AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MLC Election live | मुख्यमंत्र्यांचा उमेदवारी अर्ज दाखल, संपूर्ण ठाकरे कुटुंब विधानभवनात उपस्थित

विधानपरिषदेच्या 9 रिक्त जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी (MLC Election live) उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे.

MLC Election live | मुख्यमंत्र्यांचा उमेदवारी अर्ज दाखल, संपूर्ण ठाकरे कुटुंब विधानभवनात उपस्थित
| Updated on: May 11, 2020 | 12:26 PM
Share

मुंबई : विधानपरिषदेच्या 9 रिक्त जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी (MLC Election live) उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वत: उमेदवार असल्याने या निवडणुकीकडे विशेष लक्ष आहे. मुख्यमंत्र्यांनी सहकुटुंब येऊन विधानभवनात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, मुलगा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीचे दिग्गज नेते उपस्थित होते.

मतांचं गणित पाहून काँग्रेसने दुसऱ्या जागेचा हट्ट सोडल्याने आता महाविकास आघाडी पाच जागांवर निवडणूक लढवणार आहे. तर भाजपने चार जागांवर दावा केला आहे. संख्याबळ पाहता महाविकास आघाडी पाच आणि भाजपच्या चार जागा निवडून येतील, त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार आहे. (MLC Election live)

दरम्यान, भाजपने आपल्या उमेदवारांचे अर्ज यापूर्वीच भरले आहेत. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीचे उमेदवार आज आपले अर्ज दाखल करत आहेत.  एकूण 9 जागांपैकी शिवसेना 2, राष्ट्रवादी 2 आणि काँग्रेस 1 तर भाजप 4 जागा लढवणार आहे.

MLC Election Live Update 

  • मुख्यमंत्री सहकुटुंब उपस्थित
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानपरिषदेचा अर्ज भरण्यासाठी विधानभवनात दाखल
  • महाविकास आघाडीचे नेते विधानभवनात दाखल
  • विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. सकाळपासूनच उमेदवार विधानभवनात येण्यास सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल मिटकरी आणि शशिकांत शिंदे हे दाखल झाले आहेत.

भाजपचे उमेदवार

या निवडणुकीसाठी सर्वात आधी भाजपने आपले चार उमेदवार जाहीर केले.  भाजपने 4 जागांवर उमेदवारी लढवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी भाजपने रणजितसिंह मोहिते पाटील, गोपीचंद पडळकर, प्रवीण दटके आणि नांदेडचे डॉ. अजित गोपछेडे यांना उमेदवारी देऊन अर्ज भरले आहेत.

मुख्यमंत्री उमेदवार

दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: या निवडणुकीतील उमेदवार आहेत. त्यामुळे ज्या निवडणुकीत मुख्यमंत्री उमेदवार असतात ती बिनविरोध करण्याचे महाराष्ट्राच्या राजकारणात संकेत आहेत. मात्र आता काँग्रेसने वाढीव जागा मागितल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी आहे.

कोणत्या पक्षाचा उमेदवार कोण?

उद्धव ठाकरे – शिवसेना निलम गोऱ्हे – शिवसेना

राजेश राठोड – काँग्रेस राजकिशोर मोदी – काँग्रेस (अर्ज मागे)

शशिकांत शिंदे – राष्ट्रवादी अमोल मिटकरी – राष्ट्रवादी

रणजितसिंह मोहिते पाटील – भाजप गोपीचंद पडळकर – भाजप प्रवीण दटके – भाजप डॉ. अजित गोपछेडे – भाजप

विधानपरिषदेच्या 9 जागांचा निवडणूक कार्यक्रम 

  • 4 मेपासून 11 मे पर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार
  • 12 मे – उमेदवार अर्जांची छाननी
  • अर्जमाघारीसाठी 14 मे पर्यंतची मुदत
  • 9 जागांसाठी 21 मे रोजी मतदान
  • मतदानाच्या दिवशीच मतमोजणी
  • 26 मेपर्यंत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण

(MLC Election live)

संबंधित बातम्या 

MLC Polls : विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होणार, काँग्रेसने 6 व्या जागेचा आग्रह सोडला 

MLC Polls | राष्ट्रवादीच्या पुढे काँग्रेसचं पाऊल, दुसरा उमेदवारही जाहीर, विधानपरिषदेचं गणित बदलणार   

आधी विधानसभा, आता विधानपरिषदेला डावललं, मेधा कुलकर्णींच्या डोळ्यात दुसऱ्यांदा पाणी, दादांनी प्रॉमिस मोडल्याचा आरोप

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.