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्र आणि देशाचं या सुनावणीकडे लक्ष लागलेलं आहे. गेल्या नऊ महिन्यांपासून या प्रकरणाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. अखेर नऊ महिन्यांनी ही सुनावणी संपली आहे. आणि आता लवकरच निकाल जाहीर होणार आहे.

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीचा निकाल आज जाहीर झाला नाही. सुप्रीम कोर्टात आज सुनावणी संपली. पण निकाल जाहीर झाला नाही. सुप्रीम कोर्टाने निकाल राखून ठेवला आहे. त्यामुळे आता हा निकाल नेमका कधी लागेल? असा प्रश्न अनेकांच्या मनात सतावतोय. अर्थात निकाल हा लवकरच लागेल. पण सुप्रीम कोर्टाने तारीख जाहीर केलेली नसल्याने जनतेची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. या दरम्यान हा निकाल कधी लागू शकतो याबद्दल काही शक्यता वर्तवण्यात येत आहे. या शक्यतांपैकी एक महत्त्वाची शक्यता म्हणजे जस्टिस एमआर शाह यांच्या निवृत्तीच्या आधी निकाल जाहीर होऊ शकतो.

निकाल नेमका कधी लागणार?

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठात जस्टिस एमआर शाह यांचा समावेश होता. त्यामुळे शाह यांच्या निवृत्तीआधी या सुनावणीचा निकाल जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. तशी अपेक्षा वर्तवण्यात येत आहे. जस्टिश शाह हे येत्या 15 मे रोजी निवृत्त होणार आहेत. त्यामुळे निकाल हा 15 मे च्या आधी येण्याची दाट शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा

सुप्रीम कोर्टात अंतिम क्षणी काय-काय घडलं?

सुप्रीम कोर्टात दोन्ही बाजूने युक्तिवाद संपल्यानंतर आज घडलेल्या घडामोडी देखील महत्त्वाच्या आहेत. सुनावणीचा शेवट अतिशय रंजक झाला. ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी या युक्तिवादाचा शेवट केला. त्यांनी शेवटच्या क्षणी संस्कृतमध्ये सुभाषित म्हणून युक्तिवादाचा शेवट केला. खरी शिवसेना कुणाची त्याचा निर्णय न्यायालय घेईल, असं म्हणत त्यांनी भावनिकपणे अपेक्षा व्यक्त केल्या.

ठाकरे गटाच्या बाजून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल, देवदत्त कामत आणि अभिषेत मनुसिंघवी या तीनही वकिलांनी युक्तिवाद केला. ज्यांची याचिका दाखल असते त्याच पक्षाला शेवटच्या क्षणी कोर्टात रिजॉईंडर करण्यासाठी प्राधान्य दिलं जातं. त्यामुळे ठाकरे गटाच्या वकिलांना ती संधी मिळाली. दोन्ही बाजूच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टाचे आभार मानले. तब्बल नऊ महिन्यांनी या सुनावणीचा अंत झाला. आता फक्त निकालाची प्रतिक्षा आहे. निकाल राखून ठेवण्यात आलेला आहे.

ठाकरे गटाच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

सुप्रीम कोर्टात आज ठाकरे गटाच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. या सत्तासंघर्षाच्या सुनावणीचा आजचा आणि कालचा दिवस अतिशय महत्त्वाचे होते. शिंदे गटाच्या वकिलांनी युक्तिवाद केला. त्यानंतर ठाकरे गटाच्या वकिलांनी देखील जोरदार युक्तिवाद केला. विशेष म्हणजे राज्याचे तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बहुमत चाचणीसाठी निमंत्रण देण्याची कृती ही सरकार पाडण्याला कारणीभूत ठरव्याचं म्हणत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी नाराजी व्यक्त केलेली. त्यानंतर आज ठाकरे गटाच्या वकिलांनी पुन्हा राज्यपालांच्या मुद्द्यावरुन जोरदार युक्तिवाद केला.

कळंबच्या त्या महिलेच्या हत्येनंतर 'तो' दोन दिवस मृतदेहासोबत झोपला अन्
कळंबच्या त्या महिलेच्या हत्येनंतर 'तो' दोन दिवस मृतदेहासोबत झोपला अन्.
आधे इधर, आधे उधर... बीडमध्ये वाल्मिक कराडवर मेहरनजर?
आधे इधर, आधे उधर... बीडमध्ये वाल्मिक कराडवर मेहरनजर?.
टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ
टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ.
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान.
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.